आपल्या सगळ्यांच्या घरात साखरेशिवाय पान हालत नाही. आपल्या भारतीय लोकांच्या स्वयंपाकातील अतिशय महत्वाचा पदार्थ म्हणून साखरेचे मोठे स्थान आहे. विविध पेयांपासून ते पदार्थांपर्यंत साखरेचा मोठा वापर आपल्या जेवणात आपल्याला दिसतो. मात्र ही साखर चवीला जेवढी गोड आहे तेवढीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आणि त्रासदायक आहे. साखर खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक दुर्धर आजारांची लागण होऊ शकते. अनेक आजारांना बरे करण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी डॉक्टर अनेकदा साखर न खाण्याचा किंवा कमी खाण्याचा सल्ला देतात. (Health)
साखरेला तर पांढरे विष देखील म्हटले आहे. ही साखर खाऊन रक्तदाब (बी.पी), डायबिटीस, वजन वाढणे, अल्झायमर, हृदयविकार, फॅटी लिव्हर आदी अनेक गंभीर आजार होऊ शकतात. म्हणूनच साखर न खाणे कधीही चांगले असते. साखर बंद करणे अवघड असले तरी अशक्य अजिबातच नसते. साखर बंद केल्यामुळे आपल्या शरीरात अनेक सकारत्मक आणि चांगले बदल दिसून येतात. याचा अनुभव तुम्ही स्वतः घेऊ शकता. तुम्ही केवळ १ महिना साखर बंद केली तरी तुम्हाला मोठा फरक तुमच्या शरीरात जाणवेल. मग एक महिना साखर बंद केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात घ्या जाणून. (Marathi News)
> जेव्हा तुम्ही 30 दिवस साखरेचे सेवन थांबवता तेव्हा त्याचा प्रभाव तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम दिसायला लागतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते. इन्सुलिनवर चांगला परिणाम दिसून येतो. शिवाय मधुमेह टाइप टू आणि अनेक आजार होण्याची शक्यता कमी होते.
> साखरेचे सेवन बंद केल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. कारण साखरेत कॅलरीचे अधिक प्रमाण असते आणि यामुळे डायबिटीस, लठ्ठपणासारख्या आजारालाही सामोरे जावे लागते. शिवाय शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास देखील सुरुवात होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. साखर न खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो. (Top Stories)
> साखरेच्या अतिसेवनामुळे यकृत आणि हृदयावरही परिणाम होतो. यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग होऊ शकतो आणि यकृताचे नुकसान होऊ शकते. साखरयुक्त पदार्थांमुळे उच्च रक्तदाब वाढण्याचा त्रास होतो. पण जेव्हा तुम्ही एक महिन्यासाठी साखरेचे सेवन थांबवता तेव्हा शरीर निरोगी रहात आणि आरोग्याच्या समस्या उद्भवत नाहीत.
> साखरयुक्त पदार्थांचे सेवन न केल्याने दातांचे आरोग्यही चांगले राहते. असे केल्याने, हिरड्यांचे आजार आणि कॅव्हेटी या दोन्हीचा धोका कमी होतो. जर तुम्ही ३० दिवस साखर खाणे बंद केले तर दातांमध्ये कॅव्हेटी निर्माण होण्याचा धोकाही टळतो. (Social Updates)
> काही दिवस साखर न खाल्ल्याने चेहऱ्याची सूज कमी होते, त्वचा अधिक तेजस्वी दिसू लागते आणि पिंपल्सही कमी होतात.
> साखरेचा मर्यादित वापर केल्यास किंवा साखर न खाल्ल्यास सर्च बाजूनी हा निर्णय योग्य ठरतो. साखर न खाण्याचे तोटे कधीच होत नाही उलट सर्व फायदेच दिसून येतात आणि आरोग्यावर चांगला परिणाम होतो.
=========
हे देखील वाचा : Corona : कोरोनाच्या वाढणाऱ्या संसर्गापासून बचावासाठी उपाय
=========
> तज्ज्ञांच्या माहितीनुसार आपण जर साखरेचे सेवन केले नाही तर शरीराला कोणतेही नुकसान होत नाही. उलट याचे अनेक फायदेच होतात. साखर न खाल्ल्याने शरीराच्या आतमध्ये होणाऱ्या सूज आणि इन्फेक्शनपासून तुम्ही वाचू शकता. (Marathi Latest News)
> रोजची पांढरी साखर खाण्यापेक्षा नैसर्गिक गोड पदार्थांचे सेवन करणे शरीरासाठी नक्कीच चांगले ठरते. साखरेऐवजी तुम्ही मध, गूळ, खजूर किंवा नैसर्गिक गोड फळांचे सेवन करू शकता. सिझनल फळांचे सेवनही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.