भूत….नुसता शब्द जरी उच्चारला तरी भल्याभल्यांची बोबडी वळते. आजच्या आधुनिक काळात देखील अनेकांचा भुतांवर विश्वास आहे. आता भूत आहे की नाही हा पूर्णपणे वादाचा विषय आहे. त्यात आपल्याला पडायचे नाही. मात्र आजच्या काळात देशात अशा अनेक ऐतिहासिक वास्तू, ठिकाणं आहेत, जिथे भुतांचा वास असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणं तर सरकारनेच बंद करून ठेवले तर काही ठिकाणांमध्ये दिवस प्रवेश असतो मात्र रात्रीसाठी ती पूर्ण बंद असतात. (Malcha Mahal)
आपल्या आजूबाजूला देखील काही लहान मोठी ठिकाणं हॉन्टेड म्हणून प्रसिद्ध असतात. अनेकदा आपल्याला वाटते की, जी मोठी मोठी शहरं आहे तिथे अशा गोष्टी नसतील. कारण तसेच जर पाहिले तर या भुताच्या गोष्टींचा खासकरून संबंध गावाशी, छोट्या शहरांशी जास्त जोडलेला आहे. मात्र याला अपवाद देखील आहेत. आता ‘मालचा महाल’चे उदाहरण घ्या.(Haunted Places)
भारताची राजधानी असलेल्या दिल्ली सारख्या मोठ्या आणि आधुनिक शहरात असलेल्या या ‘मालचा महाल’ ठिकाणाचा उल्लेख नेहमीच हॉन्टेड प्लेस म्हणून करण्यात येतो. दिल्ली म्हटले की डोळ्यासमोर येतात ती चमचमीत खायची ठिकाणं, अनेक ऐतिहासिक वास्तू, शॉपिंगची ठिकाणं मात्र यासोबतच दिल्लीमध्ये अशी काही ठिकाणं आहेत ज्यांची ओळख सर्वाधिक हॉन्टेड प्लेसस मध्ये केली जाते. यातलेच एक ठिकाण म्हणजे ‘मालचा महाल.’ (Marathi)
========
हे देखील वाचा : Palakmantri : पालकमंत्री म्हणजे काय? त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात?
========
दिल्लीच्या चाणक्यपुरीमध्ये असलेला भुताचा राजवाडा अशी ओळख असणाऱ्या ‘दिल्लीच्या चाणक्यपुरीमध्ये असलेल्या एका भुताच्या राजवाड्याबद्दल सांगणार आहोत, ज्याचं नाव आहे ‘मालचा महला’बद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत. सरदार पटेल मार्गाजवळील सेंट्रल रिजवर असलेला हा राजवाडा सुमारे ७०० वर्षे जुना असल्याचे म्हटले जाते. या राजवाड्यात अवधची राणी विलायत महल ४० वर्षे तिचा मुलगा प्रिन्स अली रझा आणि राजकुमारी सकिना यांच्यासोबत राहत होती. हे संपूर्ण कुटुंब प्रकाश आणि पाण्याविना राहत होते. मात्र, हळूहळू या राजवाड्याचे रूपांतर दिल्लीतील प्रसिद्ध अशा भुताच्या राजवाड्यात झाले. (Marathi Top News)
‘मालचा महल’ चाणक्यपुरी, दिल्ली येथे आहे. जो १४ व्या शतकात बांधला गेला होता. स्वतःला अवधच्या राजघराण्यातील वंशज असल्याचे सांगणाऱ्या बेगम विलायत यांचा आत्मा अजूनही महालात आहे, असेच इथल्या स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यांचा विश्वास आहे की ‘मालचा महल’ हा झपाटलेला असून इथे बेगमचा आत्मा वास करतो. असे म्हटले जाते की बेगमने १९९३ मध्ये चिरलेले हिरे गिळले आणि आपला जीव घेतला. (Marathi Latest News)
त्यानंतर पुढे १० दिवस त्यांचा मृतदेह पडून होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बेगम विलायत महल यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी बेगम यांचा मृतदेह दफन करण्याऐवजी त्यावर लेप लावून तो व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नांत बेगम यांच्यावर योग्य प्रकारे अंत्यसंस्कार झाले नाहीत, त्यामुळे आजही बेगम यांचा आत्मा या महालामध्ये भटकतो, असे तिथल्या लोकांना वाटते. (Marathi Trending News)
काही वर्षांपूर्वी सरकारने दिल्लीतील मालचा महलसाठी एक हॉर्न वॉक सुरू केला होता, जो आता बंद करण्यात आला आहे. दिल्ली टुरिझमच्या माहितीनुसार, २०२३ मध्ये या पॅलेससाठी चालण्याची वेळ संध्याकाळी ५.३० ते ७ अशी होती. यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून प्रवेश शुल्क ८०० रुपये घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र काही काळाने हा वॉक देखील बंद करण्यात आला. याचे कारण म्हणजे इथे अनेकांना आलेले विचित्र अनुभव. (Top Stories)
या वॉकचा अनुभव घेतलेल्या लोकांनी सांगितले की, या मालचा महालाच्या पायऱ्यांवरील अंधार आणि राजवाड्याच्या आतून येणारे विचित्र आवाज अतिशय भीतीदायक आहेत. शिवाय या महालाच्या आजूबाजूला घनदाट झाडी आणि माकडं, गिधाडांसह अनेक प्राणी पाहायला मिळाले. राजवाड्याकडे जाण्याचा मार्ग देखील खूपच निर्जन आणि भीतीदायक आहे. (Social News)
========
हे देखील वाचा : Dadasaheb Phalke : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके
========
या माल महालामध्ये पोहचण्यासाठी एक किलोमीटर पायी चालावे लागते. त्यानंतर पायऱ्या चढून वर गेल्यावर परतीचा मार्ग दिसत नाही. कारण या महालाची रचनाच अशी केली आहे. बेगमच्या मालचा महलमध्ये वास्तव्य करणारी शेवटची व्यक्ती बेगम विलायत महलचा मुलगा प्रिन्स अली रझा होती, जो अवधचा शासक असल्याचा दावा करत होता. मात्र २ सप्टेंबर २०१७ रोजी तो याच राजवाड्यात मृतावस्थेत आढळला होता. आजही हा महाल जीर्ण अवस्थेत असून, लोकं इथे जायला घाबरतात.