Parenting Tips : घटस्फोट हा केवळ दोन व्यक्तींमधील नात्याचा अंत नसून, संपूर्ण कुटुंबव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. विशेषतः या प्रक्रियेत सर्वात जास्त भावनिक नुकसान मुलांचे होते. पालकांमधील वाद, वेगळे होणे, आणि नंतरची बदललेली जीवनशैली हे सर्व मुलांना मानसिकदृष्ट्या हादरवते. त्यामुळे घटस्फोटानंतर मुलांचे पालनपोषण करताना अधिक संवेदनशील, संयमी आणि समजूतदार वागणे अत्यावश्यक ठरते.
मुलांच्या भावनांना महत्त्व द्या
घटस्फोटानंतर मुलांमध्ये अपराध भावना, गोंधळ, राग किंवा दु:ख अशा संमिश्र भावना निर्माण होतात. त्यांना वाटते की त्यांच्या चुकीमुळे आई-बाबा वेगळे झाले. अशावेळी पालकांनी त्यांच्याशी सतत संवाद साधत राहणे गरजेचे आहे. त्यांना हे स्पष्ट करून सांगणे आवश्यक आहे की, त्यांचा घटस्फोट हा दोघा प्रौढांचा निर्णय आहे आणि त्यात मुलांची काहीही चूक नाही. त्यांचे प्रेम दोघांवर तितकेच राहील, हे सतत जाणवू द्या.
दोन्ही पालकांनी जबाबदारी स्वीकारावी
घटस्फोटानंतर बहुतांश वेळा एक पालक मुलांजवळ राहतो आणि दुसरा दूर जातो. मात्र यामुळे दुसऱ्या पालकाने जबाबदारीपासून माघार घेऊ नये. मुलांच्या अभ्यास, आरोग्य, भावनिक विकास यामध्ये दोघांनीही समवेत सहभाग घेत राहावा. फोन, व्हिडिओ कॉल, भेटीगाठी, सहली यांद्वारे संबंध टिकवणे महत्त्वाचे आहे. दोघांमधील सहकार्यामुळे मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते.(Parenting Tips)

Parenting Tips
एकमेकांबद्दल वाईट बोलू नका
घटस्फोटामुळे निर्माण झालेला राग किंवा नाराजी पालकांनी कधीच मुलांपुढे व्यक्त करू नये. मुलांना दुसऱ्या पालकाविषयी चुकीचे विचार सांगणे त्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम करू शकतो. मुलांना दोघांशीही सकारात्मक संबंध ठेवण्याची संधी द्या. त्यांच्या भावना दुखावू नका.(Latest Marathi News)
===============
हे ही वाचा :
Jonas Masetti : भारताचा सर्वोच्च सन्मान पद्मश्री मिळवणारे जोनास मसेट्टी आहेत तरी कोण?
Ramdas Marbade : पाणीपुरी विकणार्या रामदास मारबदेची उत्तुंग भरारी; इस्रोमध्ये तंत्रज्ञ पदावर निवड
================
नियमित दिनक्रम आणि स्थिरता राखा
घटस्फोटानंतर मुलांच्या आयुष्यात स्थिरता राहणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांच्या दिनक्रमात फारसा बदल होणार नाही, याची काळजी घ्या. त्यांचे शाळेचे, खेळाचे, अभ्यासाचे वेळापत्रक सुरळीत ठेवा. घरातील वातावरण सकारात्मक ठेवा जेणेकरून त्यांना असुरक्षित वाटू नये.(Kids Care After Divorce)
व्यावसायिक सल्ल्याचा विचार करा
कधी कधी मुलांमध्ये आलेले बदल खूप खोल असतात. अशावेळी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे ठरते. योग्य मार्गदर्शनाने मुलांच्या मनातील भीती, अस्वस्थता, राग यावर मात करता येते. पालकांनीही थेरपीचा आधार घेतल्यास ते अधिक समजूतदारपणे पालकत्व निभावू शकतात.