सुखदेव थापर, हे नाव आपल्या फक्त भगत सिंग आणि राजगुरू यांच्यासोबत फासावर लटकलेले क्रांतीकारक एवढ्यापुरतं माहितीये… पण एक २३ वर्षाचं कोवळ पण अंगानं तगड असलेलं पोर… मस्तीखोर… निस्त्या इतर क्रांतीकारकांच्या खोड्या काढणारा… सतत मक्याचे भूत्ते खात बसणारा…संघटनेच व्हीलेजर म्हणून फेमस असणारा… प्रत्येक प्लॅनिंगचा मास्टरमाइंड आणि मित्रांच्या जीवाला जीव लावणारा सुखदेव आपल्या अनेकांना माहित नाही. क्रांतीकारकांच्या देशासाठी बलिदान दिलेल्या अनेक कहाण्या आपण ऐकल्या… पण पर्सनल आयुष्यात ते कसे वावरत होते, मित्र म्हणून ते कसे राहत होते, कसे दंगा मस्ती करत होते, कसे क्रांतीसाठी एकजुटीने लढत होते… हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(Sukhdev History)
तर पहिला किस्सा असा की, आग्रामध्ये तेव्हा क्रांतिकारकांच्या सीक्रेट बैठका व्हायच्या. याचं कारण पण तसंच होतं, ब्रिटिश पोलिस त्यांच्यावर बारीक नजर ठेवून असायचे. तेव्हा सुखदेव यांच्या डाव्या हातावर ओम आणि आपलं नाव गोंदवलेलं होतं. जे त्यांनी त्यांच्या लहानपणीच गोंदवलं होतं आणि तेव्हा ते क्रांतिकारक संघटनेत सामील झालेले नव्हते. पण त्यामुळे एक मोठा प्रॉब्लेम झाला! पोलीस आधीच या सगळ्या क्रांतिकारकांच्या मागावर होते आणि हे सगळे त्यांच्या नजरा चुकवून किंवा वेष पालटून प्रवास करायचे. त्यांनी हातवर जे गोंदवलेलं होतं, त्यामुळे जरी त्यांनी कितीही गेटअप बदलला, तरी त्या हातावरच्या खूणेमुळे ते पकडले गेले असते. आता त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट सुरू झाली की, ही खूण कशी मिटवायची? हा विचार करत असताना त्यांच्या डोक्यात एक विचित्र आयडिया आली. त्यांचं असं झालं की, हीच ती वेळ आहे, आपण आपली सहनशक्ती अजमावून पाहुयात..(Top Stories)
मग त्यांनी काय केलं? क्रांतिकरकांची बॉम्ब बनवायची सिक्रेट जागा होती. तिथे ते गेले, बॉम्ब बनवायला लागणारं नायट्रिक अॅसिड उचललं, आपल्या डाव्या हातावर जिथे गोंदवलं होतं, त्या जागी लावलं. लगेचच त्यांची स्कीन जळायला लागली, जखम वाढायला लागली, हात सुजला, त्यांना ताप आला आणि त्यांनी तब्येत खराब व्हायला लागली. (Sukhdev History)
आता दूसरा दिवस उजाडला, पण अजूनसुद्धा ती गोष्ट तिथल्या कोणालाच कळली नाही आणि त्यांनी कोणाला सांगितलीसुद्धा नाही. त्यांनी आंघोळीला जाण्यासाठी कुर्ता काढला. तेव्हा तिथे बाजूलाच भगत सिंह आणि चंद्रशेखर आझाद होते. त्यांची नजर सुखदेव यांच्या डाव्या हाताकडे गेली. ते बघून त्या दोघांची तळपायची आग मस्तकात गेली, दोघेसुद्धा त्यांच्या भरपूर रागावले. त्यावर सुखदेव फक्त हसले आणि म्हणाले, “शिनाख्त की निशानी भी मिट जाएगी आणि अॅसिडची जलन कशी असते हे सुद्धा कळेलच! (Top Stories)
त्यानंतर ते चार-पाच दिवस आग्राला होते. त्यांना मित्र औषध घे, मलमपट्टी कर,असं सांगून कंटाळले. पण सुखदेव हट्टी, कोणाचंच ऐकत नव्हते. काही दिवसांनी ते लाहोरला गेले. तो पर्यंत त्यांच्या जखमा आधीपेक्षा बऱ्या झाल्या होत्या. पण अजून सुद्धा ती खून पूर्ण मिटली नव्हती. ते लाहोरमध्ये असताना दुर्गा भाभींच्या घरी गेले. दुर्गा भाभी या भगवतीचरण वोहरा यांच्या पत्नी आणि HSRAच्या महिला क्रांतिकारी… त्या स्वयंपाकघरात होत्या आणि सुखदेव हे भगवती भाईंच्या खोलीत बसले होते. बराच वेळ झाला, सुखदेव यांचा काहीच आवाज आला नाही. दुर्गा भाभींना टेंशन यायला लागलं. सुखदेव काय करतायत हे बघायला त्या गेल्या आणि त्यांनी पाहिलं की, टेबलावर मेणबत्ती लावलेली आहे आणि हाताचा निशाण असलेला भाग ते आगीवर धरून बसलेत. त्यांची तिथली स्कीन पूर्ण जळाली होती, तरीही ते एखाद्या सन्यासासारखे शांत बसले होते. हे बघून दुर्गाभाभी घाबरल्या. त्यांनी लगेच मेणबत्ती विझवली, त्यांच्यावर रागावल्या आणि यावेळेससुद्धा सुखदेव फक्त हसतच होते. असे हे अवलिया. त्यांच्यासाठी हा फक्त ते निशाणच मिटवायचा प्रयत्न नव्हता, तर तो सहनशक्तीचा खेळ होता आणि त्यात ते जिंकले होते. (Sukhdev History)
तर आता त्यांचा दूसरा किस्सा, तो जरा मजेशीरच आहे.
सुखदेव यांचा स्वभाव म्हणजे एकदा ठरवलं की, मग जमीन आकाश एक होऊदे ते मागे हटणारच नाहीत. तर झालं असं की, ते एकदा ‘जुजुत्सु’ नावाचं जपानी पुस्तक वाचत होते. तर जुजुत्सु हा जपानचा मार्शल आर्ट फॉर्म. त्यात त्यांनी वाचलं की, जर एखाद्या हट्ट्याकट्ट्या माणसासोबत मारामारी झाली तर अशा वेळेस आत्मरक्षणसाठी काय करायचं? तर.. त्यावेळेस त्याच्या नाकावर एक ठोसा मारायचा. त्यामुळे काय होईल की तो गोंधळून जाईल आणि त्याला हरवणं सोप्पं जाईल. आता हे ऐकल्यावर आपल्याला अंदाज येतो की, जर नाकावर ठोसा मारला की समोरच्याचं काय होईल. पण फक्त वाचून विश्वास ठेवतील ते सुखदेव कसले. त्यांना प्रत्यक्षात ते करून बघायचंच होतं. (Top Stories)
त्या काळात गांधीजीं दर महिन्याच्या १८ तारखेला उपवास ठेवायचे. सुखदेवसुद्धा हा उपवास करायचे. एकदा, असंच उपवासच्या दिवशी ते रस्त्यावरून एकटे चालत होते. पोटात भुकेमुळे कावळे ओरडत होते, तरी डोक्यात एकच गोष्ट, ती जुजुत्सुची टेक्निक. त्यांचं ठरलंच होतं की, हे एकदा तरी ट्राय करून बघायचंच आहे आंनी नशीब बघा ना काय? तेवढ्यात त्यांना समोरून एक हट्टाकट्टा माणूस चालताना दिसला. उंच, मजबूत आणि त्यांच्यापेक्षा अडीचपट स्ट्रॉंग असेल. (Sukhdev History)
===============
हे देखील वाचा : Milan : मिलानच्या फॅशन शोमध्ये कोल्हापूरी चप्पल झळकताच वाद सुरु !
================
हीच ती संधी हाच तो क्षण. ते त्याच्याजवळ गेले आणि एक जोरदार नाकावर ठोसा मारला. तो माणूस कळवायला लागला. सुखदेव तिथेच त्याच्याजवळ उभे राहून परीक्षेचा रिजल्ट काय लागतोय, याच विचारात त्याच्याकडे बघतच राहिले. सुखदेव यांना वाटलं की, टेक्निक सक्सेसफुल झाली. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. तो माणूस शुद्धीवर आला आणि त्याने त्यांच्याकडे रागाने पाहिलं. आता या अवस्थेत कोणी असतं तर पळून गेलं असतं, पण नाही. सुखदेव तसेच त्याचकडे बघत उभे. तो माणूस त्यांच्यावर झडप घालणार तेवढ्यात ते तिथून पळाले. त्यात त्यांचा उपवास आणि पोटात काहीच नाही. मग मध्येच ते अचानक थांबले आणि मार खायला खाली बसले.तो माणूस त्यांना मारत होता, तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्या माणसाला अडवलं. त्यांनी सुखदेव यांना विचारलं, “तो माणूस तुम्हाला का मारत होता?” त्यावर ते म्हणाले, “मी आधी त्याला मारलं. आता मी त्याला सांगितलं मला मार.” आणि या नंतर नाकावर ठोसा मारल्याचे परिणाम काय होतात? याचा सुखदेव यांना चांगलाच अंदाज आला. (Top Stories)
तर असे होते सुखदेव, ते कितीही खोडकर किंवा अतरंगी स्वभावाचे असले तरी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ते कुठेच कमी पडले नाहीत. सुखदेव यांचे हे किस्से तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.
संदर्भ:
संस्मृतियाँ – शिव वर्मा
यश की धरोहर: क्रांतिकारियों के संस्मरण – भगवानदास माहौर, सदाशिवराव मलकापुरकर, शिव वर्मा
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics