Home » Pithoragarh Road : कैलास मानसरोवर यात्रा सुरु होणार !

Pithoragarh Road : कैलास मानसरोवर यात्रा सुरु होणार !

by Team Gajawaja
0 comment
Pithoragarh Road
Share

भगवान शंकराच्या भक्तांसाठी लवकरच आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. कारण गेल्या पाच वर्षापासून बंद असलेली कैलास मानसरोवर यात्रा सुरु होण्याचे संकेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहेत. कोविड-19 च्या महामारीमध्ये चीननं ही यात्रा स्थगित केली होती. त्यानंतर भारत-चीन राजनैतिक संबंधामध्ये आलेल्या कटुतेचा परिणामही या यात्रेवर झाला. चीननं भारतातील शिवभक्तांसाठी या यात्रेची परवानगी देण्याचे टाळले होते. पण गेल्या काही महिन्यात चीन पुन्हा भारतासोबत मैत्रीचा हात पुढे करत आहे. यात चीनी परराष्ट्र खात्यानं कैलास मानसरोवर यात्रा चालू करण्याबाबत संकेत दिले आहेत. त्यामुळे या वर्षात ही पवित्र यात्रा सुरु होईल, अशी आशा आहे.
भारत आणि चीन मधील कटुता आता कमी होत असून चीन नव्यानं भारताबरोबर मैत्रीचे संबंध जोडू पहात आहे. (Pithoragarh Road)

याची पहिली पायरी म्हणून भारताचे शिष्टमंडळ गेल्या महिन्यात चीन दौ-यावर गेले असतांना कैलास मानसरोवर यात्रेसंबंधी भारतानं केलेली मागणी चीन मान्य करणार असे संकेत आले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत माहिती दिली असून लवकरच सर्वसामान्यांसाठी ही यात्रा सुरु होण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत माहिती दिली असून भारत सरकार लवकरच कैलास मानसरोवर यात्रेबाबत सूचना जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोविड-19 या महामारीनंतर चीननं या यात्रेवर बंदी घातली होती. नेपाळमार्गे कैलास मानसरोवर यात्रा करण्यासाठी परवानगी देण्यात येत होती, मात्र त्यातही भारतीय भाविकांना यासाठी परवानगी देणं चीननं टाळलं होतं. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून भारतातील शिवभक्त ही यात्रा पुन्हा सुरु करण्याची मागणी करत होते, आता ती मागणी पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे. (Latest News)

कैलास मानसरोवर यात्रा ही जून ते सप्टेंबर दरम्यान आयोजित केली जाते. 2020 मध्ये जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे ही यात्रा थांबवण्यात आली होती. यासंदर्भात रिओ डी जानेरो येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेदरम्यान, भारतातर्फे चर्चा कऱण्यात आली. याच दरम्यान 2025 च्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. भारत आणि चीनमधील राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. प्रामुख्यानं कैलास मानसरोवर यात्रा दोन मार्गांनी आयोजित केली जाते. (Pithoragarh Road)

यातील पहिला मार्ग म्हणजे उत्तराखंडचा लिपुलेख खिंड आणि सिक्कीमचा नाथुला खिंड. भारताने उत्तराखंडमधील पिथोरागडमध्ये सामाजिक आणि धार्मिक महत्त्वाच्या रस्त्याचे बांधकाम केल्यामुळे आता ही यात्रा अधिक सुलभरित्या होणार आहे. मानसरोवरला जाणारा पिथोरागड ते लिपुलेख असा 80 किलोमीटरचा लिंक रोड आता जवळपास तयार झाला आहे. या रस्त्याच्या बांधकामामुळे कैलास मानसरोवरची यात्रा फक्त एका आठवड्यात पूर्ण होणार आहे. यापूर्वी सिक्कीममधील नाथुला आणि नेपाळमधून कैलास मानसरोवरला जाण्यासाठी किमान 2 आठवडे लागत असत. या प्रवासादरम्यान 80 टक्के प्रवास तिबेटमधून करावा लागत होता. या भागावर चीनचे वर्चस्व आहे. त्यामुळे चीनी लष्कराकडून भारतीयांजी अडवणूक केली जात असे. याशिवाय याच मार्गातील 20 टक्के प्रवास हा भारतातून होत असे. मात्र आता हा मार्गही चांगला तयार झाला आहे. (Latest News)

=======

हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !

Portfolio Diet म्हणजे काय? घ्या जाणून सविस्तर इन्फो

=======

शिवाय पिथोरागडला जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामामुळे हा प्रवास अधिक सोप्पा होणार आहे. पिथोरागड रस्ता तयार झाल्यामुळे भारतीय भाविकांचा कैलास मानसरोवरला जाण्यासाठीचा 84 ट्क्के प्रवास भारतातून होणार आहे. तर फक्त 16 टक्के प्रवास तिबेटमधून करावा लागणार आहे. या सर्वांमुळे कैलास मानसरोवरला जाणा-या भाविकांच्या संख्येतही वाढ होणार आहे. तिबेटच्या स्वायत्त प्रदेशात असलेले कैलास मानसरोवर हे फक्त हिंदू धर्मियांसाठीच पूजनीय नाही, तर बौद्ध आणि जैन धर्मिय भाविकही या यात्रेसाठी मोठ्याप्रमाणात जातात. कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचे निवासस्थान असल्याची भावना हिंदू भाविकांमध्ये आहे. सृष्टीच्या सुरुवातीपासून या कैलास पर्वताचे अस्तित्व असल्याचे मानले जाते. त्याच्याबद्दल असलेल्या अनेक गुढ कथांमुळेही या कैलास यात्रेला जाणा-या पर्यटकांची संख्या मोठी असते. (Pithoragarh Road)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.