Home » Pitrupaksha : पितृपक्षात भरणी श्राद्ध करण्याला महत्व का असते?

Pitrupaksha : पितृपक्षात भरणी श्राद्ध करण्याला महत्व का असते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Pitrupaksha
Share

पितृपक्षचा काळ सुरु झाला असून, आता सर्वच लोकं आपल्या पूर्वजांना आठवून त्यांच्या आठवणींमध्ये श्राद्ध, तर्पण, पिंडदान केले जाते. पितृपक्षाचा काळ अतिशय पवित्र समजला जातो. पितृपक्ष भाद्रपद महिन्यामधील शुक्ल पक्षातील पौर्णिमेपासून अर्थात आज ७ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमा रविवार, ७ सप्टेंबर २०२५ तर पितृपक्षाची समाप्ती अश्विन कृष्ण पक्ष अमावस्या रविवार, २१ सप्टेंबर २०२५ होणार आहे. (Marathi)

हिंदू धर्मात हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या पंधरा दिवसाच्या काळात विविध तिथींना श्राद्ध करण्याची प्रथा आहे. सवाष्ण गेल्या महिलांचे श्राद्ध, पितृ श्राद्ध, मातृ श्राद्ध, ऋषी श्राद्ध, असे अनेक प्रकारचे श्राद्ध या काळात केले जातात. या काळात अजून एक श्राद्ध करण्याला खूपच महत्व आहे आणि ते म्हणजे ‘भरणी श्राद्ध’. पितृ पक्षातील भरणी नक्षत्राच्या दिवशी भरणी श्राद्ध केले जाते यालाच महाभरणी असे नाव आहे. हे एकाच उद्देशाने केले जाते. व्यक्तीच्या मृत्यूनंतर पहिल्या वर्षी भरणी श्राद्ध केले जात नाही. यंदा ११ सप्टेंबर रोजी भरणी श्राद्ध आहे. हे श्राद्ध करण्यामागे देखील एक शास्त्र आहे. हे भरणी श्राद्ध दरवर्षी करून चालत नाही. (Pitrupaksha)

मृत व्यक्तीचे वर्षश्राद्ध झाले असेल तरच पितृपक्षात भरणी नक्षत्राला भरणी श्राद्ध करता येते. अन्यथा वर्ष श्राद्ध होण्याआधी पितृ पक्ष जरी आला तरी भरणी श्राद्ध करू नये असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. तसेच वर्षश्राद्धाच्या पाठोपाठ पितृपक्ष आला असता भरणी नक्षत्रावर पुन्हा एकदा श्राद्ध विधी केले तरी हरकत नसते. भरणी श्राद्ध केल्याने अधिक पुण्य मिळते. (Top Marathi Headline)

Pitrupaksha

भरणी श्राद्ध पहिल्या वर्षानंतर करावे. खरे तर, शास्त्रात दरवर्षी भरणी श्राद्ध करण्याचे सांगितले आहे. हे श्राद्ध केल्यावर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभते आणि तो आत्मा भवसागरातून मुक्त होतो. त्यामुळे श्राद्धविधी केल्याचे पुण्य पदरात पडते असे म्हटले जाते. परंतु ते वर्षानंतरच का करावे? तर वर्षश्राद्ध झाल्यानंतरच मृत व्यक्तीचे प्रेतत्व नष्ट होते. त्या आत्म्याला पितरांमध्ये स्थान मिळते आणि त्या पितरांची पूजा पितृपक्षात करता येते. भरणी श्राद्ध पितृ पक्षातील एक शुभ अनुष्ठान आहे. हे भरणी श्राद्ध व्यक्तिच्या मृत्यूनंतर फक्त एकदाच केले जाते. शास्त्रानुसार, हे श्राद्ध केल्यास मृत व्यक्तिच्या आत्म्याला मुक्ति मिळते. तसेच त्याला अनंत काळापर्यंत शांती प्रदान करते. हे श्राद्ध विशेषता कुटुंबातील मुख्य पुरूषाच्या हस्ते केले जाते. (Marathi Latest News)

भरणी नक्षत्र असताना केलेल्या चतुर्थी किंवा पंचमीच्या दिवशी भरणी श्राद्ध करण्याची प्रथा आहे. हे श्राद्ध पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते. हे असे आहे कारण मृत्यूचा देव यम ‘भरणी’ नक्षत्रावर राज्य करतो. भरणी श्राद्धाचे पुण्य गया श्राद्धासारखेच आहे असे सांगितले आहे. चला जाणून घेऊया काय आहे हे भरणी श्राद्ध. (Top Trending News)

=======

Pitrupaksha : पितृ पक्षात कावळ्यांना जेवू का घालतात?

=======

जेव्हा भरणी नक्षत्र एखाद्या विशिष्ट तिथीला दुपारी येते तेव्हा त्याला भरणी श्राद्ध म्हणतात. जेव्हा भरणी नक्षत्र पंचमीच्या दिवशी असेल तेव्हा भरणी श्राद्धाचे महत्त्व असेल. भरणी श्राद्ध मृत्यूच्या पहिल्या वर्षानंतर केले पाहिजे. जो पंचमी तिथीला श्राद्ध करतो त्याला उत्तम लक्ष्मीची प्राप्ती होते. अविवाहित मृत्युमुखी पडलेल्यांचे श्राद्ध पंचमीला केले जाते. म्हणूनच याला कुंवार पंचमी असेही म्हणतात. जे लोक त्यांच्या आयुष्यात कोणतीही तीर्थयात्रा करू शकत नाहीत त्यांच्यासाठी मातृगया, पितृगया, पुष्कर तीर्थ, बद्रीकेदार इत्यादी तीर्थस्थळांवर भरणी श्राद्ध केले जाते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.