१९७९ साली उत्तर प्रदेशमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढायला लागल्या होत्या. त्याचदरम्यान एक शेतकरी आपलं पाकीट चोरीला गेलं म्हणून एका पोलीस स्टेशनमध्ये गेला होता. पण त्याचं पोलिसांकडून काहीही ऐकलं गेलं नाही. पण त्याने पुढच्या अर्ध्या तासात असं काही केलं की अख्खं पोलीस स्टेशन सस्पेंड झालं? काय होती ती घटना आणि कोण होते ते शेतकरी जाणून घेऊ.(Charan Singh)
आजपासून ४६ वर्षांपूर्वीची ही गोष्ट. संध्याकाळची वेळ होती. घडाळ्यात सहा वाजत आले होते. जागा होती, उत्तर प्रदेशातलं उसराहार पोलिस स्टेशन. पोलिस कॉंस्टेबल आपल्या डेस्कवर मस्त पाय पसरून बसला होता. इतर पोलिस गप्पा मारत होते. तेव्हा तिथे एक मळकट कपडे असलेला एक शेतकरी आला. तो खूपच टेंशन मध्ये होता. कारण त्याचा बटवा चोरीला गेला होता, ज्यात पैसे होते. तो पोलिस स्टेशन मध्ये शिरला, बराच वेळ झाला, कोणताच पोलिस अधिकारी त्याच्याकडे बघतही नव्हता. तो शेतकरी त्या पोलीस कॉंस्टेबलकडे गेला. खुर्चीवर बसला. (Top Stories)
म्हटला साहेब कम्पलेंट करायची आहे. कॉंस्टेबलने आळस देत त्याला विचारलं, “बाबा क्या कम्पलेंट है?” त्यावर तो शेतकरी घाबरत बोलला, “मैं मेरठ से अपने रिश्तेदारोंके यहां बैल खरीदने आया था, आते समय एक जेबकतरेनें मेरी जेब काटली और मेरे पैसे चुरा लिए.. मैं यहां कंप्लेंट लिखवाने आया हूं।” त्या कॉंस्टेबलने त्या शेतकऱ्याकडे पाहिलं आणि कॉंस्टेबल म्हणाला, “मेरठ से बेल खरीदने इतनी दूर क्यों आए भाई? क्या आपके पास इस बात का कोई सबूत है कि आपकी जेब काट ली है? हो सकता है कि आपके पैसे कहीं गिर गए हो, या इसका कोई सबूत है कि किसी ने आपकी जेब काट ली हो? आपके पैसे कहीं गिर गए होंगे, या अपने पैसे खाने पीने में उड़ा दिए और अब घर वालों के डर से चोरी का नाटक कर रहे हो.. जाओ.. शिकायत नहीं लिखी जाएगी”(Charan Singh)
हे ऐकून तो शेतकरी टेंशनमध्ये आला एका कोपऱ्यात बसून आता काय करू? म्हणून विचार करायला लागला. तेवढ्यात एका पोलिसाने त्याला बोलवलं.. त्यांच्यात तो असं म्हणाला, “कम्पलेंट लिख लेंगे, पर उसके बदले में कुछ तो देना होगा”. आधी तर त्या शेतकऱ्याला काहीच कळलं नाही. नंतर त्याला अंदाज आला की, ते पैसे मागत आहेत आणि त्या पोलिसांनी पैसेच मागितले. त्यावर तो शेतकरी तयार झाला. त्याच्याकडे जितके पैसे होते त्याने पोलिसाला दिले. कम्पलेंट लिहून झाली आणि त्या कॉन्स्टेबलने विचारलं, “बाबा अंगुठा दोगे या साईन करोगे”, त्यावर शेतकरी बोलला साईन करेन. त्या कॉंस्टेबलने सही करायला कागद पुढे केला. (Social News / Updates)
त्या शेतकऱ्याने सही केली आणि आपल्या खिशातून एक स्टॅम्प काढला. तो स्टॅम्प त्या कागदावर मारला. त्या स्टॅम्पवर लिहिलं होतं चौधरी चरण सिंग… प्रधानमंत्री, भारत सरकार ! हे वाचूनच तिथल्या सर्व पोलिसांना अक्षरशः घामच सुटला. त्यांची बोबडीच वळली. चक्क देशाचे पंतप्रधान आपल्यासमोर उभे होते. चौधरी चरण सिंग…भारताचे पाचवे पंतप्रधान… शेतकऱ्यांचे नेते अशी त्यांची ओळख… त्यांनी संपूर्ण पोलीस स्टेशनच सस्पेंड करून टाकलं..(Charan Singh)
१९७९ साली जुलै महिन्यात पंतप्रधान म्हणून चौधरी चरण सिंह यांनी सूत्रं हाती घेतली होती. उत्तर प्रदेशातून आलेले हे नेते पण उत्तर प्रदेशातून सारख्याच भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत होत्या. तिथल्या पोलिस ठाण्यात छोट्या-छोट्या कामांसाठी लाच मागितली जायची आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेतले जायचे नाहीत. त्यांच्यापर्यंत या भ्रष्टाचाराच्या गोष्टी सतत पोहोचायला लागल्या. या तक्रारींनी चरण सिंह अस्वस्थ झाले. त्यावर त्यांनी ठरवलं की, आपण स्वतःच्या डोळ्यांनी या गोष्टीची पडताळणी करू.(Social News / Updates)
एका संध्याकाळी त्यांनी आपलं पंतप्रधानाचं पद बाजूला ठेवलं आणि मळकट कुर्ता, फाटकं धोतर आणि अनवाणी… असा साधा, गरीब शेतकऱ्याचा वेष धारण केला. त्याच अवतारात ते इटावा जिल्ह्यातल्या उसराहार पोलिस स्टेशनला गेले. त्यांनी तो असा वेष धारण केला की, कोणाला वाटणारंच नाही तो गरीब शेतकरी म्हणजे भारताचे तेव्हाचे पंतप्रधान आहेत.(Social News / Updates)
=================
हे देखील वाचा : Kolkata News : “आई, मी चोर नाही” १३ वर्षाच्या मुलाची Suicide Note
=================
ते पोलिस स्टेशनला पोहोचले. त्यांनी खोटं सांगितलं की, ते शेतकरी आहेत आणि चोराने त्यांचा खिसा कापला. जेव्हा तक्रार नोंदवायला पोलिस तयार झाले, तेव्हा पोलिसांनी पैशांची मागणी केली. पोलिसांना बराच वेळ होऊन सुद्धा जराही अंदाज आला नाही की, तो तक्रार नोंदवायला आलेला गरीब शेतकरी म्हणजे खुद्द भारताचे पंतप्रधान आहेत. चरण सिंह पैसे द्यायला तयार झाले. त्यांनी त्यांना लाच दिली. कंप्लेंट लिहून झाल्यावर सही करायला कॉन्स्टेबलने कागद पुढे केला, तेव्हा चरण सिंह यांनी स्टॅम्प काढला आणि सिग्नेचरच्या ठिकाणी स्टॅम्प मारला. त्यावर लिहिलं होतं, ‘पंतप्रधान, भारत सरकार’आणि त्याखाली त्यांनी पेनाने स्वतःचं नाव लिहिलं ‘चौधरी चरण सिंह’.(Charan Singh)
अख्ख्या पोलिस स्टेशनसाठी हा खूप मोठा धक्का होता. तिथल्या सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले. त्यांना समजलं की, हा सामान्य शेतकरी नाही, तर स्वतः पंतप्रधान चौधरी चरण सिंह आहेत! काही मिनिटांतच पंतप्रधानांचा ताफा पोलिस स्टेशन बाहेर पोहोचला. जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी – कमिशनर, डीआयजी, डीएम, एसएसपी – धावतपळत तिकडे दाखल झाले आणि पंतप्रधानांनी तात्काळ आदेश दिला – संपूर्ण उसराहार पोलीस स्टेशनला निष्काळजी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सस्पेंड करण्यात यावे! असा हा प्रसंग, त्या एका सहीने संपूर्ण पोलिसस्टेशन सस्पेंड झालं. तुम्हाला किस्सा कसा वाटला आणि तुम्हाला आणखी कोणता किस्सा ऐकायला आवडेल आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.