गेल्या काही वर्षात पृथ्वीवरील उष्णतेमध्ये वाढ होत आहे. दरवर्षी उन्हाळा सुरु झाला की, यावर्षीचा उन्हाळा अधिक कडक असणार, अशा आशयाच्या बातम्या येतात. पण यापुढे सर्वच ऋतु अधिक तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत. कारण सूर्याच्या सौरचक्रामुळे पृथ्वीलाच धोका निर्माण झाल्याची भीती खगोलशास्त्रज्ञांना वाटत आहे. पुढच्या जवळपास 100 वर्षात पृथ्वीवरील तापमानात वाढ होत जाणार आहे. काहीवेळा मनुष्याला सहन होणार नाही, असे तापमान वाढेल, अशी भीतीही शास्त्रज्ञांना वाटत आहे. (Summer)
कारण 100 वर्षांचे सौर चक्र पुन्हा सुरू झाले असून यापुढे सूर्याचे तापमान अधिक दाहक होणार आहेच, शिवाय पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अंतराळ स्थानकांनाही मोठा धोका उत्पन्न होणार असल्याची चिंता शास्त्रज्ञांना वाटत आहे. सूर्याच्या या नवीन हालचालीमुळे समस्त मानवजातीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. पृथ्वीचे सजीव ज्या सूर्यावर अवलंबून असतात, त्या सूर्याचा ताप पुढच्या काही वर्षात वाढण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. पुढच्या 100 वर्षांसाठी सूर्याचे तापमान अधिक रहाणार असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. या घटनेमुळे सर्वच मानवजातीला मोठा धोका निर्माण झाला आहे. शिवाय पृथ्वीभोवती फिरणा-या उपग्रहांनाही यापासून धोका होण्याची शक्यता आहे. (Latest News)
असे झाल्यास पृथ्वीवरील सर्व दळणवळण यंत्रणा काही काळासाठी ठप्प होण्याचीही भीती आहे. गेल्या काही वर्षात अंतराळातील घडामोडींचा अभ्यास काही शास्त्रज्ञांचा गट करत आहे. या शास्त्रज्ञांनी सूर्याच्या पृष्ठभागावर घडणाऱ्या हालचालींचाही अभ्यास केला आहे. यातून सूर्याच्या पृष्ठभागावर वेगानं घडत असलेल्या हालचालीमुळे पृथ्वीवर हानिकारक परिणाम होऊ शकतात, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याचा अभ्यास केल्यावर या शास्त्रज्ञांनी स्पेस वेदर जर्नलमध्ये अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यावर जगभरातील खगोलशास्त्रज्ञांनी आगामी काळासाठी चिंता व्यक्त केली आहे. (Summer)
या अहवालानुसार सूर्याच्या हालचाली काही वर्षात आश्चर्यकारक स्वरुपात बदलल्या आहेत. सूर्याचे कोरोनल ग्लोबल सर्क्युलेशन, उलट झाल्याची भीती यात व्यक्त करण्यात आली आहे. म्हणजेच 100 वर्षांचे सौरचक्र पुन्हा सुरू झाले असून हा सर्व अत्यंत तापदाक अशा वातावरणाचा काळ असणार आहे. हे धोकादायक हवामान पुढील दशकांपर्यंत अंतराळात टिकून रहाणार आहे. यामुळे पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अंतराळयानांनाही धोका निर्माण होणार असून सर्वच दळनवळन प्रक्रियाही काही काळ बंद होण्याची शक्यता आहे. सौरचक्र हे सूर्याच्या क्रियाकलापांचे एक नैसर्गिक चक्र आहे त्याचा कालावधी साधारणपणे 11 वर्षाचा असतो. (Latest News)
या चक्रात, सूर्याच्या पृष्ठभागावरील सौर डागांची संख्या, आणि सूर्याचे चुंबकीय क्षेत्र यात चढ-उतार होत असतात. या सर्वांचा पृथ्वीच्या वातावरणावर गंभीर परिणाम होतो. सूर्यावरील सौरवादळाची तीव्रता अधिक असल्यास त्याचा सर्वच उपग्रहांना मोठा धोका उत्पन्न होण्याची शक्यता आहे. सौर चक्राचा पृथ्वीवर अधिक काळासाठी परिणाम होतो. त्यामुळेच पुढची काही वर्ष ही पृथ्वीसाठी धोकादाक ठरु शकतात. सौर चक्रामध्ये सूर्याच्या पृष्ठभागावरील काळे डाग हे सौर क्रियाकलापांसह वाढतात आणि आकुंचन पावतात. शिवाय सूर्याच्या पृष्ठभागावर मोठे स्फोट होतात ज्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे मोठे स्फोट होतात. सूर्याचे हे चुंबकीय क्षेत्र दर 11 वर्षांनी ध्रुवांना उलट करते. त्याचा सर्वात जास्त परिणाम ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम म्हणजेच GPS प्रणालीवर होतो. (Summer)
=======
हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !
Portfolio Diet म्हणजे काय? घ्या जाणून सविस्तर इन्फो
=======
या सर्वांचाच खगोलशास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. या संशोधनातून येत्या काही दशकांत सौर क्रियाकलाप आणखी वाढू शकण्याची भीती आहे. अर्थात याचा कालावधी नेमका किती असेल, याबाबत खगोलशास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही. काही खगोलशास्त्रज्ञ हा कालावधी 11 वर्षांचा असेल असे सांगतात, तर काहींच्या मते ही क्रिया 100 वर्ष चालणारी आहे. या सर्व काळात पृथ्वीवरील उपग्रह संप्रेषण, पॉवर ग्रिड, अंतराळ मोहिमा, रेडिओ कम्युनिकेशन्स आणि ऑरोरा म्हणजेच उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर दिसणारे प्रकाश यावर परिणाम करू शकतात. आता या सौर हवामानातील बदलाचे वेळीच अचूक निदान करता यावे म्हणून जगभरातील खगोलशास्त्रज्ञ त्यावर लक्ष ठेऊन आहेत. यातून पृथ्वीवर येणा-या संभाव्य धोक्याची आधी माहिती जाणून घेण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. (Latest News)
सई बने