Home » Chaturthi : कार्तिक महिन्यात येणाऱ्या विनायकी चतुर्थीचे महत्त्व

Chaturthi : कार्तिक महिन्यात येणाऱ्या विनायकी चतुर्थीचे महत्त्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Chaturthi
Share

चतुर्थी ही गणपती बाप्पाला समर्पित असलेली तिथी आहे. दर महिन्याला संकष्टी आणि विनायक चतुर्थी येते. यादिवशी गणपती बाप्पाची भक्तिभावाने पूजा केली जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी ही खास बाप्पाची तिथी असते. चतुर्थीचे व्रत हे खूपच खास समजले जाते. यादिवशी जर विधिपूर्वक गणपती बाप्पाची पूजा केली तर नक्कीच इच्छित फळाची प्राप्ती होते. प्रत्येक महिन्यात संकष्टी आणि विनायकी अशा दोन चतुर्थी येतात. अनेक घरांमध्ये केवळ संकष्टी चतुर्थीचेच व्रत केले जाते, तर काही घरांमध्ये संकष्टी आणि विनायकी अशा दोन्ही व्रतांचे पालन केले जाते. या चालू असणाऱ्या कार्तिक महिन्यात आता विनायकी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. (Chaturthi)

कार्तिक महिन्याच्या शुद्ध पंधरवड्याच्या तिसऱ्या दिवसाच्या नंतरच्या दिवशी विनायक चतुर्थी साजरी केली जाते. या वर्षी, विनायक चतुर्थी २५ ऑक्टोबर रोजी आहे. या शुभ प्रसंगी, भगवान गणेशाची पूजा केली जाईल आणि चतुर्थीच्या दिवशी उपवास केला जाईल. पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी २५ ऑक्टोबर रोजी पहाटे १:१९ वाजता सुरू होईल. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३:४८ वाजता संपेल. चतुर्थी तिथीच्या वेळी चंद्रदर्शन केले जाते. यंदा विनायक चतुर्थी शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी आहे. (Marathi News)

विनायक चतुर्थीच्या दिवशी सूर्योदय सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी होणार आहे तर सूर्यास्त संध्याकाळी ५ वाजून ४२ मिनिटांनी होईल. चंद्रोदय – सकाळी ९:५० वाजता होईल आणि चंद्रास्त – संध्याकाळी ७:५८ वाजता होईल. यावेळी ब्रह्म मुहूर्त सकाळी ४:४६ ते ५:३७ पर्यंत असेल. तर विजया मुहूर्त दुपारी १:५७ ते दुपारी २:४२ पर्यंत राहील. गोधुली मुहूर्त – संध्याकाळी ५:४२ ते संध्याकाळी ६:०७ पर्यंत राहील. निशिता मुहूर्त – दुपारी ११:४० ते सकाळी १२:३१ पर्यंत असेल. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला अनेक शुभ योग तयार होत आहे. या योगामध्ये शिव कुटुंबाची पूजा केली जाईल. हा शुभ योग शोभन आणि रवि योग तयार होणार आहे. रात्रभर भद्रावास योग राहील. (Ganpati bappa)

विनायक चतुर्थीचे महत्त्व
विनायक चतुर्थीला गणेशाची आराधना आणि उपवास केल्याने साधकावर विशेष आशीर्वाद राहतात. याशिवाय व्यक्तीला सुख, समृद्धी, शांती, यश आणि ज्ञानाचा आशीर्वादही मिळतो. तसेच गणेशाच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. या दिवशी माणसाने श्रीगणेशाची आरती केलीच पाहिजे, यामुळे विघ्नांचा नाश करणारे प्रसन्न होतात. (Todays Marathi Headline)

Chaturthi

विनायक चतुर्थी पूजा पद्धत
विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून स्वच्छ मचाणावर लाल रंगाचे कापड पसरावे. त्यानंतर श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना करून फुले, अक्षत, दुर्वा अर्पण करा. गणपतीची पूजा पूर्ण विधी आणि मंत्रोच्चारांनी करा. शेवटी कथा वाचून आरती करून अन्नदान करावे. (Latest Marathi Headline)

विनायकी चतुर्थी कथा
एक दिवस भगवान शिव आणि माता पार्वती नदी किनारी बसले होते. यावेळी वेळ घालवण्यासाठी म्हणून पार्वतीने शंकराला सारीपाट खेळूया असं म्हटलं. पण या खेळात कोण जिंकलं हे कसं ठरवणार? त्यामुळे मग शंकरांनी वाळलेल्या गवतापासून एक पुतळा बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा केली. त्यामुळे या पुतळ्यात जीव आला. त्यातून तयार झालेल्या मुलाला मग शंकराने सांगितले, की आम्ही सारीपाट खेळणार आहोत तेव्हा यामध्ये कोण जिंकलं आणि कोण हरलं हे तू सांगायचं. यानंतर त्या दोघांमध्ये सारीपाटाचे तीन डाव खेळले गेले. योगायोगाने तीनही वेळा माता पार्वतीच जिंकल्या. (Top Trending Headline)

तीन डाव झाल्यानंतर त्यांनी या मुलाला विचारले, की कोण जिंकले. त्यावर या पुतळ्याने महादेव शंकर जिंकल्याचे जाहीर केले. त्यामुळे क्रोधित झालेल्या पार्वतीने या मुलाला लंगडा होण्याचा आणि चिखलात पडून राहण्याचा शाप दिला. मात्र, आपल्याकडून चुकून असं झाल्याचं म्हणत या मुलाने माता पार्वतीची माफी मागितली. यानंतर मग पार्वतीचा राग शांत झाला. पार्वती मातेने या मुलाला सांगितले, की या ठिकाणी गणेश पूजन करण्यासाठी काही नागकन्या येतील. त्यांच्या सांगण्यानुसार तू गणेश व्रत कर. असं केल्यानंतर मी तुझ्यावर प्रसन्न होईन. यानंतर पार्वती आणि शंकर कैलास पर्वतावर निघून गेले. (Latest Marathi News)

एका वर्षानंतर त्या ठिकाणी नागकन्या आल्या. तेव्हा या मुलाने नागकन्यांकडून गणेश व्रताची माहिती करुन घेतली. पुढे २१ दिवस सलग या मुलाने गणेश व्रत केलं. यामुळे गणपती प्रसन्न झाले, आणि त्यांनी या मुलाला वर मागण्यास सांगितलं. तेव्हा तो गणपती बाप्पांना म्हणाला, की मला एवढी शक्ती द्या, की मी माझ्या आईवडिलांना सोबत घेऊन माझ्या पायांनी चालत कैलास पर्वतावर जाऊ शकेन. गणपतीने त्याला मागितलेला वर दिला. यानंतर हा मुलगा चालत कैलास पर्वतावर गेला आणि शंकराला त्याने आपली कथा सांगितली. (Top trending News)

=======

Ekadashi : वर्षभरात किती येतात एकादशी? जाणून घ्या भगवान विष्णूला प्रसन्न करण्याचे खास उपा

=======

सारीपाट खेळलेल्या दिवसापासून पार्वती माता प्रभू शंकरावर रागावल्या होत्या. त्यामुळे या मुलाच्या सांगण्याप्रमाणे भगवान शंकरांनीही गणेश व्रत केले. यामुळे पार्वती मातेचा शंकरावरील राग शमला. त्यानंतर या व्रताचा विधी शंकरांनी माता पार्वतीलाही सांगितला. त्यानंतर पार्वती मातेला आपला मुलगा कार्तिकेयाला भेटण्याची इच्छा झाली. मग त्यांनीही २१ दिवस गणेश व्रत केलं, ज्यानंतर कार्तिकेयने स्वतःच येत पार्वती मातेची भेट घेतली. (social News)

(टीपः ही माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.