Monsoon Health Care : पावसाळा हा निसर्गाचा एक सुंदर ऋतू असून, यामध्ये हवामान गारवा निर्माण करतं, वृक्षराजी हिरवळीने सजते आणि वातावरण आल्हाददायक होतं. मात्र पावसाळ्याच्या दिवसात विविध प्रकारचे जंतुसंसर्ग, त्वचेचे विकार, सर्दी-खोकला, अपचन, ताप, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारखे आजारही मोठ्या प्रमाणात पसरतात. त्यामुळे या ऋतूमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरते. योग्य आहार, स्वच्छता, पाण्याचे शुद्धीकरण आणि जीवनशैलीत थोडा बदल करून आपण पावसाळ्यातील आजारांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करू शकतो.
पावसाळ्यात सर्वात महत्त्वाचं आहे शुद्ध पाणी पिणं. या काळात पाण्यातून पसरणारे आजार वाढतात, म्हणून उकळून घेतलेलं, फिल्टर केलं किंवा आरओ पद्धतीने शुद्ध केलेलं पाणीच पिणं योग्य ठरतं. रस्त्यावरील चहावाल्यांचे किंवा अन्नपदार्थ विक्रेत्यांचे पाणी प्यायचं टाळावं.
आहारावर नियंत्रण ठेवणं देखील आवश्यक आहे. पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते, त्यामुळे तेलकट, मसालेदार आणि जड अन्न खाणे टाळावे. त्याऐवजी हलकं, पचायला सोपं अन्न जसे की उकडलेली भाजी, वरण-भात, सुप आणि फळांचा समावेश करावा. पावसात बाहेरील खाण्याचे प्रमाण कमी करावं. भजी, समोसे, वडे यांसारखे तळलेले पदार्थ खाल्ल्यास अॅसिडिटी, अपचन आणि अन्नविषबाधा होण्याचा धोका वाढतो.(Latest Marathi News)

Monsoon Health Care
व्यक्तिगत स्वच्छता राखणं हे अजून एक महत्त्वाचं पाऊल आहे. पावसात सतत ओले कपडे, बुटांमध्ये अडकलेलं पाणी, चिखल आणि दमट वातावरण यामुळे त्वचेच्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे पावसात भिजल्यावर लगेच कपडे बदलावेत, शरीर स्वच्छ कोरडं ठेवावं. दररोज आंघोळ करताना अँटीसेप्टिक लिक्विड वापरणं उपयोगी ठरते. पायात साचलेल्या पाण्यातून फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो, म्हणूनच घरात आल्यानंतर पाय व्यवस्थित धुवून कोरडे ठेवावेत.(Monsoon Health Care)
=============
हे ही वाचा :
Water : दिवसभरात किती पाणी प्यावे?, जास्त पाणी पिण्याचे तोटे
वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय, तुळस करेल मदत
==============
डासांपासून संरक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे. पावसात ठिकठिकाणी साचलेले पाणी हे डासांची उत्पत्ती वाढवतात. त्यामुळे घरात आणि आजूबाजूला पाणी साचू देऊ नये. डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणी, मच्छर मारक स्प्रे, क्रीम किंवा रिपेलेंट्स वापरावेत. विशेषतः डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या रोगांचा धोका पावसात खूप वाढतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हेही तितकंच गरजेचं आहे. यासाठी हळद, लसूण, आल्याचा वापर आहारात करावा. तसेच ताज्या फळांचा, विशेषतः सीझनल फळांचा आहारात समावेश करावा. आवळा, संत्री, पपई, टोमॅटो यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. याशिवाय दररोज थोडावेळ व्यायाम, योगा करण्यासह पुरेशी झोप घेणेही फार महत्वाचे आहे. जेणेकरुन मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.