Tips to stay stress free : शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांचा एकमेकांशी संबंध आहे. यामुळे म्हटले जात की मन सुदृढ असल्यास आरोग्यही सुदृढ राहण्यास मदत होते. मानसिक संतुलन योग्य रहाण्यसाठी तुम्ही स्ट्रेस फ्री असण खूप गरजेचं आहे. जाणून घेऊया आपण कसा स्वतःला तणाव मुक्त ठेऊ शकतो याबद्दल पुढे सविस्तर…
मानसिक संतुलनाचा समतोल राखणे खूप गरजेचं आहे. तुम्ही खूश असाल तर पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाइफमध्ये व्यवस्थितीत समतोल राखू शकतो. जर तुम्ही तणावाच्या स्थितीकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्याचा परिणाम फार वाईट होऊ शकतो. कालांतराने तणावाची स्थिती शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकते.
-रिलॅक्सेशन टेक्निक
मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी कमीत कमी 10 ते 20 मिनटे मेडिटेशन, ब्रीदिंग एक्सरसाईज करा, अनुलोम – विलोम या सारख्या प्राणायाम करू शकतात. ज्यावेळी तणावासारखे वाटते तेव्हा डोळे बंद करून दीर्घश्वास घ्या आणि सोडा. असे केल्याने थोडा रिलॅक्स वाटण्यास मदत होईल. यावेळी पद्मासन, पश्चिमोत्तासन, बालासन केल्यास फायदा होईल.

Tips to stay stress free
=======================================================================================================हेही वाचा :
AC : सावधान! एसीच्या जास्त वापरामुळे शरीरावर होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी घरच्याघरी तयार करा हे 4 नॅच्युरल ब्लश
=======================================================================================================
– पुरेशी झोप घेणे
तणावापासून दूर राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे फार महत्वाचे आहे. दररोज 7-8 तासांची पुरेशी झोप घ्या. या शिवाय तुम्ही योग्य वेळात झोपणं आणि योग्य वेळात उठणं आवश्यक आहे
-मनाला पसंतीच्या गोष्टी करा
ज्यावेळी मनाला आवडणाऱ्या गोष्टी करता तेव्हा तुम्हा अंतरसुख मिळते. जर तुम्हाला बागकाम आवडत असेल तर आठवड्यातून एकदा नक्की करा.पुस्तके वाचा, गाणी ऐका, काही नवीन गोष्टी शिका. जेणेकरुन तुम्ही आनंदित रहाल.
– सेल्फ केअर करा
स्वतःला खूश ठेवण्यासाठी सेल्फ केअर करणे गरजेचे आहे. यावेळी फिटनेस, स्किन केअर ते हेअर केअर करण्यासाठी स्वत:ला आवडणाऱ्या गोष्टीमध्ये आनंदित राहण्याचा प्रयत्न करा. (Tips to stay stress free)
– निसर्गाच्या सानिध्यात रहा
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात, जवाबदाऱ्यांच्या तणावाखाली तुम्ही स्वतःला विसरत चला आहात. यामुळे तणावाखाली राहण्यासाठी तुम्हाला वेळात वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं गरजेचं आहे.