फळांचा राजा म्हटल्यावर आपल्यासमोर येतो तो आंबा ! तस या वर्षातला आंब्याचा सिझन संपत आलाय पण वर्षातल्या ३/४ महिन्यांसाठी मिळणारा हा आंबा अनेकांना खुश करून जातो हे नक्की ! पण आपल्याला खुश करणाऱ्या या आंब्याने अनेक देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय असे प्रसंग हाताळलेत हे तुम्हाला सांगितलं तर पटेल का ? पटत नसलं तरी हे खरं आहे ! कोणत्या आहेत त्या राजकीय घडामोडी आणि त्यामागचे किस्से हे जाणून घेऊ. तर कित्येक राजकीय प्रश्न हे दोन व्यक्तीच्या बैठकीत आंब्याचा आस्वाद घेत सुटले आहेत याची आपल्या इतिहासात नोंद आहे. थोडक्यात इतरवेळी फक्त आपल्या चवीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या फळाने राजकारणातही आपली मोहोर उमटवली आहे. कोणत्या होत्या या प्रसिद्ध ‘आंबा भेटी’? जाणून घेऊ. (Political News)
यात सगळ्यात महत्वाची आणि जुनी भेट म्हणजे औरंगजेब आणि पर्शियाचा शाह अब्बास यांची ! मुघल साम्राज्यातील राजा औरंगजेब, जहांगीर आणि शहाजहान यांना आंबा प्रचंड आवडत असे. औरंगजेबने तर आंबा हे फळ आजच्या रुपये या चलनाप्रमाणे वापरण्याची प्रथा सुरू केली होती. पर्शियाच्या शाह अब्बासने जेव्हा स्वतःला मुघलांचा नवा ‘सम्राट’ म्हणून घोषित करण्याचा चंग बांधला होता तेव्हा त्याला हा हट्ट सोडण्यासाठी औरंगजेबने त्याला काही पेट्या आंबे देऊन हा हट्ट सोडण्यास भाग पाडलं होतं. बल्कन देशाच्या राजाने औरंगजेबला शांतता प्रस्ताव पाठवतांना २०० उंटांवरून आंबे पाठवले होते अशी एका अरबी पुस्तकात नोंद आहे. (Top Stories)
१७ व्या शतकात म्हणजेच मुघल राजांच्या काळात तयार केलेलं आंब्याच्या आकाराचं एक रत्नजडित भांडंसुद्धा भारताटाळ्या एका ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात बघायला मिळतं. याशिवाय भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या कार्यकाळात भारत भेटीवर आलेल्या प्रत्येक परदेशी पाहुण्यांना आंबा खाऊ घालायचे इतकच नाही तर कोणत्याही राजकीय व्यक्तीला भेटतांना राजकीय शिष्टाचार म्हणून ते नेहमी आंबा सोबत न्यायचे. अशी माहिती काही ठिकाणी उपलब्ध आहे असं सांगितलं जातं. याशिवाय दुसरा गाजलेला किस्सा म्हणजे ऑगस्ट १९६८ मध्ये पाकिस्तानच्या अर्शद हुसेन या परराष्ट्र मंत्र्याने चीनचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या माओ से ठॉग यांना पाकिस्तानी आंब्याची पेटी भेट केल्याची घटना बरीच गाजती होती. पण माओ झे-डाँगने या पेटीतील आंब्यांना हातही न लावता त्यांनी आपल्या नोकरांना ते आंबे खायला दिल्याची बातमी सुद्धा मीडियाने पब्लिश केली होती. हे त्याने जनतेच्या प्रेमापोटी केलं होतं अशी सारवासारव नंतर करण्यात आली होती. (Political News)
पुढे १९८१ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती झिया उल हक यांनी दोन देशातील संबंध सुधारण्यासाठी अन्वर रतौल या प्रकारातील आंब्याची पेटी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधींना पाठवल्याची माहिती उपलब्ध आहे. पाकिस्तानमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला हा आंबा भारतात रतौल नावाने प्रसिद्ध आहे. रतौल हे उत्तरप्रदेशातील एका गावाचं नाव आहे. त्यावरूनच या आंब्याला हे नाव पडलं आणि तरीही पाकिस्तानी लोक या आंब्याला त्यांच्या देशातच पिकणारा आंबा म्हणतात. यावरून दोन्ही देशात वादाला पेव फुटलं होतं. यानंतर २००६ मध्ये अमिरेकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश हे भारतात आले होते. दिल्लीत होऊ घातलेल्या त्यांच्या आणि भारतीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या भेटीत भारतीय आंबा खाण्याची इच्छा जॉर्ज बुश यांनी व्यक्त केली होती. त्यावेळी जवळजवळ वीस वर्ष अमेरिकेत भारतीय आंब्याच्या आयातीवर बंदी होती. पण या बैठकीत भारतीय आंब्याची चव चाखल्यानंतर जॉर्ज बुश यांनी आंब्यांअसं असलेली हि बंदी उठवली होती. जॉर्ज बुश यांच्या या भारत भेटीनंतर भारताची शान असलेल्या हापूस आणि केशर आंब्याची पहिली पेटी वॉशिंग्टन येथे पोहोचली होती. त्यानंतर आत्तापर्यंत अमेरिकेत सुरू असलेल्या आंबा निर्यातीमुळे भारतीय शेतक-यांना तर फायदा झालाच, शिवाय भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त कृषी संशोधनाला चालना मिळाली. (Top Stories)
===============
हे देखील वाचा : जांभूळ खाण्याचे भन्नाट आरोग्यदायी फायदे, मधुमेहावरही उपयुक्त
===============
यानंतर अगदी हल्लीचा प्रसंग म्हणजे २०१५ मध्ये ईदच्या मुहूर्तावर नवाज शरीफने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० किलो आंब्याची भेट पाठवली होती. इतकंच नाही तर, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नावाने सुद्धा १५ किलो आंबे पाठवले होते. शिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सुद्धा १० किलो आंब्याची पेटी पाठवली होती. भारताने आंबा या फळाचा आदर म्ह्णून या भेटींचा स्वीकार केला. थोडक्यात १९८० मध्ये पाकिस्तानी आंबे इतर देशात भेट देण्याची सुरु झालेली परंपरा नवाज शरीफनेसुद्धा वालू ठेवली होती. त्यांनतर मार्च २०२१ मध्ये भारताने जगभरात कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त लसींचा शोध लावला आणि इतर देशांप्रमाणे बांग्लादेशला सुद्धा लस पाठवली होती. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी भारतात २६०० किलो हरभंगा आंबे पाठवले होते. ही भेट त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नावाने पाठवली होती. (Political News)
त्याशिवाय, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्यानावे सुद्धा त्यांनी आंबे पाठवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांनी शेख हसीना यांना पत्र लिहून याबद्दल कौतुक केलं होतं. २०११ मध्ये मुख्यमंत्री झाल्यापासूनची आपली परंपरा कायम ठेवत, ममता बॅनर्जी यांनी जून २०२१ च्या अखेरीस बंगालमधील निवडक आंब्याच्या जाती – हिमसागर, मालदा आणि लक्ष्मणभोग पंतप्रधान मोदींना पाठवल्या. तेव्हा पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा तृणमूल काँग्रेसकडून पराभव झाला होता. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निर्माण झालेती कटूता कमी करण्यासाठी हे केलं असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. त्यामुळे असा हा आपल्या सर्वांचा लाडका आंबा भावकी भावकीत वाद निर्माण करता असला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच त्याने २ देशांना जोडून ठेवलय इतकच !