चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला, सर्वत्र रामनवमीचा सण साजरा केला जातो. श्रीराम नवमी हा एक हिंदू लोकांचा महत्वाचा सण आहे. भर दुपारी सूर्य डोक्यावर आल्यानंतर श्रीरामांचा अयोध्येमध्ये जन्म झाला होता. यंदा ६ एप्रिल रविवार रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे. रामनवमीच्या दिवशी संपूर्ण देशात मोठ्या जल्लोषात रामजन्माचा सोहळा साजरा केला जातो. श्रीरामाच्या मूर्तीला यावेळी पाळण्यात घातले जाते. गाणे म्हटले जाते. लवकरच आपण रामनवमी साजरी करणार आहोत, त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया श्रीरामाच्या जन्माची रंजक कथा. (Ramnavmi)
महाराज दशरथांनी पुत्र प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. महाराजांच्या आज्ञेनुसार श्यामकर्ण अश्व चतुरंगिनी सेनेसह सोडवण्यात आला. महाराज दशरथ यांनी सर्व मनस्वी, तपस्वी, विद्वान ऋषी-मुनींना आणि वेदविज्ञ प्रकांड पंडितांना यज्ञ संपन्न करण्यासाठी आमंत्रित केले. योग्य वेळ आल्यावर अभ्यागतांसह महाराज दशरथ आपले गुरु वशिष्ठ आणि आपले परम मित्र अंग देशाचे अधिपती लोभपाद यांचे जामाता ऋंग ऋषींसह यज्ञ मंडपात आले. संपूर्ण वातावरण वेदांच्या ऋचांच्या उच्च स्वरात पाठ उत्स्फूर्त झाले होते.(Shriram Birthstory)
=========
हे देखील वाचा : Kitchen Tips : ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून चाकू, कात्रीला द्या घरच्या घरी धार
==========
अशातच यज्ञातून देव पायस घेऊन प्रगट झाले. राजा दशरथाने ते पायस घेतले आणि पत्नी कौशल्येला दिले. त्यातून अर्धा हिस्सा कौशल्येने कैकैला दिला. मग आपल्यातला अर्धा अर्धा हिस्सा त्या दोघींनी तिसरी राणी सुमित्राला दिला. पुढे दशरथ राजाने यज्ञस्तही आलेल्या सर्व पंडित, ब्राह्मण, ऋषींना योग्यतेनुसार धन-धान्य, गौ इतर भेट देऊन निरोप दिला. प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणामस्वरुप तिन्ही राण्या गर्भवती झाल्या.(Trending Marathi News)
चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला अर्थात राम नवमीला पुनर्वसु नक्षत्रात श्रीरामांचा जन्म झाला. श्रीरामांच्या जन्माच्यावेळी ग्रहांची स्थिती फार शुभ होती. या दिवशी पाच ग्रह सूर्य, मंगळ. गुरू, शुक्र आणि शनि आपल्या उच्च राशीत स्थित होते. या ग्रहांच्या शुभ प्रभावात त्रेता युगात राजा दशरथाच्या घरी विष्णू अवतार, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जन्म झाला. शिशु नील वर्ण, चुंबकीय आकर्षण, खूप तेजस्वी, परम कांतीवान आणि अत्यंत सुंदर होते. त्या शिशुकडे बघणारे टक लावून बघतच राहायचे. यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभ घडीत महाराणी कैकेयीने भरत यांच्यासह तिसरी राणी सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या दोन तेजस्वी पुत्रांना जन्म दिला. (Marathi Top News)
संपूर्ण राज्यात आनंद पसरला. महाराजांच्या घरी चार पुत्रांच्या जन्मामुळे गंधर्व गायन करु लागले. अप्सरा नृत्य करु लागल्या. देवता आकाशातून फुलांचा वर्षाव करु लागले. महाराजांनी मुक्त हस्ताने राजद्वारावर आलेल्या भाट, चारण आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या ब्राह्मण आणि याचकांना दान-दक्षिणा दिली. दशरथ राजाने पुरस्कार स्वरुप प्रजेला धन-धान्य आणि दरबारात असणार्यांना दागिने, रत्न प्रदान केले गेले. चारी पुत्रांचं नामकरण महर्षी वशिष्ठ यांच्याद्वारे केले गेले. त्यांचे नाव राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवले गेले.(Top Stories)
श्रीराम हे विलक्षण प्रतिभेचे धनी होते परिणामस्वरूप अल्प काळातच ते सर्व विषयांत पारंगत झाले. आपल्या भावांपेक्षा ते अधिक हुशार आणि तेजस्वी होते. त्यांची कीर्ती सतत दूरवर पोहचत होती. प्रभू रामाचें आपल्या तिन्ही भावांवर प्रचंड प्रेम होते.राम हे सर्व प्रकाराच्या अस्त्र-शस्त्र हाताळणे आणि हत्ती-अश्व यांसह सर्व प्रकाराच्या वाहनांवर स्वारी करण्यात निपुण झाले. (Social News)
=========
हे देखील वाचा : Ramnavmi : रामनवमी कधी आहे? रामनवमीचे महत्व काय?
=========
सतत माता-पिता आणि गुरुजनांच्या सेवेत असायचे. त्यांचे तिघं भाऊ देखील त्यांच अनुसरण करायचे. चारी भावांमध्ये कायमच आपल्या गुरुंबद्दल आदर आणि श्रद्धा होती. चारी भावडांमध्ये प्रेम आणि सन्मानाची भावना देखील होती. या चौघं मुलांना पाहून महाराज दशरथ मनापासून अभिमानाने व आनंदाने भरुन जात असे.