सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्यानंतर मिडियाचा सर्व लाईम लाईट या पतौडी खानदानावर केंद्रीत झाला आहे. सैफच्या मुंबईमधील अलिशान घरामध्ये एका साध्या चोरानं जखमी केलं. जखमी अवस्थेत सैफ स्वतःहून रुग्णालयात दाखल झाला आणि जगातील सर्वात महत्त्वाची बातमी म्हणून या घटनेकडे बघितले गेले. आता याच पतौडी खानदानातून अशीच एक बातमी आली आहे, ज्यामुळे मिडियात पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. पतौडी कुटुंबाची 15 हजार कोटींची मालमत्ता लवकरच मध्यप्रदेश सरकारकडे जमा होणार आहे. पतौडी कुटुंबापैकी कोणीही या संपत्तावर मुदत देऊनही दावा केला नसल्यामुळे ही संपत्ती सरकार जमा होणार आहे. मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये पतौडी कुटुंबाची मोठी मालमत्ता आहे. गेली अनेक वर्ष या मालमत्तेवरुन न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या मालमत्तेमध्ये आत्ता पतौडी कुटुंबातील कोणालाही स्वारस्य नसल्यानं सरकारनं ती जमा करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. (Saif Ali Khan)
शत्रू मालमत्ता कायद्याअंतर्गत मध्यप्रदेश सरकार या मालमत्तेचा ताबा घेणार आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने 2015 पासून या मालमत्तेवर लादलेली बंदी उठवली आहे. अशा परिस्थितीत ही मालमत्ता शत्रूची मालमत्ता मानली जाते. या मालमत्तेवर ताबा असलेले पतौडी कुटुंबातील नवाब हमीदुल्लाह यांची मोठी मुलगी आबिदा पाकिस्तानमध्ये गेल्यावर या मालमत्तेवर सैफ अली आणि त्यांच्या कुटुंबियांचे नाव आले. सैफची आई शर्मिला टागोरही यात आहे. त्यांनी याबाबत दावा केला होता. मात्र सैफ अली खानच्या या मालमत्तेवर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने 2015 ची स्थगिती उठवली. त्यानंतर सैफ अली खान-शर्मिला टागोर यांनी कोणताही दावा या मालमत्तेवर केला नाही. त्यामुळे आता मध्य प्रदेश सरकार या मालमत्तेचे सर्वेक्षण करणार असून ही मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई होऊ शकते. असे झाले तर सैफ अली खान हा पतौडी कुटुंबातील शेवटचा नबाब ठरणार आहे. (Latest Updates)
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने अभिनेता सैफ अली खान, त्याची आई शर्मिला टागोर, बहिणी सोहा आणि सबा अली खान तसेच पतौडीची बहीण सबिहा सुलतान यांना शत्रू संपत्ती प्रकरणात अपीलीय अधिकाऱ्यांसमोर त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी या पतौडी कुटुंबाला 30 दिवसांची मुदतही देण्यात आली होती. परंतु दिलेल्या मुदतीत कोणीही आपली बाजू मांडली नाही. त्यामुळे या मालमत्तेवरील स्थगिती उठवण्यात आली आल्याची माहितीही देण्यात आली आहे. न्यायमूर्ती विवेक अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. अर्थात न्यायालयाच्या या निर्णयानंतर, आता पतौडी कुटुंब या आदेशाला डिव्हिजन बेंचमध्ये आव्हान देऊ शकते.
सैफ अली खान याला पतौडी कुटुंबातील नबाब ही पदवी वंशपरंपरागत मिळाली आहे. पतौडी कुटुंबाचे पूर्वज सलामत खान 1408 मध्ये अफगाणिस्तानातून भारतात आल्याचे सांगितले जाते. सलामतचा नातू आल्फ खान याने अनेक युद्धांमध्ये मुघलांना साथ दिली. यामुळे, अल्फ खानला राजस्थान आणि दिल्लीमध्ये भेट म्हणून जमिनी मिळाल्या. (Saif Ali Khan)
================
हे देखील वाचा : Kinder Joy या चॉकलेटचा इतिहास काय ?
SaifAliKhan : आधी शाहरुखच्या घराची रेकी, मग सैफवर हल्ला आरोपीने प्लॅन करून गेम केलाय?
================
त्यातूनच या पतौडी कुटुंबाची रियासत सुरु झाली. इंग्रजांनी त्यांना नबाब बनवल्याचीही माहिती आहे. इफ्तिखार अली हुसेन सिद्दीकी पतौडी राज्याचे आठवे नवाब बनले. सैफ यांच्या वडिलांमुळे, मन्सुर अली खान पतौडी यांच्यामुळे पतौडी कुटुंब अधिक प्रसिद्धीच्या झोकात आले. ते भारतीय क्रिकेटमधील प्रसिद्ध खेळाडू होते. लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाल्यामुळे पतौडी कुटुंबाला अधिक प्रसिद्धी मिळाली. पुढे सैफ अली खान बॉलिवूडमध्ये आला आणि आता हे कुटुंब सोशल मिडियावर सर्वाधिक चर्चेत असलेले कुटुंब झाले आहे. पतौडी कुटुंबाची संपत्ती किती आहे, याची मोजदाद नाही. मात्र हे कुटुंबही जुन्या महालांच्या देखरेखीमध्ये येणा-या खर्चामुळे बेजार झाल्याची माहिती आहे. मध्यंतरी दिल्ली येथील असेच जुने घर दुरुस्त करण्यात आपली सगळी पुंजी खर्च पडल्याची कबूली सैफनं दिली होती. मन्सुर अली खान यांच्या निधनानंतर या कुटुंबानं अनेक वंशपरांपरागत जमिनी आणि घरांची विक्री केली आहे. (Latest Updates)
सई बने