Home » Irani cafe : इराणी हॉटेल्स आणि कॅफेचा इतिहास आहे तरी काय ?

Irani cafe : इराणी हॉटेल्स आणि कॅफेचा इतिहास आहे तरी काय ?

by Team Gajawaja
0 comment
Share

मुंबईला विविध संस्कृती, परंपरांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे मुंबईत वेगवेगळे कल्चर आपल्याला अनुभवयाला मिळतात. त्यामुळे मुंबईकडे लोकं जास्त आकर्षित होतात. गजबजणाऱ्या लोकल गाड्या, चाळी, आलिशान इमारती हे सगळ मुंबईकरांच्या आयुष्याचा एक भागच झाला आहे. आता या मुंबईची ओळख अनेक कारणांसाठी आहे त्यातील एक फेमस म्हणजे इराणी कॅफे. गरमागरम चहा आणि बन-मस्का म्हंटलं की आठवतं ते इराणी कॅफे (Irani cafe) … आजही प्रत्येकाच्या जिभेवर ही चव रेंगाळतच आहे. मुंबईसोबतच बाकी काही शहरांमध्ये हे इराणी हॉटेल्स असली तरी मुंबईत त्याची डिमांड खूप आहे. परंतु या इराणी हॉटेल्स आणि कॅफेचा इतिहास आहे तरी काय ? जाणून घेऊ. (Irani cafe)

मुंबई आणि इराणी कॅफे (Irani cafe) यांचं एक घट्ट नातं आहे. पु.ल.देशपांडे यांनी मांडलेल्या त्यांच्या गोष्टींमधून भेटलेली ही इराणी हॉटेल्स प्रत्येकाला आकर्षित करतात. प्रत्येक जुन्या ट्रेंडची craze आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे. तसच काहीस ह्या कॅफे बाबतीत पाहायला मिळत. ह्या इराणी कॅफेची craze सध्या फारच वाढत आहे. लोक ह्या कॅफेचा typical look,menu आणि इराणी हॉटेल्स यांना लोकं शोधून शोधून भेट देत आहेत. ह्यावरून एक कळलंच असेल की मुंबईतील इराणी कॅफे हा ह्या शहराच्या इतिहासाचा अनोखा घटक आहे.(Irani cafe)

प्रत्येक हॉटेल्स मधले पदार्थ आता घराघरात बनवले जातात त्यामुळे हा कठीण वाटणारा हा बनमस्का अनेक लोक घरात बनवतात तरीही इराणी कॅफे मधील बनमस्क्याची चव त्याला येणार नाही हेच खरं. मुळात इराणी कॅफे (Irani cafe) हा चालू केला गेला तो २० व्या शतकात. ब्रिटिश इंडियातुन जी लोक इथे मायग्रेट झाली त्यातील झोरास्ट्रियन म्हणजेच मुळच्या इराणी लोकांनी याची सुरुवात केली, असं म्हंटलं जात. १९५० साली भारतात एकूण ३५० इराणी कॅफे सुरु झाले व त्याकाळी भारतात इराणी चहा खूप जास्त लोकप्रिय झाला. तुम्हाला हे माहित आहे का ? की पूर्वी इराण हा भारताचा शेजारी होता असं म्हटलं जात. १९४७ साली जी फाळणी झाली त्यात भारत आणि पाकिस्तान या देशांची निर्मिती झाली.(Irani cafe)

परंतु आता इराणी कॅफे (Irani cafe) हे कमी झाले आहेत. “जुनं ते सोनं” म्हणतात तसंच काहीसं इराणी कॅफेच्या बाबतीत झालं आहे. अनेक लोक ही त्याच इराणी कॅफेच्या आणि तेथील ambience च्या अजूनही प्रेमात आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे येथील जुन्या लूक आणि मेन्युसह उभ्या असलेल्या ह्या कॅफेमध्ये लोक अजूनही आनंद लुटतात. तसेच खादाड असणाऱ्या लोकांना तर याची भुरळचं पडते, कारण ह्या कॅफेचं structure कमालीचं आहे आणि लोक ह्या Structure च्या प्रेमातच पडतात कारण उंच छताची हॉटेल्स, काळ्या, पांढऱ्या चौकड्यांची फरशी असलेली जमीन, मार्बलचा टॉप असणारी टेबल्स आणि वेताच्या किंवा लाकडाच्या खुर्च्या तसेच टेबलवरचा लाल पांढरा table cloth काऊंटरवर अशी गरमागरम कुकिज, बिस्कीट, केक असलेले मोठे – मोठे काचेचे जार,आणि या सगळ्यासोबत बोलबच्चन करणारा मालक ह्या सगळ्यामुळे हे इराणी कॅफे आणि हॉटेल्स लोकांचं लक्ष्य वेधून घेतात.(Irani cafe)

मुंबईतल्या ह्या कॅफेन अनेक चांगले वाईट प्रसंग अनुभवले आहेत. काही लोकांसाठी तर हा कॅफे म्हणजे रोमँटिक date ची place असायची. अशीच एक रोमँटिक गोष्ट ह्या कॅफे मध्ये घडली होती. ऐकून थोडी गंमत वाटेल पण ह्या कॅफेचे जे मालक फारुक शोक्री यांच्या आजोबांनी आजीला याच कॅफेमध्ये कडक इराणी चहाचा आस्वाद देत लग्नासाठी मागणी घातली आणि आजीने सुद्धा अगदी लाजत लग्नाला होकार दिला. अशा अनेक लोकांच्या love स्टोर्या ह्या कॅफेने पहिल्या आहेत. मुंबई असो किंवा पुणे असो खाण्याशी लोकांचं अनोखंच नातं आहे. कारण प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला आवडतंच. खिमा पाव, बेरी पुलाव, रास्पबेरी ड्रिंक असे पदार्थ आजही लोकप्रिय आहेत आणि त्याची चव प्रत्येकाच्या तोंडावर रेंगाळतेच. (Marathi News)

===============

हे देखील वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार ?

===============

१८७१ साली बांधण्यात आलेल्या लियोपोल्ड कॅफेचे नाव बरच चर्चेत आलं. हे कॅफे इराणी कॅफेचाच एक भाग…शेरजाद दस्तूर या इराणी माणसानं हे कॅफे उभं केलं. मुंबईमध्ये जो अतिरेकी हल्ला झाला त्या मध्ये ताज हॉटेल सोबतच दीडशे वर्ष असलेल्या जुन्या लियोपोल्ड कॅफेच नाव देखील चर्चेत आलं. परदेशी लोकांसाठी उत्तम चवीचं जेवण म्हणजे हे ठिकाण होतं, असं म्हंटलं जात.(Irani cafe)

मुंबईसोबतच पुण्याच्या खाद्यसंस्कृतीत इराणी कॅफेच एक आगळंवेगळं स्थान आहे.असं म्हंटलं जात की, सोराबजी आणि दोराबजी ह्या नावाची २ माणसं पुण्याच्या कॅम्प परिसरामध्ये इराणी चहा आणि बनमस्का विकायचे त्यामुळे हे पदार्थ खूप जास्त लोकप्रिय झाले. ह्याची popularity इतकी वाढली की दोराबजीनं restaurant च उभं केलं. त्याकाळी ब्रिटिश जेवायला त्या restaurant मध्ये जात त्यामुळे त्यावेळी भारतीयांना प्रवेश नसायचा परंतु ह्या रेस्टॉरंटची खासियत वेगळी होती कारण ह्या रेस्टॉरंट मध्ये indians ना सुद्धा प्रवेश असायचा त्यामुळे हे भारतातल्या जुन्या पारसी-इराणी हॉटेलपैकी हे एक हॉटेल असल्याचं म्हंटल जात. (Irani cafe)

शिवाय अनेक लोक ही इराणी आणि पारसी त्यांच्यात गल्लत करायची. शिवाय इराणी कॅफे हे पारसी लोकांचं असल्याचं म्हंटलं जायचं. मुळात लोकांना हेच माहित नाही की इराणी आणि पर्शियन हे सेम म्हणजेच झोराष्ट्रियन्स असले तरी त्या दोघांमधल्या सांस्कृतिक, सामाजिक, भाषिक यांमध्ये खूप फरक आहे. ह्यावरून एक मात्र नक्की लक्षात येत की मुंबई असो किंवा पुणे विविध खाद्यसंस्कृतींना जितकं महत्व आहे त्याहीपेक्षा जास्त CRAZE ह्या इराणी कॅफेसची दिसून येते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.