मुघल सम्राट (Mughal soldiers) औरंगजेबाने अनेक हिंदू मंदिरे उध्वस्त केली. मात्र वाराणसीतील एका मठात मात्र या मुघल सम्राटाच्या एकाही सैन्याला साधा प्रवेशही करता आला नाही. काशीमध्ये औरंगजेबानं कौर्याची परिसिमा केली. अनेक पवित्र मंदिरे आणि मठ तोडले तसाच आदेश जंगमवाडी मठाबाबतही होता. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिरात शिवलिंग मोठ्या प्रमाणात आहेत. हा मठ तोडण्यासाठी गेलेल्या मुघल सैनिकांना मंदिरात प्रवेश केल्यावर एक मोठी सावली दिसली. त्यामुळे घाबरलेल्या या मुघल सैनिकांनी तेथून पळ काढला. ज्याकाळी औरंगजेब सर्व मंदिरे तोडत होता. तेव्हा या मठाची साधी विटही त्याला हलवता आली नाही. या मठातील अनुभव ऐकल्यावर औरंगजेबही हादरला होता.
वाराणसीच्या या मठात 1 कोटी शिवलिंग असल्याचा दावा केला जातो. जंगमवाडी मठात अनेक संत-महात्म्यांनी शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली आहे. औरंगजेबाने त्याचा शासनकाळादरम्यान अनेक हिंदू मंदिरांचे नुकसान केले. त्याची वक्रदृष्टी या जंगमवाडी मठवरही होती. वाराणसीमध्ये असलेले काशी विश्वनाथ मंदिरही औरंगजेबाच्या आदेशावरून पाडण्यात आल्याची नोंद आहे. परंतु त्याच मंदिरापासून थोड्या अंतरावर जंगमवाडी नावाचा मठ आहे, जो मुघल सैनिकांना पाडता आला नाही. मुघल सैनिक जंगमवाडीच्या मुख्य दरवाज्यापर्यंत पोहोचले होते, पण पुढे त्यांना प्रवेश करता आला नाही. एका विचित्र भीतीमुळे मुघल सैनिक मागे वळले होते. स्वतः औरंगजेबही जंगमवाडी मठात आला पण निराश होऊन परतला, असे सांगण्यात येते.

औरंगजेबाने काशीतील सर्व मठ आणि मंदिरे पाडण्याचे आदेश दिले होते. जंगमवाडी हे काशीमध्येच आहे आणि तिथले शैव अनुयायांचे सर्वात जुने केंद्र आहे. औरंगजेबाचे सैनिक जंगमवाडीला पोहोचल्यावर त्यांनी मुख्य पाडला आणि आत प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरु केला पण त्याच्या पुढे असलेल्या छोट्या दरवाजातून त्यांना प्रवेश करता आला नाही. (Mughal soldiers)
या मठात जबरदस्तीनं प्रवेश करणा-या मुघल सैनिकांना त्यांच्या दिशेने एक सावली सरकत पुढे येत असल्याचे जाणवले. मुघल सैनिकांना आधीच अपराधीपणाची भावना होती. त्यातच ही सावली दिसल्यामुळे त्यांना मोठी भीती वाटली आणि हे सर्व सैनिक मठातून पळून गेले. औरंगजेबाचा दरबारी मुस्तैद खान याच्या ‘मासिर-ए-आलमगिरी’ या पुस्तकात या सर्व घटनेचा उल्लेख आहे. जेव्हा मुघल सैनिक जंगमवाडी मठ तोडून सम्राट औरंगजेबाकडे परत पोहोचू शकले नाहीत तेव्हा त्याचा विश्वास बसेना. यानंतर तो स्वत: जंगमवाडीच्या मठापर्यंत आला. पण औरंगजेबालाही मठात प्रवेश करता आले नाही. हा मठ असाच शानदारपणे उभा राहिला. औरंगजेबाला याचे खूप दुःख राहिले याचीही सदर पुस्तकात उल्लेख आहे. (Mughal soldiers)
जंगमवाडी मठ हा वाराणसीतील सर्वात जुन्या मठांपैकी एक आहे. या मठाची स्थापना 8 व्या शतकात झाल्याचा उल्लेख आहे. राजा जयचंद याने या मठाच्या उभारणीसाठी जमीन दान केली. त्यानंतर हा मठ 86 जगत्गुरूंच्या अखंड वंशाचा साक्षीदार आहे. या मठाचे सध्याचे गुरु पीठाधिपती जगतगुरु श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आहेत. जंगमवाडी मठ हे ज्ञान सिंहासन किंवा ज्ञानपीठ म्हणूनही ओळखले जाते.
=======
हे देखील वाचा : ‘राणी की वाव’ला भारतीय वास्तुशास्त्राचा चमत्कार!
=======
या मठात लाखो शिवलिंग आहेत. यामागील कथा अशी आहे की, या मठातील अनुयायांचा अचानक किंवा अकाली मृत्यू झाल्यास त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी शिवलिंग दान केले जाते. म्हणजेच दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदानाच्या जागी शिवलिंगाचे विधिवत दान केले जाते. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेमुळे 10 लाखांहून अधिक शिवलिंगांची स्थापना एकाच छताखाली झाली आहे. यातील बहुतेक शिवलिंगे श्रावण महिन्यात दान केली जातात. या मठाचे मोठे अनुयायी महाराष्ट्र आणि कर्नाटकात आहेत. वीरशैव तत्त्वाचे पालन करणारे हे उपासक शिवलिंगाचीच पूजा करतात. शिवलिंगावर त्यांची श्रद्धा आणि निष्ठा आहे. (Mughal soldiers)
जंगमवाडी मठात अनेक साधू आणि विद्यार्थी वैदिक विधींच्या अभ्यासासाठी राहतात. जंगमवाडी मठाचा संपूर्ण परिसर शिवलिंगांनी नटलेला आहे. चहुबाजूंनी सुव्यवस्थितपणे मांडलेल्या शिवलिंगांच्या रांगा आहेत. येथे शिवलिंगांनी भरलेले अनेक कक्ष आहेत. मंदिराच्या आतही, प्रत्येक मोठ्या शिवलिंगाला हजारो लहान शिवलिंगांनी वेढलेले आहे. 50,000 चौरस मीटरमध्ये पसरलेल्या या मठात दररोज संध्याकाळी प्रसिद्ध पारंपारिक गंगा आरती केली जाते, यासाठी हजारो भक्त उपस्थित असतात.
सई बने