६ मे २०२५… बातमी आली की, देशात २५९ ठिकाणी सैन्याचं मॉक ड्रिल होणार आहे. त्यामुळे सगळेच प्रीपेर होते. सगळेच म्हणजे आर्मी आणि सिव्हीलीयन्स पण… पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सगळ्यांच्याच मनात एक राग होता, एक चीड होती. ज्या निष्पापांना दहशतवाद्यांनी मारलं होतं, त्याचा आर्मीने बदला घ्यायलाच हवा, असं सगळ्यांना वाटत होतं. रात्र झाली. १२चा ठोका पडला होता. कॅलेंडर वर ७ मे २०२५ आलं… सगळे गाढ झोपेत… काही मोजके जागे असतील तेवढेच… तेवढ्यात इंडियन आर्मीच्या ऑफिशिअल सोशल मिडीया अकाउंटवर साडे बाराच्या आसपास एक पोस्ट पडली. (Operation Sindoor)
ज्यामध्ये संस्कृत श्लोक होता, “प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः” Ready to Strike, Trained to Win… या व्हिडिओमध्ये एकंदरीत इंडियन आर्मीचं शक्तीप्रदर्शन होतं. सगळ्यांना वाटलं असेल, की उद्याच्या मॉक ड्रिल रिलेटेड हा व्हिडिओ असावा… पण त्याच्याच एका तासानंतर आर्मीच्याच ऑफिशिअल अकाउंटवर पुन्हा एक पोस्ट पडली… त्यात होतं ‘ऑपरेशन सिंदूर’… Justice is Served…. Jai Hind! पुढचा काही वेळ अनेकांना कळलच नाही की, हे नेमकं काय आहे… पण नंतर ब्रेकिंग न्यूज येऊ लागली… फीडमध्ये व्हिडिओ येऊ लागल्या की, इंडियन आर्मीने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आहे… पाकिस्तानमध्ये असणाऱ्या दहशतवादी तळांना पार बेचिराख करून टाकलं आहे. (Marathi Latest News)
या एका बातमीने मध्यरात्री सगळे आनंद साजरा करत होते. पाकिस्तानमध्ये आपलं सैन्य Diwali साजरी करून सुखरूप परतलं… यातून एक कळून आलं, या दहशतवाद्यांना जशास तसंच उत्तर द्यायचं… इथे तर इंडियन आर्मीने मिसाईल्सने उत्तर दिलं आहे, पण भारताच्या एका पंतप्रधानांनी पाकिस्तानला फक्त शब्दांनी उत्तर दिलं होतं… असं उत्तर जे इतिहासामध्ये अजरामर झालं. यामुळे पाकिस्तानची पार तंतरली होती. ते होते भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी… पण त्यांनी पाकिस्तानला असं काय उत्तर दिलं होतं, जाणून घेऊ. (Social News)
वर्ष होतं १९९९… तेव्हा भारताचे पंतप्रधान होते, अटल बिहारी वाजपेयी… युद्धाचे वारे वाहतच होते. कारण पाकिस्तानी आर्मीचे जवान आणि दहशतवादी PoK क्रॉस करून कारगिलच्या काही शिखरांवर ठाण मांडून बसले होते. पण यावर संयम दाखवत अटलजी म्हणाले की, आपण LOC चं उल्लंघन करायचं नाही. पण पाकिस्तानने भारतात घुसण्याचा जो प्रयत्न केलाय, त्याला हाणून पाडणारच! अखेर याचं रुपांतर युद्धात झालं आणि सुरु झालं जगातलं सर्वात उंचावर लढलं गेलेलं कारगिल युद्ध! (Top Stories)
पाकिस्तानने नेहमीच दहशतवाद्यांची बाजू घेतली आहे, पण त्यांची वृत्ती मी नाही त्यातली कडी लावा आतली, अशीच राहिली आहे. पाकची हालत जेव्हा खराब व्हायला लागली, तेव्हा त्यांनी अमेरिकेकडे मदतीची भिक मागितली. त्यांचं असं होतं की, अमेरिकेने भारतावर दबाव आणावा आणि युद्ध थांबवावं आणि चर्चा करावी. हे सांगणारे कोण तर पाकिस्तानचे त्यावेळचे पंतप्रधान नवाज शरीफ… आणि ऐकणारे कोण तर अमेरिकेचे त्यावेळचे पंतप्रधान बिल क्लिंटन ! पण शरीफ एवढ्यावरच थांबले नाहीत, ते म्हणाले की, जर युद्ध थांबल नाही, तर पाकिस्तान भारतावर थेट अणुबॉम्बचा हल्ला करेल. आम्ही आमचे अणुबॉम्ब तयारच ठेवलेले आहेत. (Marathi News)
भारताने अजूनही नैतीकतेचं पालन केलं होतं. त्यांनी LOC क्रॉस केली नव्हती, तर भारतात घुसखोरी करणाऱ्या शत्रूशी आर्मी सामना करत होती. बिल क्लिंटन यांचं एक आत्मचरित्र आहे, “My Life” म्हणून…. त्यात त्यांनी या सर्व गोष्टी लिहिल्या आहेत. पाकिस्तानकडून असं काही ऐकल्यावर त्यांना वाटलं होतं, की आता आशियामध्ये काहीतरी मोठ आणि भयानक घडू शकतं. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात असं लिहिलं आहे की, I was deeply disturbed by the possibility that the conflict might escalate into a nuclear confrontation. एकंदरीत अणु युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर विषय आणखी चिघळू नये. त्यावेळी बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानलाही सांगितलं होतं की, तुम्ही भारतातली घुसखोरी थांबवा आणि एलओसीवरून मागे व्हा… त्यावेळी मिडीयावर ही बातमीसुद्धा पसरली होती की बिल क्लिंटन आणि पाक पंतप्रधानांची चर्चा झाली आहे. (Marathi Top News)
=======
हे देखील वाचा : Rafale : ‘ऑपरेशन सिंदूर’ला यशस्वी करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या राफेल विमानाची वैशिष्ट्ये
=======
यानंतर बिल क्लिंटन आणि भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यात एक गुप्त पत्रव्यवहार झाला. अटलजी यांच्या उत्तराने बिल क्लिंटन आणखीणच हादरले. त्यावेळी क्लिंटन जेनेव्हामध्ये होते. त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार SAMUEL SANDY यांच्याकडे हे पत्र आलं होतं. ते नंतर बिल क्लिंटन यांच्याकडे गेलं. त्यात असं लिहिलं होतं की, आमच्या भूमीची आम्ही कशीही सुरक्षा करणारच…”पाकिस्तानने जर भारतावर अणुबॉम्ब हल्ला केला तर भारताचं काहीच बिघडणार नाही, पण पाकिस्तान उद्याचा सूर्योदय पाहूच शकणार नाही आणि पाकिस्तानचं नाव जगाच्या नकाशावरून नाहीसं होऊन जाईल. या उत्तराने आधी बिल क्लिंटन यांनाच धडकी भरली असावी. पाकिस्तानचं तर सोडाच…आपल्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत हा आत्मविश्वास त्यावेळी अटलजी यांचा होता. (Marathi Trending News)
४८ चं युद्ध, ६५चं युद्ध, ७१ चं युद्ध असो वा कारगिल युद्ध असो… भारताने कोणत्याही शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नाही. कोणतीही loc क्रॉस केली नाही. कोणाच्याही देशात घुसखोरी केली नाही. पण भारतावर ज्यांनी हल्ला केला मग ते शत्रूचं सैन्य असो किंवा दहशतवादी… त्यांना चोख उत्तर भारताने नेहमीच दिलं आहे. पहलगामनंतरही पाकिस्तानचे अनेक नेते आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, अशा बोंबा मारत होते. पण या बोंबाना बॉम्बने उत्तर देऊन पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताने धडा शिकवला आहे.