तुमचे करियर पूर्ण झालेयं आणि आता नोकरी ही मिळाली आहे, ही खुप आनंदाची बाब आहेच. कारण पहिली नोकरी, पहिला पगार या सर्व गोष्टीचा आपल्याला खुप आनंद होतोच. मात्र योग्य वेळी जर तुम्ही तुम्हाला मिळणाऱ्या पैशातून बचत करण्याची सवय लागली पाहिजे. जेणेकरुन तुम्ही आर्थिक रुपात आत्मनिर्भर होऊ शकता. आपल्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा आपले खर्चच अधिक असतील तर तुम्ही नोकरी करुन काहीच फायदा नाही. म्हणूनच बचत करण्याची सवय असेल तर एखादे आर्थिक संकट जरी उभे राहिले तेव्हा तुम्ही तुमच्या बचतीमधील काही हिस्सा त्यावेळी वापरु शकता. तर जाणून घ्या नोकरी करताना पैशांची बचत कशी करावी त्याबद्दल अधिक.(Saving Tips)
बचतीची सवय तुम्ही स्वत:ला जेवढ्या लवकर लावून घ्याल तेवढ्या लवकर तुम्हाला तुमच्या पैशांवरील व्याजाचा फायदा घेता येऊ शकतो. अशातच तुमच्यावर स्टुडेंट लोन असेल तर ते आधी फेडा. कारण नोकरी करण्यासाठी आणि नोकरी मिळण्यादरम्यानच्या कालावधीत तुम्हाला हे कर्ज फेडण्यासाठी कालावधी दिला जातो. दरम्यान या काळात एकूण रक्कमेवरील व्याज वाढत जाते. यामुळेच जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही कर्ज फेडण्यास सुरुवात करा. असे केल्यास तुमच्या व्याजाचा बोझा सुद्धा कमी होतो.
हे देखील वाचा- पीपीएफ खात्यातून Maturity पूर्वी पैसे काढू शकतो का?
![Saving Tips](https://kfacts.in/wp-content/uploads/2022/06/savings.jpg)
तसेच नेहमीच एक आपले बजेट तयार करा. जेणेकरुन तुम्हाला तुमच्याकडे किती पैसे आहेत किंवा किती पैसे खर्च करु शकतो हे कळेल. 70:30 च्या हिशोबाने बचत आणि खर्च करा. महिन्याअखेर पर्यंत तुमच्याकडे किती पैसे शिल्लक राहतील हे सुद्धा पहा आणि आपला खर्च कसा कमी होईल याकडे सुद्धा लक्ष द्या. या व्यतिरिक्त बचत करण्यासाठी कोणत्या अशा योजना आहेत त्याबद्दल अधिक माहिती मिळवा. कारण योग्य वयात बचतीची सवय लागल्यास पुढे जाऊन तुम्हाला एखादे घऱ जरी घ्यायचे झाल्यास ते तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
बचतीच्या माध्यमातून जर तुम्हाला उत्तम रिर्टन्स हवे असल्यास SIP मध्ये गुंतवणूक करु शकता. ही रक्कम 500 रुपये सुद्धा असू शकते. जेवढा तुमचा पगार वाढेल तेवढी तुमची एसआयपीची रक्कम तुम्ही वाढवू शकता. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 5 हजारांची जरी गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर 12 टक्के वार्षिक व्याज मिळते. अशातच 30 वर्षात तुमच्याकडे 1.8 कोटी रुपयांची रक्कम जमा होऊ शकते.(Saving Tips)
तुम्ही नोकरी करण्यासाठी खुप मेहनतीसह बचत ही करत आहात. मात्र एखाद्या आर्थिक संकटामुळे तुम्ही बचत केलेली रक्कम एका फटक्यात संपण्याची शक्यता असते. अशातच पुरेशी बचत नसेल तर काही समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच पगारातील अतिरिक्त पैसे हे आपत्कालीन संकटांसाठी बाजूला काढून ठेवावेत. तुमच्याजवळ 6 महिने ते वर्षभराच्या हिशोबाने आपत्कालीन फंड असला पाहिजे.