Home » मुलांनो ‘या’ चुका करणे टाळा नाहीतर मुली काढतील पळ

मुलांनो ‘या’ चुका करणे टाळा नाहीतर मुली काढतील पळ

by Team Gajawaja
0 comment
Signs of strong relationship
Share

प्रत्येकाला आपल्या पार्टनरकडून काही अपेक्षा असतात. त्यामुळे आपण जरी एखादी मनातील गोष्ट बोलून दाखवली तर त्यासाठी पार्टनर आपल्याला साथ देईल अशी अपेक्षा असते. कारण नात्यात एकमेकांना समजून घेणे आणि प्रत्येकाच्या निर्णयाचा आदर करणे सर्वाधिक महत्वाचे असते. परंतु काही जणांचे रिलेशनशिप हे खुप चांगले सुरु असले तरीही काही कारणांमुळे खटके उडतात. त्यामुळे नात्यात कालांतराने दूरावा येत ते तुटण्याची अधिक शक्यता असते. मात्र मुलांनो तुम्ही अशा काही गोष्टी करणे टाळा जेणेकरुन मुली तुमच्यापासून पळ काढतील. नात्यामध्ये जरी एखाद्या कारणावरुन वाद झाले तरीही तो शांतपणे सोडवा. तसेच एकमेकांच्या वागण्यावर ताशेरे ओढण्यापेक्षा आपण किती सामज्यंसपणे वागू शकतो याकडे लक्ष द्या.(Relationship Tips)

-पर्सनल स्पेस द्या
रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर बहुतांश मुलं एक कॉमन चुक करतात ती अशी की, त्यांना असे वाटते आपली गर्लफ्रेंड आपल्याशीच दिवसभर बोलली पाहिजे. एखाद्या कारणामुळे ती व्यस्त असेल किंवा फोनचे उत्तर देत नसेल तर मुलांनो तुम्ही विचित्र पद्धतीने रिअॅक्ट करता. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जशी अन्य माणसं महत्वाची आहेत तशीच माणसं तुमच्या प्रेयसीच्या आयुष्यात ही असतील. जर तुम्ही तिला पर्सनल स्पेस दिला नाही तर तिला आपण एका नियमांच्या चौकटीत अडकल्यासारखे वाटेल आणि नाते संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करेल.

-संशयी वृत्ती ठेवू नका
काही मुलं आपली प्रेयसी खुप वेळ फोनवर कोणाशी तरीही बोलत असेल तर तिच्यावर ते लगेच संशय घेतात. तेव्हा स्क्रिनशॉट पाठव किंवा तिचा मोबाईल तपासून पाहतात. मात्र ही गोष्ट अत्यंत चुकीची आणि तुमच्या नात्यात फुट पाडण्यासारखी आहे. त्यामुळे मुलीला वाटते की, आपण जरी काही करत नसलो तरीही आपला पार्टनर आपल्यावर उगाचच संशय घेतोय.

Relationship Tips
Relationship Tips

-लहान-लहान गोष्टींवरुन संतापणे थांबवा
आपण पाहतो जेव्हा कपल्समध्ये भांडण होतात तेव्हा ते वेळ आणि ठिकाण पाहत नाही. तेथेच एकमेकांवरील संताप व्यक्त करतात. मात्र जर तुम्ही सुद्धा लहान-लहान गोष्टींवरुन आपल्या गर्लफ्रेंडवर संताप व्यक्त करत असाल तर तो थांबवा. प्रथम तुमच्या संतापामागील कारण काय हे आधी ठरवा आणि एका बाजूला घेऊन तिला त्याबद्दल सांगा. मुलींना सन्मान न दिल्यास त्यांच्या भावना दुखावल्या जातात हे सुद्धा लक्षात ठेवा.

हे देखील वाचा- नवविवाहित कपल्सने ‘अशा’ पद्धतीने करा महिन्याभराचे आर्थिक प्लॅनिंग

-एक्स-पार्टनरबद्दल बोलणे टाळा
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात भूतकाळात ज्या काही गोष्टी घडतात त्याचा वर्तमानकाळात उल्लेख हमखास केला जातो. खासकरुन रिलेशनशिपमध्ये जेव्हा कपल्समध्ये भांडण होते तेव्हा एकमेकांचे एक्स-पार्टनर काढले जातात. तर असे करु नका. कारण या कारणावरुन तुमचे नाते तुटण्याची अधिक शक्यता निर्माण होते.(Relationship Tips)

-जवळीकता साधण्यासाठी बळजबरी करणे
पार्टनरला जेव्हा कंन्फर्टेबल वाटेल तेव्हाच जवळीकता साधा. अन्यथा तुम्ही इंटीमेसीसाठी जबरदस्ती करत असाल तर तुमची पार्टनर नाराज होऊ शकते. कोणत्याही गोष्टी करण्यासाठी पार्टनरवर दबाव टाळणे टाळा.

-लहान-लहान गोष्टींवरुन संतापणे थांबवा
आपण पाहतो जेव्हा कपल्समध्ये भांडण होतात तेव्हा ते वेळ आणि ठिकाण पाहत नाही. तेथेच एकमेकांवरील संताप व्यक्त करतात. मात्र जर तुम्ही सुद्धा लहान-लहान गोष्टींवरुन आपल्या गर्लफ्रेंडवर संताप व्यक्त करत असाल तर तो थांबवा. प्रथम तुमच्या संतापामागील कारण काय हे आधी ठरवा आणि एका बाजूला घेऊन तिला त्याबद्दल सांगा. मुलींना सन्मान न दिल्यास त्यांच्या भावना दुखावल्या जातात हे सुद्धा लक्षात ठेवा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.