Home » Vegan Food च्या नावाखाली कच्चे शाकाहारी भोजन आरोग्यासाठी धोकादायक?

Vegan Food च्या नावाखाली कच्चे शाकाहारी भोजन आरोग्यासाठी धोकादायक?

by Team Gajawaja
0 comment
Vegan Food
Share

गेल्या काही वर्षांपासून वेगन फूड (Vegan Food) लोकप्रिय होत चालले आहे. खासकरुन अशा लोकांमध्ये ज्यांना आपले आरोग्य अधिक उत्तम ठेवायचे असते. वास्तवात वेगन फूडसह जे प्लांट बेस्ड फूड असते त्याचे अनेक फायदे असतात आणि ते वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत करतात. त्याचसोबत हृदय रोगाचा धोका सुद्धा कमी करतात. मात्र ब्रिटेनच्या टीसाइड युनिव्हर्सिटीमधील न्युट्रिशन, फूड अॅन्ड हेल्थ सायन्स प्रोफेसर लौरा ब्राउन यांनी याबद्दल सावध केले आहे.

त्यांचे असे म्हणणे आहे की, वेगन फूडच्या नावावर आपण टोकाच्या स्थितीवर जात आहोत. ते झाडांमधून मिळणाऱ्या अशा पदार्थांचे सेवन करत आहेत जे शिजवल्याशिवाय खाल्ले जाते. यामध्ये असे काही खाद्य पदार्थ असतात ते आपल्या आहारामधून बाहेर करतो. जसे की, गाय किंवा बदामाचे दूध.

वेगन फूड समर्थकांनी दावा केला आङे की, खाणं शिजवल्याने त्यामधील काही पोषक तत्वे ही निघून जातात. त्यांचे असे मानणे आहे की, झाडांपासून मिळालेल्या खाद्यपदार्थांचे सेवन केल्याशिवाय माणसांमधील उर्जेचा स्तर सुधारणार नाही. आजारपण थांबवेल आणि संपूर्ण आरोग्य ही सुधारेल. मात्र शोधांच्या आधारावर प्रो बाउन सिन अधिक लक्ष केंद्रित करते ते म्हणजे, जर दीर्घकाळापर्यंत कच्चे शाकाहारी आहाराचे सेवन केल्यास त्याचे फायदे नव्हे तर अधिक नुकसानच होते.

Vegan Food
Vegan Food

मात्र असे का होते?
प्रो बाउनी असे म्हणते की, असे केल्याने तुम्ही महत्वपूर्ण पोषक तत्वांपासून दूर राहता. संशोधन सांगते की, शिजवलेल्या खाद्यपदार्थांच्या तुलनेत काही कच्चे खाद्य पदार्थ आरोग्यदायी असू शकतात. मात्र काही भाज्या शिजवल्या तर त्यामधील पोषक तत्व ही निघून जातात. मात्र अन्य गोष्टी शिजवल्यानंतर पोषक तत्वांचे प्रमाण अधिक होते. असे अशा कारणास्तव होते की, काही पोषक तत्वे भाज्यांमधील कोषिकांच्या भितींनी बांधलेल्या असतात. पण खाणं शिजवल्यानंतर त्या तुटतात आणि ज्यामुळे पोषक तत्व मुक्त होतात आणि शरिरात ते सहज शोषल्या जातात.

पालक, मशरुम, गाजर सारखी उदाहरणे समजून घ्या
जेव्हा पालक शिजवला जातो तेव्हा शरिरात कॅल्शियम शोषून घेणे सोप्पे होते. संधोधनात असे दिसून आले आहे की, टोमॅटो शिजवल्याने त्यामधील विटामीन सी चा स्तर हा २८ टक्क्यांनी कमी होतो.

हे देखील वाचा- थंडाव्यात मेथीच्या लाडवाची गोडी….

विटामिन आणि खनिजची कमतरता
कच्च्या शाहाकारी आहारात काही महत्वपूर्ण विटामिन आणि खनिजांची कमतरता असते. जसे की, विटामिन बी १२ आणि डी, सेलेनियम, लोह आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड. असे अशा कारणास्तव असते की, या विटामिन आणि खनिजांचा उच्च स्तर असणारे काही खाद्य पदार्थ जनावरांमधून येतात. जसे की, मांस आणि अंडी. (Vegan Food)

कठोरपणे कच्चा आहार खाणाऱ्या लोकांवर अभ्यास केला असता तेव्हा कळले की, ३८ टक्के उमेदवारांमध्ये विटामिन बी १२ ची कमतरता होती. विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे काही समस्या उद्भवतात. जसे की, तोंड येणे, दृष्टी कमी होणे. या अभ्यासात असे की, दिसून आले कच्च्या शाहाकारी आहारामुळए बी १२ च्या कमतरतेमुळए होमोसिस्टीचा स्तर वाढला जातो. हा एक चिंतेचा विषय आहे. कारण वाढलेल्या होमोसिस्टीनचा स्तर संभावित रुपात हृदय रोग आणि स्ट्रोकची जोखिम वाढवू शकते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.