Home » Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनावेळी राखी बांधताना दोरीला तीन गाठच का मारतात?

Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनावेळी राखी बांधताना दोरीला तीन गाठच का मारतात?

by Team Gajawaja
0 comment
Raksha Bhandhan 2025
Share

Raksha Bandhan 2025 :  भारतीय सणांमध्ये रक्षाबंधन हा एक भावनिक आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या रक्षणासाठी प्रार्थना करते, आणि भाऊ तिला आजन्म संरक्षण देण्याचे वचन देतो. या राखी बांधताना एक विशिष्ट परंपरा पाळली जाते . ती म्हणजे राखीच्या दोरीला तीन गाठी मारणे. हा केवळ रीतसर भाग नाही, तर यामागे एक आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक अर्थ दडलेला असतो. येत्या ९ ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. जाणून घेऊया राखी बांधनाता केवळ तीन गाठच का मारल्या जातात.

तीन गाठींचा धार्मिक आणि प्रतीकात्मक अर्थ:
राखीला तीन गाठ मारण्यामागे धर्मशास्त्रीय दृष्टिकोन देखील आहे. संस्कृत शास्त्रांमध्ये सांगितले आहे की कोणतीही शुभ वस्तू किंवा रक्षा-सूत्र “त्रिविध बंधनाने” बळकट केली जाते.

  1. पहिली गाठधर्मासाठी असते. ती आपल्या नात्याच्या शुद्धतेचे आणि निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक असते.
  2. दुसरी गाठसत्यासाठी असते. हे नाते कोणत्याही परिस्थितीत सत्यावर टिकून राहावे यासाठी ही गाठ मारली जाते.
  3. तिसरी गाठकर्तव्यासाठी असते. भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे कर्तव्य विसरू नये म्हणून ही गाठ मारली जाते.
    या तिन्ही गाठी एकत्र करून नात्याला केवळ सामाजिक नाही, तर आध्यात्मिक पातळीवरही बळकटी दिली जाते.
Raksha Bhandhan 2025

Raksha Bhandhan 2025

मानसिक आणि भावनिक दृष्टिकोन:
राखीच्या गाठी केवळ हातावर गुंडाळलेल्या धाग्याच्या नसून त्या एक भावनिक गाठ देखील दर्शवतात. बहिणीच्या प्रेमाची, काळजीची आणि सुरक्षिततेच्या आशेची ही बंधने असतात. तीन गाठी हे दाखवतात की हे नाते तात्पुरते नाही, तर आयुष्यभरासाठी आहे. ही एक निभावण्याची वचनबद्धता आहे. प्रत्येक गाठ म्हणजे बहिणीने मनापासून घेतलेली एक प्रार्थना – की तिच्या भावाचा जीवनप्रवास सुरक्षित, यशस्वी आणि मूल्यांवर आधारित असावा.

आधुनिक काळातही या परंपरेचे महत्त्व:
जरी आजकाल राखी विविध प्रकारांनी – फॅन्सी, रेडिमेड, डिझायनर स्वरूपात – मिळते, तरीही अनेक कुटुंबांमध्ये पारंपरिक पद्धतीने दोरीला तीन गाठ मारून राखी बांधली जाते. यामागे एक हेतू आहे की, नात्यामधील सखोला लक्षात ठेवणे आणि परंपरेला जिवंत ठेवणे. बदलत्या काळात सणांचे स्वरूप बदलले असले तरी त्यामागची भावना आणि तत्त्वज्ञान कायम ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. (Raksha Bandhan 2025)

=========

हे देखील वाचा : 

Religious : हिंदू धर्मात नारळ अर्थात श्रीफळाला जास्त महत्व का आहे?

Narali Purnima : जाणून घ्या नारळी पौर्णिमा सणाचे महत्व

Rakshabandhan : भावा बहिणीचे प्रेमळ नाते अधोरेखित करणारे ‘रक्षाबंधन’

============

राखीला तीन गाठ मारण्याची परंपरा ही केवळ धार्मिक कर्मकांड नाही, तर ती प्रेम, निष्ठा आणि जबाबदारी यांचे प्रतीक आहे. प्रत्येक गाठ एक मूल्य अधोरेखित करते – धर्म, सत्य आणि कर्तव्य. रक्षाबंधन हा सण फक्त राखी बांधण्यापुरता मर्यादित नसून, तो भावनिक एकात्मतेचा, परस्पर विश्वासाचा आणि संस्कृतीच्या जतनाचा एक सुंदर प्रतीक आहे.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.