Home » Anjikuni Lake : गावातील सगळे लोकं रात्रीत गायब कशी झाली?

Anjikuni Lake : गावातील सगळे लोकं रात्रीत गायब कशी झाली?

by Team Gajawaja
0 comment
Anjikuni Lake
Share

26 नोव्हेंबर 1930 रोजी कॅनडातल्या “द डॅनव्हिल बी” या न्यूजपेपरने पहिल्या पानावर एक बातमी छापली, ज्याचं टाइटल होतं – “व्हिलेज ऑफ द डेड”. ही बातमी वाचून संपूर्ण कॅनडात भीतीची लाट पसरली, कारण या बातमीत लिहिलं होतं की नॉर्थ कॅनडातल्या एका गावातील लोक रातोरात गायब झाले.अख्खं गाव एका रात्रीत सुनसान झालं. ना कोणती संशयास्पद घटना, ना कोणता पुरावा. फक्त काही विचित्र गोष्टी गावात मागे राहिल्या. काही घरांमध्ये चुलीवर ठेवलेली भांडी आणि त्यात जळलेलं अन्न, सुईत ओवलेला धागा आणि मृत कुत्रे. त्या गावातील लोक रातोरात गायब कसे झाले? काय आहे ही स्टोरी? आणि त्या मागचं सत्य काय, जाणून घेऊ. (Anjikuni Lake)

नॉर्थ कॅनडातल्या दुर्गम भागात Anjikuni Lake नावाचं तळं आहे. या तळ्याच्या किनाऱ्यावर एक छोटीशी वस्ती होती, जिथं एस्किमो जमातीचे लोक राहायचे. ती साधारण 100 ते 150 लोकांची वस्ती होती, तळ्यातून मासे पकडून आणि आसपासच्या भागात शिकार करून ते आपलं पोट भरायचे. नॉर्थ कनाडाचा हा असा भाग आहे, जिथं लाखो चौरस किलोमीटरच्या जागेत फक्त काही हजारच लोक राहतात. कारण इथलं टोकाचं हवामान! Anjikuni लेकजवळ माशांशिवाय आसपासच्या जंगलात इतर प्राण्यांचीही शिकार व्हायची, त्यामुळे बरेच शिकारी इथं शिकारीसाठी यायचे. (Top Stories)

नोव्हेंबर 1930 चा तो एक थंडगार दिवस होता. जेव्हा जो लिबेल नावाचा एक शिकारी शिकारीसाठी या भागात गेला. शिकारीत तो इतका गुंग झाला की त्याला कळलंच नाही, कधी अंधार झाला. पण राहण्यासाठी त्याच्या डोक्यात एक आयडिया होती – नेहमीप्रमाणे तो Anjikuni लेकच्या किनाऱ्यावरच्या एस्किमो लोकांच्या वस्तीत जाऊन रात्र काढणार होता. हे लोकं बाहेरून येणाऱ्या लोकांचं नेहमीच स्वागत करायचे. मग जोनं आपलं सामान बांधलं आणि एस्किमो वस्तीच्या दिशेनं तो चालू लागला.(Anjikuni Lake)

Anjikuni Lake

तो त्या वस्तीकडे जात असताना त्याला कुठलाही आवाज येत नव्हता, भयाण शांतता पसरली होती. फक्त जोला त्याच्या स्वत:च्या पावलांचा आवाज ऐकू येत होता इतकी शांतता होती. वस्तीजवळ गेल्यावर नेहमी कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज यायचा, कारण वस्तीतले लोक कुत्री पाळायचे. पण आज वस्तीच्या जवळ गेल्यावरही स्मशान शांतता होती. जोच्या मनात शंका आली. त्यानं पावलं टाकण्याचा वेग वाढवला. त्याला वाटलं, कदाचित गावकरी झोपले असतील किंवा कुठं गेले असतील. आता तो लांबून वस्तीतली घरंही पाहू शकत होता. काही घरांवरून धूर निघताना दिसत होता. पण जवळ गेल्यावरही कुणाचा आवाज ऐकू आला नाही. शेवटी जो जेव्हा वस्तीत पोहोचला, तेव्हा त्याला जे दिसलं, त्यानं त्याला हादरवलं. इथं ना एकही माणूस होता, ना एकही प्राणी!(Anjikuni Lake)

पण जोसाठी सगळ्यात हैराण करणारी गोष्ट म्हणजे, काही घरांवरून धूर निघत होता, जणू काही आत कुणी आहे. जो एका घरात शिरला, पण तिथंही कुणी नव्हतं. सगळ्या घरांची तीच अवस्था होती. जो कदाचित हे सगळं पाहून तिथून निघून गेला असता, पण एक गोष्ट त्याला खूप खटकली. काही घरात स्वयंपाकाची भांडी चुलीवर ठेवली होती, पण त्यातलं अन्न जळून खाक झालं होतं. म्हणजे कुणी रात्रीच्या जेवणासाठी अन्न शिजत ठेवलं होतं, पण ते तसंच सोडून ते निघून गेले होते. इतकंच काय, वस्तीतल्या बायका ज्या शिवणकाम करायच्या, तिथं कपडे पडले होते, आणि सुईत धागाही ओवलेला होता. असं वाटत होतं, की वस्तीतले लोक अचानक कुठंतरी गेलेत.(Top Stories)

पण गेले कुठं? जो लिबेलनं संपूर्ण वस्तीची झडती घ्यायला सुरुवात केली. त्यानं पाहिलं, की विस्तीत पाळलेली कुत्री अजूनही रश्शांनी बांधलेली होती, पण ती भुकेनं मरण पावली होती. महत्त्वाचं म्हणजे, कुत्र्यांसमोर त्यांचं जेवण होतं, पण त्यांना खायला देणारं कुणी नव्हतं. एका ठिकाणी त्याला एक खणलेली कबर दिसली. ती कबर पाहून असं वाटत होतं, की ती ताजी खणलेली आहे. रात्रीच्या वेळी एकटा असताना हे भयाण दृश्य पाहून तो पुरता घाबरला होता.
इथले लोक जेव्हा कुठं जायचे, तेव्हा आपले पाळीव कुत्रे सोबत न्यायचे. पण हे सगळं पाहून असं वाटत होतं, की इथं काहीतरी विचित्र घडलंय. काहीसं अनपेक्षित, ज्यामुळे लोकांना अचानक कुठंतरी जावं लागलं. इतकं घाईघाईत, की त्यांनी कुत्र्यांनाही सोडलं नाही, जळणारी आग विझवली नाही, आणि हाततली कामं टाकून ते निघून गेले. जो यापुढे जास्त वेळ तिथं थांबू शकला नाही. तो धावतच जवळच्या टेलिग्राफ ऑफिसमध्ये गेला आणि तिथून रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांच्या कॅम्पशी संपर्क साधला. आणि त्यांना सगळी हकीकत सांगितली.(Anjikuni Lake)

पोलीस जेव्हा वस्तीत पोहोचले, तेव्हा जोनं सांगितलेलं सगळं खरं ठरलं. पोलिसांना शंका आली, की कदाचित इथं कुणी हल्ला केला असेल आणि सगळ्या वस्तीवाल्यांना मारलं असेल. पण जर असं असतं, तर वस्तीत कुठंतरी रक्ताचे डाग, खूनाचे निशान किंवा लढाईमुळे सामान विखुरलेलं दिसलं असतं. पण असं काहीच नव्हतं. पोलिसांनी लगेच वस्तीवाल्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं. या ऑपरेशनमध्ये एक अजब गोष्ट समोर आली, जी जोनंही कदाचित लक्षात घेतली नव्हती. संपूर्ण वस्ती बर्फानं झाकलेली होती, पण त्या बर्फावर कुणाच्याही पावलांचे ठसे नव्हते!फक्त एकाच माणसाच्या पावलांचे ठसे होते, आणि ते होते जो लिबेलचे. म्हणजे जो व्यतिरिक्त इथं कुणी आलं नव्हतं, आणि कुणी गेलंही नव्हतं. मग वस्तीतले गायब झाले कुठे? तळ्यावरही बर्फ जमा झाला होता, आणि वस्तीवाल्यांच्या बोटी किनाऱ्यावर उभ्या होत्या. या हवामानात मासेमारी होत नसल्यामुळे बोटी किनाऱ्यावरच असायच्या. जर ते तळ्यातून पोहून गेले असते, किंवा कुणी त्यांना मारून तळ्यात फेकलं असतं, तर तळ्यावरचा बर्फाचा थर कुठंतरी तुटलेला किंवा विखुरलेला दिसला असता. पण असंही काही नव्हतं.

=================

हे देखील वाचा : Tara Bhawalkar : मराठी लोकसाहित्य आणि स्त्रीवादी साहित्य क्षेत्रातील संशोधक- डॉ. तारा भवाळकर

=================

पोलिसांच्या तपासात आणखी एक गोष्ट समजली – ही लोक जो इथं येण्यापूर्वी तीन दिवसांआधीच बेपत्ता झाले होते. कारण कुत्र्यांचा मृत्यू एक-दोन दिवस भुकेनं होत नाही. आणि घरांमधून निघणारा धूर ह्याची खूण होता, की त्यांना इथून गेल्याला फार वेळ झाला नव्हता. पोलिसांसमोर ढिगभर प्रश्न होते, पण एकही उत्तर नव्हतं. कित्येक महिन्यांच्या सर्च ऑपरेशननंतर पोलिसांनी शेवटी या केसला अनसॉल्व्डचा शिक्का मारला आणि कायमचं बंद करून टाकलं. कालांतरानं लोकही ह्या गोष्टीला विसरले. पण या घटनेनंतर 50 वर्षांनी, म्हणजे 1984 साली, रॉजर बोर आणि नायजल ब्लंडर नावाच्या दोन लेखकांनी एक लेख लिहिला आणि या सगळ्या प्रकरणाला एलियन्सशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या लेखात सांगितलं, की जेव्हा ते anjikuni लेकच्या परिसरात reaserchसाठी गेले, तेव्हा त्यांना एक शिकारी आणि त्याचे दोन मुलं भेटले. त्यांनी सांगितलं, की त्यांनी अनेकदा तळ्यावरून उडताना वेगळ्याचं प्रकारचं ufo सारखे विमानं पाहिले, ज्यांचा आकार वेगवेगळा होता. आणि ते त्या वस्तीच्या दिशेनं उडताना दिसायच्या, जिथं एस्किमो लोक राहायचे. (Top Stories)

त्यांनी त्यांच्या लेखात लिहिलं की कदाचित त्या रात्री एलियन्स खाली उतरले आणि वस्तीतल्या सगळ्या लोकांना आपल्यासोबत घेऊन गेले. पण या एलियन्सच्या थिअरीसाठी या दोन लेखकांकडे कुठलाही ठोस पुरावा नव्हता. त्यामुळे बहुतेक लोकांनी यावर विश्वास ठेवला नाही आणि ही थिअरी नाकारली गेली. पण ही स्टोरी ती छापलेली बातमी खरी होती की खोटी, याबद्दल आज ही वाद आहेत. काही जणांचा विश्वास आहे की अंजिकुनी लेकजवळच्या त्या एस्किमो जमातीच्या वस्तीचं गूढ खरंच घडलं, आणि त्यामागे एलियन्स किंवा unknown power असू शकते. पण विकिपीडियानुसार, ही कहाणी एक urban legend म्हणजे लोककथा किंवा दंतकथा आहे. वर्षांनूवर्ष या स्टोरीमध्ये अतिशयोक्ती आणि चुकीच्या गोष्टी add होत गेल्या, त्यामुळे ही स्टोरी एक conspiracy ठरते. तरी पण, हा लेख 1930 मध्ये खरंच छापला गेला होता, त्यामुळे ही गोष्ट पूर्णपणे खोटी नाही. पण पुरावे नसल्यामुळे, ही एक गूढकथा समजली जाते. काही जणांना वाटतं, ही खरी आहे, तर काही म्हणतात, फक्त मनोरंजनासाठी रचलेली स्टोरी आहे.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.