भारतात अनेक पवित्र, जुन्या आणि महत्त्वाच्या नद्या आहेत. भारतातील महत्त्वाच्या नद्यांपैकीच एक नदी म्हणजे ‘नर्मदा नदी’. अमरकंटक पर्वतातून उगम पावणारी ही नर्मदा फक्त एक नदी नाही तर साक्षात मोक्षदायिनी आहे. शास्त्रात असे म्हटले आहे की, गंगेत स्नान केल्याने जे पुण्य मिळते, ते नर्मदेच्या केवळ दर्शनाने प्राप्त होते. नर्मदा नदी ही जगातील सर्वात जुन्या नद्यांपैकी एक नदी मानली जाते. भारतातील सर्वच नद्यांना जीवनदायिनी नदी असे म्हटले जाते. याचे कारण म्हणजे या नद्यांच्या पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसराचे सिंचन तर होतेच सोबतच लोकांच्या दैनंदिन जीवनात देखील या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. (River)
बहुतांश नद्यांचा प्रवाहच पश्चिमेकडून पूर्वेकडे असतो. मात्र नर्मदेची अनोखी दिशा तिला अत्यंत खास आणि महत्त्वाची बनवते. कारण नर्मदा ही एकमेव अशी नदी आहे, जी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. मध्य भारतातून वाहणारी ही नदी अनेक ठिकाणांची तहान भागवते आणि असंख्य गावे आणि शेतांना जीवन देते. नर्मदा नदी मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यातील अमरकंटक टेकड्यांमध्ये उगम पावते. येथून ही नदी पश्चिमेकडे वाहते आणि दीर्घ प्रवासानंतर अरबी समुद्रात वाहते. अमरकंटक टेकड्या पवित्र मानल्या जातात आणि त्यांचे धार्मिक महत्त्व आहे. दरवर्षी हजारो भाविक नर्मदा नदीला भेट देतात, त्यामुळे येथे त्यांचा खूप आदर केला जातो. अरबी समुद्रात सोडण्यापूर्वी, नदी सुमारे १,३०० किमी प्रवास करते. या प्रवासादरम्यान, ती खडकाळ प्रदेश, हिरवीगार जंगले आणि खोल दऱ्यांमधून जाते. (Todays Marathi Headline)

इतर सर्व नद्या बंगालच्या खाडीत विसर्जित होतात. मग ही एकच नदी गुजरातमध्ये अरबी समुद्राला का मिळते. नर्मदा नदी मध्यप्रदेश आणि गुजरात मधून वाहते आणि अरबी समुद्राला मिळते. नर्मदेचा प्रवाह हा शिवाच्या ऊर्जेचे आणि तपश्चर्येचे प्रतीक आहे. नर्मदा नदीला हिंदू धर्मात जीवित देवी असे मानले जाते. या नदीला ‘आकाशाची कन्या’ असे देखील म्हणतात. नर्मदा नदी ही देशातील सात महत्त्वाच्या नद्यांपैंकी एक मानली जाते. नर्मदा नदीचे महत्त्व स्कंद पुराण आणि इतर ग्रंथांमध्ये आढळते. नर्मदेत स्नान आणि दर्शन घेतल्याने पाप नष्ट होतात असे सांगितले जाते. याच कारणामुळे नर्मदा परिक्रमा ही जन्म- मरणाच्या बंधनातून मुक्त होण्याची साधना मानली गेली आहे. (Top Marathi News)
नर्मदा नदीच्या उलट्या प्रवाहाचे भौगोलिक कारण म्हणजे रिफ्ट व्हॅली. रिफ्ट व्हॅलीचा उतार विरुद्ध दिशेने आहे. यामुळे नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाऊन ती अरबी समुद्राला मिळते, असे सांगितले जाते. नर्मदा नदीच्या उलट्या प्रवाहामागे पुराणात अनेक कथा सांगितल्या गेल्या आहेत. त्यापैंकी एक म्हणजे, नर्मदा आणि सोनभद्रा यांचे लग्न होणार होते. पण, लग्नाच्या काही दिवस आधी नर्मदाला समजले की, भद्राला तिची दासी जुहिली जास्त आवडते. यामुळे नर्मदेला आपला अपमान झाल्यासारखे वाटले आणि तिने मंडप सोडून विरुद्ध दिशेला जाण्याच निर्णय घेतला. नर्मदा उलट दिशेने जाताच सोनभद्राने तिला खूप विनवण्या करत थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, नर्मदा थांबली नाही. तिने आयुष्यभर कुमारी राहून उलट दिशेने वाहत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आजही नर्मदा उलट दिशेने वाहते असे सांगितले जाते. (Latest Marathi Headline)
========
Shabari Jayanti : जाणून घ्या फाल्गुन महिन्यात साजऱ्या होणाऱ्या शबरी जयंतीचे महत्त्व
========
नर्मदा भारतातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा नदीला अनेक नावांनी संबोधलं जातं. नर्मदा नदीला रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या अशीही नावं आहेत. नर्मदा नदी मध्य प्रदेशातून वाहणारी सर्वात मोठी नदी आहे. ही नदी भारतातील मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यामधून वाहते. नर्मदा परिक्रमा ही जीवनातील सर्वात मोठी साधना मानली गेली आहे. जो कोणी नर्मदेची परिक्रमा श्रद्धा आणि विश्वासाने करतो, तो केवळ नदीची परिक्रमा करत नाही, तर तो स्वतःमधील अहंकार, भीती आणि अज्ञानाची परिक्रमा करतो, असे मानले जाते. (Social News)
(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
