जानेवारी महिना म्हणजे प्रजासत्ताक दिन हे समीकरण झाले आहे. जानेवारी महिन्याची सुरुवात झाली की, सगळीकडे देशभक्तीचे वारे वाहू लागतात. या महिन्यात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो. भारतात प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा दिल्लीमधील कर्तव्य पथावर आयोजित केला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रपती ध्वज फडकवतात. त्यानंतर सुरु होते परेड. यामध्ये संपूर्ण जगाला देशाची ताकद दाखवली जाते, शिवाय विविध राज्यांचे सांस्कृतिक रथ देखील दाखवले जातात. या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या सोहळ्यासाठी परदेशातून प्रमुख पाहुण्यांना आमंत्रण दिले जाते. दरवर्षी नवनवीन दिग्गज व्यक्तिमत्व या सोहळ्यासाठी भारतात येतात. मात्र या प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते जाणून घेऊया. (Republic Day)
यावर्षी भारत आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. याची जय्यत तयारी दिल्लीमध्ये सुरु आहे. सोबतच यंदाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे कोण असणार आहे, याची माहिती समोर आली आहे. यंदा युरोपियन युनियनचे (EU) वरिष्ठ नेते यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. यामध्ये युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन हे दोघेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या नेत्यांचे भारतात होणारे आगमन हे भारत–युरोपियन युनियनमधील धोरणात्मक, राजकीय आणि आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे सांगितले जात आहे. (Todays Marathi Headline)

अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेयेन हे 25 ते 27 जानेवारी 2026 दरम्यान भारताच्या तीन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर असतील. या काळात ते: भारत–EU शिखर परिषदेत सहभागी होतील. प्रजासत्ताक दिनाशी संबंधित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील. भारतामध्ये प्रजासत्ताक दिनासाठी परदेशी प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्याची परंपरा १९५० पासून सुरू झाली. देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन साजरा झाला तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाचा चीफ गेस्ट होणे हे कोणत्याही देशाच्या किंवा आंतरराष्ट्रीय संघटनेच्या नेत्यासाठी सर्वोच्च सन्मान मानले जाते. (Top Stories)
प्रमुख पाहुण्यांची निवड कशी होते?
ही प्रक्रिया प्रजासत्ताक दिनाच्या सहा महिने आधी सुरू होते. परराष्ट्र मंत्रालय ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडते. सर्वप्रथम, राजकीय आणि राजनैतिक संबंध, आर्थिक आणि संरक्षण सहकार्य, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध आणि जागतिक संदर्भ यांच्या संदर्भात एक यादी तयार केली जाते. प्रादेशिक गटांमधील प्रमुखता, लष्करी सहकार्य किंवा अलाइन चळवळीसारख्या संघटनांद्वारे दीर्घ संबंध यांचा समावेश होतो. ही यादी वेगवेगळे विषय लक्षात घेऊन तयार केली जाते. म्हणजेच कधीकधी एखाद्या देशाशी खूप चांगले संबंध असल्यामुळे त्या देशातून प्रमुख पाहुण्याला आमंत्रित केले जाते आणि कधीकधी एखाद्या देशाशी चांगले संबंध नसतानाही आपले संबंध मजबूत करावेत या उद्देशाने आमंत्रण पाठवले जाते. कधीकधी प्रमुख पाहुण्यांची यादी काही विशिष्ट उद्देश पूर्ण करण्यासाठी तयार केली जाते. (Latest Marathi News)
त्यानंतर परराष्ट्र मंत्रालय संभाव्य पाहुण्यांबाबत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची मंजुरी घेते. परराष्ट्र मंत्रालयाची मान्यता मिळाल्यास, ते संबंधित देशातील भारतीय राजदूतामार्फत, संबंधित व्यक्तीची उपलब्धता तपासण्याचा प्रयत्न करते. हे आवश्यक आहे, कारण राज्याच्या प्रमुखाच्या इतर वचनबद्धता असू शकतात. विविध विभाग करतात कार्य : एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, परराष्ट्र मंत्रालयातील प्रादेशिक विभाग वाटाघाटी आणि करारासाठी कार्य करतात, तर प्रोटोकॉल प्रमुख कार्यक्रमाच्या तपशीलांवर कार्य करतात. एवढेच नाही तर सुरक्षा, अन्न आणि वैद्यकीय गरजा यासारख्या इतर बाबींचीही काळजी घेतली जाते. हे भारत सरकारचे इतर विभाग आणि प्रजासत्ताक दिनाच्या आधी किंवा नंतर प्रमुख पाहुणे भेट देऊ शकतील, अशा राज्यांच्या सरकारांच्या समन्वयाने केले जाते. (Top Trending Headline)
======
Republic Day : प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?
======
एकदा का आमंत्रण स्विकार केल्यानंतर पुढील काही गोष्टी केल्या जाता. जसे मुख्य अतिथींसोबत कोणकोण येणार, त्यांचा खासगी स्टाफ ज्यामध्ये सुरक्षारक्षक, वैद्यकिय आणि अन्य अधिकाऱ्यांचा समावेश असतो. अतिथींच्या परिवारातील सदस्य सुद्धा येतात. त्यांच्यासाठी सुद्धा खास काळजी घेतली जाते. प्रजासत्ताक दिनावेळी प्रमुख पाहुणे हे खास आकर्षण असतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
