भारतासोबतच संपूर्ण जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत स्थान मिळवणारे शक्तिशाली व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी. रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा असणारे मुकेश अंबानी नेहमीच त्यांच्या कंपनीमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात येत असतात. जगभरात प्रसिद्ध असणारी आणि विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारी रिलायन्स ही इंडस्ट्री सर्वश्रुत आहेत. रिलायन्सचा एवढा मोठा डोलारा सांभाळणे कोण्या एकाचे काम अजिबातच नाही. या अवाढ्यव्य कंपनीचा सांभाळ करण्यासाठी, तिला चालवण्यासाठी असंख्य लोकं काम करतात. मुकेश अंबानी यांच्या खांद्याला खांदा लावून ‘रिलायन्स’ला पुढे नेण्यासाठी कर्मचाऱ्यांसोबतच अनेक महत्वाच्या व्यक्ती देखील काम करतात. यातलेच एक म्हणजे, ‘प्रकाश शाह’. (Reliance)
मुकेश अंबानी यांचा उजवा हात म्हणून कायमच प्रकाश शाह यांना ओळखले जाते. रिलायन्स या ब्रँडला मोठी उंची मिळवून देण्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कर्मचाऱ्यांबद्दल लोकांना जास्त माहिती नाही पण, त्यांची कामगिरी कायमच रिलायन्सच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलेली असेल. असेच एक रिलायन्स इंडस्ट्रीजचे माजी उपाध्यक्ष आणि मुकेश अंबानींचे सर्वात विश्वासू अधिकाऱ्यांपैकी एक प्रकाश शाह. प्रकाश कंपनीशी खूप वर्षांपासून जोडले गेले आहेत. रिलायन्सच्या अतिशय महत्वाच्या अधिकाऱ्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते. (Todays Marathi Headline)
काही दिवसांपैकी करोडपती असलेले प्रकाश शाह आता संन्यासी झाले आहेत. जिथे ते लाखो रुपये किंमत असलेले सूट घालायचे, बूट घालायचे तिथे ते आता साधे पांढरे वस्त्र घालणार आणि अनवाणी राहणार आहे. प्रकाश यांनी भौतिक सुखाचा त्याग करत संन्यास घेतला आहे. महावीर जयंतीच्या दिवशी प्रकाश शाह आणि त्यांची पत्नी असलेल्या नैना शाह यांनी दीक्षा ग्रहण केली आहे. प्रकाश शाह यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी निवृत्ती घेतली आणि त्यानंतर त्यांनी दीक्षा घेतली आहे. काही वर्षांपूर्वीच ते दीक्षा घेणार होते, परंतु कोरोना महामारीमुळे त्यांनी हा निर्णय स्थगित केला होता. दीक्षा ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती सामान्य जीवन जगतात आणि मोक्ष मिळवण्यासाठी चांगले कर्म करतात. (Marathi Latest NEws)
प्रकाश शाह यांनी आयआयटी मुंबईमधून केमिकल इंजीनियरिंगमध्ये पदवी घेतली. त्यांच्या पत्नी नैना शाह या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. त्यांना दोन मुले आहेत. त्यातील एका मुलाने काही वर्षांपूर्वीच दीक्षा घेतली. त्यांच्या दुसऱ्या मुलाचे लग्न झाले असून, त्याला एक मुलगा आहे. प्रकाश शाह हे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये प्रोजेक्ट डिव्हिजनच्या उपाध्यक्ष पदावर पोहोचले आणि जामनगर पेटकोक गॅसिफिकेशन प्रोजेक्टसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. माध्यमांतील वृत्तानुसार निवृत्तीनंतर प्रकाश शहा यांनी दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचे वार्षिक वेतन सुमारे ७५ कोटी रुपये होते. (Marathi Trending News)
मीडियामधील रिपोर्टनुसार आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेले मुकेश अंबानी हे प्रकाश शाह यांच्या सल्ल्याशिवाय आणि त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कोणताच निर्णय घेत नव्हते. या दोघांनी मोठा काळ एकत्र काम केले. सध्या सोशल मीडियावर प्रकाश शहा यांचा संन्यासी वेशातील फोटो खूपच व्हायरल होत आहे. प्रकाश यांनी संन्यास का घेतला? असा प्रश्न अनेक लोकं विचारत आहे. प्रकाश यांच्या जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश यांचा जैन धर्मावर खूप जास्त विश्वास आहे. प्रकाश शाह हे सुरुवातीपासूनच खूपच धार्मिक होते. त्यांचा हा विश्वास दिवसागणिक खूपच वाढत गेला आणि त्यामुळेच त्यांना संसाराचा त्याग करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी संन्यास घेतला. त्यामुळेच त्यांनी ७५ कोटी रुपयांचा पगार असलेली नोकरी सोडली. (Top Stories)
===========
हे देखील वाचा : Jagganath Yatra : भगवान जग्गनाथची मूर्ती लाकडापासून का बनवली जाते?
Maheshwar Nagar : येथेही होते, पुरीधामसारखी भगवान जगन्नाथ रथयात्रा !
===========
काय आहे नक्की दीक्षा?
दीक्षा हा एक धार्मिक संस्कार ज्यात एक गुरु आपल्या शिष्याला अध्यात्मिक मार्गावर जाण्यासाठी दीक्षित करतो. या अंतर्गत एक खास मंत्र आणि विद्या प्रदान केली जाते. ज्याचे पालन शिष्याला करावे लागते. ही एक अध्यात्मिक यात्रेची सुरुवात समजली जाते, ज्यात शिष्य त्याच्या जुन्या जीवनाचा त्याग करत नवीन अध्यात्मिक जीवनात प्रवेश करतो. या संन्यासी जीवनात मोहाला स्थान नसते. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे जैन धर्माचे ५ मुख्य सिद्धांत आहेत. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics