अहमदाबादमध्ये गुरुवारी विमानाचा भीषण अपघात झाला, दुपारी दीड वाजेच्या सुमारास लंडनला जाण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने अहमदाबादहून उड्डाण केलं, आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणातच हे विमान एका इमारतीवर कोसळले. या विमान दुर्घटनेत अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. आतापर्यंत २६५ जणांचे मृतदेह हाती लागले असून, त्यांच्या नातेवाइकांच्या डीएनए टेस्टवरून मृतदेहाची ओळख पेटवण्याचे काम आता सुरु आहे. हे विमान कोसळल्यानंतर दुर्घटनास्थळावरून विमानाचे अवशेष आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्रभर सुरू होते. गुरुवारी अहमदाबाद झालेला विमान अपघात हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि भीषण अपघात होता. भारतात या विमान अपघातापूर्वी देखील काही भीषण विमान अपघात झाले ते कोणते जाणून घेऊया. (Plane Crash)
१९७८ अरबी समुद्रातील अपघात
मुंबईहून दुबईला जाणारे एअर इंडियाचे ‘एम्परर अशोक हे विमान टेकऑफ नंतर केवळ चार मिनिटांत आणि दोन मैल अंतरावर समुद्रात कोसळले. हा अपघात १ जानेवारी १९७८ रोजी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडला. या अपघातात २१३ जणांचा मृत्यू झाला. पायलटची चूक आणि उपकरणांच्या बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. (Marathi News)
१९९६ सालचा चरखी दादरी अपघात
हरियाणाच्या चरखी दादरी येथे १२ नोव्हेंबर १९९६ रोजी सौदी आणि कझाकस्तानच्या दोन विमानांची हवेतच टक्कर झाली होती. या भयावह अपघातामध्ये ३४९ जणांचा मृत्यू झाला होता. भाषेच्या समस्येमुळे झालेला हा विमान अपघात भारताच्या आजवरच्या हवाई अपघातांतील सर्वांत भीषण अपघात किंवा टक्कर मानली जाते. कझाक वैमानिकांना इंग्रजी भाषेतील सूचना न समजल्यामुळे ते १५ हजार फुटांऐवजी १४ हजार फुटांवर गेले आणि अपघात झाला होता. (Todays Marathi Headline)
२०१० सालचा मंगळुरू अपघात
‘एअर इंडिया एक्सप्रेस’चे विमान २२ मे २०१० रोजी मंगळुरू विमानतळावर उतरत असताना धडकेनंतर दरीत कोसळले. या अपघातात १५८ जणांचा मृत्यू झाला होता. मंगळुरू विमानतळाची ‘टेबलटॉप’ धावपट्टी धोकादायक असून, पायलटने ‘लँडिंग’चा निर्णय योग्य वेळेवर न घेतल्याने हा मोठा अपघात झाला होता. (Latest Marathi News)
१९८८ सालचा अहमदाबाद अपघात
‘इंडियन एअरलाइन्स’चे ‘आयसी ११३’ हे विमान अहमदाबादमध्ये अपघातग्रस्त झाले होते. या अपघातात १३३ प्रवाशांचा मृत्यू झाला. वाईट हवामान, अपुरी दृश्यमानता आणि प्रक्रियांचे पालन न केल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले.
१९९३ सालचा संभाजीनगर अपघात
२६ एप्रिल १९९३ रोजी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट ४९१ चे विमान उड्डाण करताना धावपट्टीवर अचानक ट्रक आल्यामुळे विमान त्या ट्रकला धडकले. ट्रक वेळेवर न हटविल्यामुळे विमानाला आग लागली आणि तीव्र स्फोट झाला. या दुर्घटनेत ५५ लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. (Top Marathi Headline)
२००० सालचा पाटणा अपघात
कोलकाता-पाटणा-लखनौ-दिल्ली मार्गावर उडत असणारे’ अलायन्स एअर ‘चे विमान १७ जुलै २००० रोजी पाटण्यात कोसळले. अपघातात विमानातील ५५ प्रवासी आणि पाच जमिनीवरील लोक मृत्युमुखी पडले होते.
२०२० सालचा कोझिकोड अपघात
सात ऑगस्ट २०२० रोजी दुबईहून ‘वंदे भारत’ मोहीमेंतर्गत येणारे ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’चे विमान केरळमधील कोळीकोड येथे कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका वैमानिकासह २० जणांचा मृत्यू झाला. टेबलटॉप धावपट्टीमुळे झालेल्या अपघातासाठी वैमानिकांच्या चुकीला जबाबदार धरण्यात आले. विमान धावपट्टीवरून घसरून ११० फूट खाली कोसळले. (Social News)
===========
हे देखील वाचा : Plane Crash : कॅप्टन सुमित सभरवाल यांचा ८००० तासांचा अनुभव देखील ठरला कमी
Plane Crash: विमान कोसळण्यापूर्वी पायलटचा Mayday कॉल, मात्र Mayday म्हणजे काय?
===========
१९९० सालचा बेंगळुरू अपघात
१४ फेब्रुवारी १९९० रोजी , इंडियन एअरलाइन्सचे फ्लाईट 605 बंगळुरू विमानतळावर येताना कोसळले . विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे एअरबस ए 320 धावपट्टी ओलांडून खाली उतरले. या अशा लॅन्डींगमुळे विमानाचे तुकडे झाले. या अपघातात 146 प्रवाशांपैकी 92 प्रवाशांचा मृत्यू झाला.