होळी म्हणजे आनंद आणि उत्साह. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच लोकांचा आवडता सण म्हणून होळीची ओळख आहे. होळी हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येते ती रंग बेरंगी रंगांची उधळण. एकमेकांना डोक्यापासून ते पायापर्यंत रंगात न्हाऊन टाकायचे म्हणजे होळी. होळी नेहमीच मतभेद, मनभेद विसरून सर्वांनाच जवळ आणते. भारतामध्ये विविध ठिकाणी अनेक प्रकारची होळी खेळली जाते. रंगांसोबतच, पाण्याची, फुलांची होळी खेळली जाते तर एका ठिकाणी पत्नी आपल्या पतीला लाठी मारून देखील होळी साजरी केली जाते. मात्र भारतातील एका ठिकाणी चक्क चितेच्या राखेची होळी खेळली जाते. ऐकून आश्चर्य वाटले ना…? मात्र हे खरे आहे. जाणून घेऊया याच खास होळीबद्दल. (Holi)
मसान होळीमध्ये वापरली जाणारी राख किंवा भस्म बहुतेकदा स्मशानभूमीतून आणि मृतांच्या जळालेल्या मृतदेहांपासून आणली जाते. ही होळी खेळली जाते, वाराणसीमध्ये. येथे चितेच्या राखेने होळी खेळण्याची परंपरा आहे. होळीच्या काही दिवस आधी काशी विश्वनाथ मंदिर आणि मणिकर्णिका घाटावर चितेच्या राखेसह होळी खेळली जाते, ज्याला मसान होळी म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीला भगवान शिवाचे लग्न झाल्यानंतर, ते रंगभरनी एकादशीच्या दिवशी माता पार्वतीला गौना करून काशीत आणतात. पण महादेव हे ‘भूतभावन’ असल्याने, त्यांचे गण, भूत-प्रेत आणि पिशाच लग्नात सहभागी होऊ शकत नाहीत. म्हणूनच, दुसऱ्या दिवशी महादेव मणिकर्णिका घाटावर आपल्या या गणांसोबत चितेच्या राखेने होळी खेळतात. (Todays Marathi Headline)

धार्मिक मान्यतेनुसार दरवर्षी रंगभरी एकादशीच्या दिवशी हरिश्चंद्र घाटावर महादेवाचे भक्त चितेची राख व अस्थिकलश घेऊन होळी खेळतात. रंगभरी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी मणिकर्णिका घाटावर होळी खेळली जाते. दरवर्षी मोठ्या संख्येने लोक येथे होळी खेळण्यासाठी येतात. रंगभरी एकादशीपासून सुरू झालेल्या पाच दिवसांच्या होळी उत्सवाच्या पुढच्या भागात, विश्वनाथ चिता-भस्मासह होळी खेळण्यासाठी स्मशानभूमीत येतो, ज्याची सुरुवात हरिश्चंद्र घाटावर महाशंशान नाथांच्या आरतीने होते. यानंतर पहिली मिरवणूकही काढली जाते. (Latest Marathi News)
तेव्हापासून हा दिवस मसान की होळी म्हणून साजरा केला जातो. मसानची होळी हे जीवन आणि मृत्यू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याचे प्रतीक आहे. ही परंपरा भगवान शिव यांच्याबद्दल आदर आणि मृत्यूवरील त्यांच्या विजयाचे प्रतीक आहे. काशी शहराला मोक्षनगरी असेही म्हणतात. विशेषतः होळीच्या वेळी ज्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले जातात, त्यांना निश्चितच मोक्ष मिळतो असे मानले जाते. काशी शहर हे जगातील एकमेव शहर आहे जिथे माणसाचा मृत्यू देखील शुभ मानला जातो आणि अंत्ययात्रा देखील मोठ्या थाटामाटात पार पडते. (Top Trending Headline)
=========
Ekadshi : भगवान शिवांना समर्पित असलेल्या एकमेव अशा रंगभरी एकादशीचे महात्म्य
=========
मसान होळी ही स्मशानभूमीच्या परिसरात खेळली जाते. हिंदू परंपरेनुसार, स्मशान विधींपासून महिलांना दूर ठेवण्याची प्रथा आहे. मसान होळीच्या वेळी संपूर्ण वातावरण चितेच्या राखेने भरलेले असते. या परंपरेपासून महिलांना दूर ठेवण्यामागे काही धार्मिक आणि तांत्रिक कारणे दिली जातात. स्मशान ही जागा मृतदेहांच्या दहनाची असते. मसान होळीच्या वेळी तिथे तीव्र ऊर्जा असते. असे मानले जाते की, या राखेच्या खेळातून निर्माण होणारी ऊर्जा सामान्य लोकांच्या, विशेषतः महिलांच्या ऊर्जेवर परिणाम करू शकते. नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडू नये, या संरक्षणात्मक दृष्टीकोनातून महिलांना तिथे जाण्यास मज्जाव केला जातो. (Social News)
(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
