Home » Narsimha Dwadashi : नरसिंह द्वादशी का साजरी केली जाते?

Narsimha Dwadashi : नरसिंह द्वादशी का साजरी केली जाते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Narsimha Dwadashi
Share

होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. होळी हा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा आणि मोठा सण आहे. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा होळी साजरी केली जाते. यादिवशी संध्याकाळी होलिका दहन केले जाते. होलिका दहन करण्याआधी अजून एक खास दिवस साजरा केला जातो, आणि हा खास दिवस म्हणजे ‘नृसिंह द्वादशी’. हिंदू धर्मामध्ये नरसिंह द्वादशीच्या व्रताला विशेष महत्त्वं दिले जाते. नरसिंहाचे व्रत भगवान विष्णूचा आवतार नरसिंह या आवताराला समर्पित आहे. नरसिंह द्वादशीचे व्रत होळीच्या तीन दिवस आधी साजरे केले जाते. (Narsimha Dwadashi)

भगवान विष्णूचा नरसिंह अवतार असा अवतार होता, ज्यात श्री हरी विष्णूचे अर्धे शरीर मानवाचे होते आणि बाकीचे अर्धे सिंहाचे होते. म्हणूनच या अवताराला नरसिंह अवतार म्हटले गेले आहे. आपला प्रिय भक्त प्रल्हाद याचा जीव वाचवण्यासाठी देवाने हा अवतार घेतला. एक खांब फोडून भगवान नरसिंह बाहेर आले. भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा वाजून ३२ मिनिटांनी सुरू होत आहे आणि शनिवार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री आठ वाजून ४३ मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार यंदा नृसिंह द्वादशी ही शनिवार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी केली जाईल. याच दिवशी नृसिंह द्वादशीचा उपवास असेल. रविवार १ मार्च २०२६ रोजी नृसिंह द्वादशीचा उपवास सोडला जाईल. आज आपण नृसिंह द्वादशीच्या व्रताबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. (Marathi)

नरसिंह द्वादशीचे व्रत केल्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते. नरसिंह द्वादशीचे व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते. नरसिंह द्वादशीचे व्रत केले तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होण्यास मदत होते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक फायदे होतात. नरसिंह द्वादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला मोक्ष मिळू शकतो. असे मानले जाते की भगवान नरसिंह स्वतः व्रत करणाऱ्या भक्ताचे रक्षण करतात, जसे त्यांनी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले होते. (Top Trending News)

Narsimha Dwadashi

नृसिंह द्वादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करा आणि स्वच्छ पिवळे कपडे घाला. घरातील पूजास्थळ स्वच्छ करा आणि भगवान नरसिंहांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा आणि विधीनुसार पूजा सुरू करा. पूजा करताना देवाला फुले, फळे, मिठाई आणि पंचामृत इत्यादी अर्पण करा. नंतर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून पूजा करा आणि देवाची पूर्ण भक्ती करा. यानंतर, विष्णू सहस्रनाम, नरसिंह स्तोत्र आणि भगवान विष्णूची आरती पठण करून पूजा पूर्ण करा. (Marathi News)

देवाची पूजा करताना ओम ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम्। नृसिंहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम्॥ मंत्राचा जप करावा. या मंत्राचा १०८ वेळा जप केल्यास अधिक शुभ होईल. असे मानले जाते की हिरण्यकश्यपच्या वधानंतर भगवान नरसिंहाने प्रल्हादला वरदान दिले होते की जो कोणी भक्त त्यांचे श्रद्धेने आणि भक्तीने स्मरण करेल, त्यांची पूजा करेल किंवा या दिवशी उपवास करेल, त्यांच्या जीवनातील दुःख, दुःख, भय आणि रोग दूर होतील. त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. (Top Marathi News)

व्रत कथा
भक्त प्रल्हादचे पिता हिरण्यकश्यप याने कठीण तपस्या करुन भगवान ब्रह्माजांना प्रसन्न केलं आणि त्यांना एक वरदान मागितला की त्याला ना कोणी मनुष्य मारु शकेल, ना पशु, ना तो दिवसा मारला जावा ना रात्री, ना अस्त्रच्या प्रहाराने, नाही शस्त्रा ने, ना घराच्या आत, नाही घराच्या बाहेर त्याला कोणी मारु शकेल. हे वरदान मिळाल्याने तो स्वत:ला अमर समजू लागला. लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली आणि तो स्वत: देव मानू लागला. त्याने त्याच्या राज्यात भगवान विष्णूची पूजा करण्यास बंदी घातली. पण त्याचा स्वत:चा पुत्र भक्त प्रल्हाद भगवान विष्णूंचा मोठा भक्त होता. त्याने अनेकवेळा सांगितल्यानंतरही भक्त प्रल्हादाने विष्णूची पूजा करणे थांबवलं नाही. (Latest Marathi Headline)

यामुळे हिरण्यकश्यपला क्रोध आला आणि त्याने भक्त प्रल्हादचा छळ करण्यास सुरुवात केली. अनेकदा त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येकवेळा भक्त प्रल्हाद बचावला गेला. त्यानंतर त्याने आपली बहीण होलिकासोबत भक्त प्रल्हादला अग्निच्या हवाले केलं कारण होलिकाला अग्निदेवचं वरदान होतं की ती आगीत जळू शकत नाही. पण, विष्णूच्या कृपेने प्रह्लाद वाचला आणि होलिका आगीत भस्म झाली. (Top Stories)

==========

Dhulivandan : होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या धुलिवंदनाचे महत्त्व

==========

शेवटच्या प्रयत्नात हिरण्यकश्यपने लोखंडाच्या एका खांबाला गरम करुन लाल केलं आणि प्रल्हादला त्याला गळाभेट करण्यास सांगितलं. तेव्हा त्या खांबाला छेदत नरसिंह देवाचं उग्र रुप प्रकट झालं. त्यांनी हिरण्यकश्यपला महालाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटवर, जी ना घराच्या बाहेर होती ना घराच्या आत, गोधूली बेलामध्ये, जेव्हा ना दिवस असतो नाही रात्र, नरसिंह रुपात जो ना मनुष्य होता, ना पशू. नरसिंह देवाने आपल्या नखांनी, जे ना शस्त्र होते, ना अस्त्र, त्याचा वध केला आणि भक्त प्रल्हादला जीवनदान दिलं. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.