उद्या आपण आपल्या देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करणार आहोत. २६ जानेवारीच दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी खूप खास आणि महत्त्वाचा दिवस आहे. आपला राष्ट्रीय सण म्हणून प्रजासत्ताक दिवस अर्थात गणतंत्र दिन साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. त्यामुळेच या खास दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. (Republic Day)
१९४७ मध्ये भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची राज्यघटना लोकशाही बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्याचे काम सुरू झाले. या कामाला २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवस लागले. त्यानंतर हे तयार झालेले भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाच्या संविधान सभेने स्वीकारले. पुढच्याच वर्षी २६ जानेवारी १९५० रोजी संपूर्ण देशात ही राज्यघटना लागू झाली. (Top Stories)
२६ जानेवारीच्या दिवशी संपूर्ण देशामध्ये राष्ट्रध्वज फडकवला जातो. दिल्लीमध्ये देखील राष्ट्रपतींच्या हस्ते हा राष्ट्रध्वज फडकवला जातो. मात्र तुम्हाला माहित आहे का आपला राष्ट्रध्वज फडकविण्याचे नियम आहेत. २००२ सालाआधी सामान्य भारतीयाला फक्त स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाची परवानगी देण्यात आली होती. मात्र २६ जानेवारी २००२ पासून यात बदल करण्यात आले, आणि कोणताही नागरिक कोणत्याही दिवशी ध्वज फडकवू शकतो असा नियम तयार केला गेला. मग ध्वज फडकवण्याचे नियम कोणते चला जाणून घेऊया. (Latest Marathi News)
– तिरंगा ध्वज हा नेहमी लोकर, सूत, सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा. झेंड्याचा आकार नेहमी आयताकारच असायला हवा. लांबी आणि रुंदीचे प्रमाण ३:२ असे असावे. झेंड्यामध्ये केशरी रंग खालील बाजूस ठेवून झेंडा फडकवू नये.
– तिरंगा कधीही पाण्यात बुडवू नये. झेंड्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये. तिरंग्याचा कोणताही भाग जळालेला असल्यास तसेच तिरंग्याबद्दल अवमानकारक टिपण्णी केल्यास तीन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
– फडकविलेला तिरंगा त्याच स्थितीत कायम राहायला हवा. फाटलेला, मळलेला वा चुरगळलेला तिरंगा फडकवू नये. त्यावर योग्य पद्धतीने पुढील सोपस्कार करावे.
– तिरंगा एखाद्या मंचावर फडकवला असल्यास, वक्ता भाषण करत असताना तिरंगा त्याच्या उजवीकडे असणे आवश्यक आहे.
– राष्ट्रध्वजापेक्षा इतर कोणताही झेंडा किंवा पताका उंच किंवा त्याच्यावर किंवा त्याच्याबरोबर लावू नये.
– सूर्योदयापासून ते सूर्यास्तादरम्यान तिरंगा फडकविता येतो. तिरंगा कधीही जमिनीवर ठेवता येत नाही. झेंडा अर्ध्यावर ठेवून फडकवू नये. काही प्रसंगी सरकारी आदेश असल्याशिवाय सरकारी इमारतीवरील तिरंगा अर्ध्यावर आणण्यास मनाई आहे.
– तिरंग्याचा व्यावसायिक वापर करू नये. तिरंग्याचा गैरवापर कुणी करत असेल, तिरंगा वस्त्र म्हणून वापरत असेल किंवा शहीद जवान वगळता कोणी मृतदेहाभोवती तिरंगा लपेटत असेल तर तो तिरंग्याचा अपमान असतो. शिवाय जर एखादी व्यक्ती कमरेच्या खालीली वस्त्रासाठी तिरंग्याचा कापड म्हणून वापर करत असेल तर तो तिरंग्याचा अपमान आहे.
================
हे देखील वाचा : Sanjay Gandhi : संजय गांधी यांना आणीबाणीचे खलनायक का बोललं जातं ?
================
– तिरंग्याचा वापर कधीही गणवेश म्हणून करू नये. तिरंग्याचा रुमाल किंवा उशीसाठीही वापर करता येणार नाही.
– तिरंग्यावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत. विशेष प्रसंगी किंवा राष्ट्रीय दिन जसे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकविण्यापूर्वी त्यात फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास हरकत नाही.
– एखाद्या कार्यक्रमात व्यासपीठावरील टेबल झाकण्यासाठी किंवा मंचाची सजावट करण्यासाठी तिरंग्याचा वापर करू नये. गाडी, रेल्वे किंवा विमानाचे छत वा अन्य भाग झाकण्यासाठी तिरंग्याचा वापर करता येणार नाही. एखाद्या इमारतीत तिरंग्याचा पडदा लावण्यासही सक्त मनाई आहे.