Home » Veer Savarkar Jayanti : बोस-सावरकरांची ती भेट आणि…

Veer Savarkar Jayanti : बोस-सावरकरांची ती भेट आणि…

by Team Gajawaja
0 comment
Veer Savarkar Jayanti
Share

१९३० च्या दशकाचा काळ. भारतात स्वातंत्र्याची आग भडकली होती. एकीकडे गांधीजींचा अहिंसेचा मार्ग, तर दुसरीकडे क्रांतिकारकांचा सशस्त्र लढा. याच काळात दोन थोर व्यक्तिमत्त्वांची एकमेकांसोबत भेट झाली. ही भेट होती वीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांची. सावरकर, ज्यांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक लिहून क्रांतिकारकांना प्रेरणा दिली, आणि दुसरे नेताजी, ज्यांनी आपल्या धाडसी नेतृत्वानं स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. पण या दोघांची ऐतिहासिक भेट का घडली? आणि त्याचा स्वातंत्र्यलढ्यावर कसा प्रभाव पडला? चला, जाणून घेऊ. (Veer Savarkar Jayanti)

तर ही कहाणी सुरू होते १९४० मध्ये, मुंबईतल्या सावरकर सदनात. पण त्याआधी थोडं मागे जाऊया. सावरकर तेव्हा ५७ वर्षांचे होते. अंदमानातल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेनं आणि वर्षानुवर्षांच्या नजरकैदीमुळे त्यांचं शरीर थकलं होतं, पण मनातली स्वातंत्र्याची आग तसूभरही कमी झाली नव्हती. दुसरीकडे, सुभाषबाबू, वयानं सावरकरांपेक्षा १५ वर्षांनी लहान, ते काँग्रेसच्या व्यासपीठावरून ब्रिटिशांना आव्हान देत होते. १९३९ मध्ये त्यांनी गांधीजींच्या विरोधाला न जुमानता काँग्रेसचं अध्यक्षपद जिंकलं होतं. पण काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणानं त्यांना अस्वस्थ केलं होतं. त्यांना सशस्त्र क्रांतीचा मार्गच योग्य वाटत होता आणि इथेच सावरकर आणि बोस यांचे विचार जुळतात. तेव्हा नेताजींना ब्रिटिशांविरुद्ध देशव्यापी लढा उभारण्यासाठी ते सर्व राजकीय गटांचा, मग ते काँग्रेस असो, मुस्लिम लीग असो किंवा हिंदू महासभा असो, असा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा हवा होता. १९३९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नेताजींनी आपला स्वतःचा पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक स्थापन केला होता. त्यांना सर्व नेत्यांना एकत्र आणायचं होतं. सावरकर तेव्हा हिंदू महासभेचे अध्यक्ष होते, म्हणून नेताजींनी त्यांना भेटण्याचा निर्णय घेतला. (Top Stories)

Veer Savarkar Jayanti

सावरकरांचं म्हणणं होतं, “रणाविण स्वातंत्र्य कोणाला मिळालंय?” त्यांनी अभिनव भारताच्या माध्यमातून अनेक क्रांतिकारकांना संघटित केलं होतं. त्यांचं १८५७ चं पुस्तक नेताजींसह सगळ्या क्रांतिकारकांचं प्रेरणास्थान होतं. अगदीच भगत सिंग आणि सुखदेव यांनी आपल्या द्वारकादास लायब्ररीच्या राजाराम शास्त्री यांच्यासोबत मिळून सावरकरांचं ‘1857 चं स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकाचं भाषांतर करून घेतलं होतं. नेताजींना सावरकरांबद्दल खूप आदर होता. तेव्हा नेताजी कोलकात्यातील ‘ब्लॅक होल ट्रॅजेडी’शी संबंधित ब्रिटिश अधिकारी हालवेल याचा पुतळा हटवण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली होती.(Veer Savarkar Jayanti)

आणि मग २१ जून १९४०, सावरकर सदन, मुंबई इथे सावरकर आणि नेताजी यांची ऐतिहासिक भेट झाली. सावरकर आणि नेताजी एकमेकांसमोर बसले. आता काही इतिहासकारांच्या मते, सावरकरांनी नेताजींना स्पष्ट सांगितलं, “तुम्ही, आता देशात राहून छोट्या-मोठ्या आंदोलनात अडकू नका. ब्रिटिश तुम्हाला नजरकैदेत टाकतील. त्याऐवजी देशाबाहेर जा. जर्मनी, जपानसारख्या देशांशी हातमिळवणी करा. शत्रूचा शत्रू आपला मित्र, या मार्गाचा अवलंब करा. (Latest Marathi News)

तेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं नेताजींना वाटत होतं की युद्धाचा फायदा घेऊन ब्रिटिशांविरुद्ध लढता येईल. सावरकरांचेही युद्धाबाबत काही विचार होते, पण ते हिंदूंना ब्रिटिश सैन्यात सामील होण्यास प्रोत्साहन देत होते, ज्यावर नेताजींचे मतभेद होते. तरीही, काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की, सावरकरांनी नेताजींना परदेशातून क्रांती करण्याचा सल्ला दिला, ज्याचा परिणाम नेताजींच्या पुढील कृतींवर झाला. सावरकरांनी त्यांना रासबिहारी बोस यांच्याशी संपर्क साधायला सांगितलं, जे जपानमध्ये आझाद हिंद सेनेची तयारी करत होते. १९४१ मध्ये नेताजी भारतातून गुप्तपणे बाहेर पडले त्यांनी सावरकरांचं पत्र रासबिहारी बोस यांच्यापर्यंत पोहोचवलं. जर्मनी, जपानमध्ये त्यांनी मित्र बनवले. पुढे २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व स्वीकारलं. आझाद हिंद सेना उभी केली. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आज़ादी दूँगा!” हा त्यांचा नारा देशातल्या प्रत्येक तरुणाच्या मनात घुमला. १९४४ मध्ये, आझाद हिंद रेडिओवर बोलताना नेताजींनी सावरकरांचा आदराने उल्लेख केला. ते म्हणाले, “जेव्हा काँग्रेस सैनिक भरतीला विरोध करत होती, तेव्हा सावरकरांनी आम्हाला पाठिंबा दिला.” (Veer Savarkar Jayanti)

===============

हे देखील वाचा : Success Story : वडील सैन्यात अधिकारी, मुलगी IAF च्या मागी स्क्वाड्रनची प्रमुख वर्लिन पनवार, आता बॉलिवूडच्या कलाकारांना देतेय ट्रेनिंग

================

दुर्दैवाने, नेताजींचा १९४५ मधला विमान अपघात आणि त्यांचा मृत्यू याबद्दल अजूनही संशय आहे. १९५२ मध्ये, अभिनव भारताच्या विसर्जन समारंभात सावरकरांनी नेताजींच्या योगदानाचं कौतुक केलं होतं. ते म्हणाले, “सुभाषबाबूंचं स्वातंत्र्यासाठीचं योगदान अजरामर आहे.”(Veer Savarkar Jayanti)

आज काही लोक, जर ideology पटतं नसेल तर एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीत, सोशल मीडियाच्या कमेन्ट सेक्शनमध्ये तर वेगवेगळ्या ideology चे लोक एकमेकांना शिवीगाळ करत असतात. बोस आणि सावरकर यांचे विचार थोडे भिन्न होते. बोस सर्वधर्मसमभाव आणि समाजवादावर विश्वास ठेवत होते, तर सावरकर हिंदुत्वाच्या विचारांचे होते. पण भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्व त्यागलं, स्वातंत्र्यासाठी त्यांनी एकमेकांची भेट घेतली. आणि तेवढाच एकमेकांचा आदर सुद्धा केला. हेच या महापुरुषांकडून शिकण्यासारखं आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.