नवरात्रौत्सवावेळी सर्वत्र मंडप बांधून त्याची सजावट केली जाते. तर दुर्गेच्या नऊ रुपांची नऊ दिवस पुजा होते. बंगाल ते देशातील विविध ठिकाणी देवी दुर्गेची पुजा मोठ्याभक्तिभावाने होते. मात्र देवी दुर्गेने ज्या राक्षसाचा वध केला होता तो महिषासुर दानवांचा राजा असल्याचे सांगितले जाते. महिषासुरामुळे (Mahishasura) नेहमी वाद ही व्हायचे. परंतु सत्य असे ही आहे की, काही राज्यातील आदिवासी आणि सामान्य लोक त्याची पूजा करतात. त्याला आपला पुर्वज मानता.
सर्वात प्रथम भारतीय मायथॉलॉजी मध्ये महिषासुराच्या वधाची जी कथा प्रचलित आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. त्यानंतर देशातील काही राज्यातील लोकांसह आदिवासींचे त्याच्याशी काय संबंध होते हे सुद्धा पाहूयात.
हिंदू माइथॉलोजीच्या मते महिषासुर एक राक्षस होता. त्याचे वडिल असुरांचा राजा रंभ होता. रंभाला एका महिषीवर (म्हैस) प्रेम जडले. महिषासुर याच दोघांचे मुलं आहे. व्यक्ती आणि म्हैस यांच्यातून निर्माण झालेल्या मुलाला महिषासुर असे नाव ठेवले गेले. म्हणजेच जेव्हा वाट्टेल तेव्हा मनुष्याचे रुप किंवा म्हशीचे रुप तो धारण करु शकत होता.
तेव्हा देवी दुर्गेने जन्म घेतला
महिषासुराने भगवान ब्रम्ह यांची कठोर तपस्या केली. ब्रम्हांनी त्याला वरदान मागण्यास सांगितले असता त्याने असे म्हटले की, कोणताही पुरुष त्याा मारु शकत नाही आणि त्याच्यावर कोणीही विजय मिळवू शकणार नाही. तर तो मानव असो, देवता असो किंवा राक्षस. वरदान मिळाल्यानंतरच महिषासुर विक्राळ झाला. ते सर्वत्र विनाश करु लागला होता. त्याने इंद्रदेवांवर विजय मिळवून स्वर्गावर आपले वर्चस्व स्थापन केले होते. ब्रम्ह, विष्णु महेश यांच्यासह सर्व देव त्याच्या अशा वागण्यामुळे त्रस्त झाले होते. अशातच महिषासुराचा (Mahishasura) संहार करण्यासाठी सर्व देवतांच्या तेजातून देवी दुर्गेने जन्म घेतला.

देवी दुर्गेला सर्व देवतांनी आपली अस्र-शस्र दिली. भगवान शंकराने आपले त्रिशूळ दिले. भगवान विष्णूने आपले चक्र दिले, इंद्र देवाने वज्र आणि घंटा दिली, अशा प्रकारे सर्व देवतांनी आपल्याकडील अस्र-शस्र दिल्यानंतर देवी दुर्गा सिंहावर बसून महिषासुराचा संहार करण्यास निघाली.महिषासुर आणि त्याच्या सेनेचे देवी दुर्गेसोबत भयंकर युद्ध झाले.देवी दुर्गेने महिषासुराचा वध करुन देवतांना त्याच्या अत्याचारापासून मुक्ति दिली. महिषासुराच्या वधाच्या कारणास्तवच देवी दुर्गेला महिषासुर मर्दिनी असे म्हटले गेले.
हे देखील वाचा- रावणाच्या पत्नीने बांधलेले ‘हे’ मंदिर
कोणत्या राज्यात आदिवासी मानतात महिषासुराला आपला पुर्वज
असुर नावाची जनजाति झारखंडच्या गुमला, लातेहार, लोहरदगा आणि पलामू येथे आढळते. तर उत्तर बंगालमध्ये अलीपुरदुआर जिल्हा आणि आसपास आढळतात. असुर जातीची लोक असे मानतात की, हुदर दुर्गचे पुर्वज आहेत- हे महिषासुराचे संथाल नाव आहे. बहुतांश दलित आणि आदिवासी समुदायातील लोक मानतात की, तो त्यांच्या विश्वास आणि परंपरेचा एक भाग आहे. ही लोक महिषासुर आणि देवी दुर्गेच्या कथेला विरोध करतात. तसेच झारंखड मधील असुर जमाती स्वत:ला महिषासुराचे वंशज मानत त्याला आपला कुलगुरु ही मानतात. पण त्याची पूजा केली जात नाही. ही लोक नवरात्रौत्सवादरम्यान दहा दिवसापर्यंत शोक व्यक्त करतात. या वेळी कोणत्याही प्रकारचे रितींचे किंवा परंपरेचे पालन केले जात नाही. आदिवासी समयुदायातील लोक असे सांगतात की, त्या रात्री विशेष काळजी घेतली जाते जेव्हा महिषासुराचा वध करण्यात आला होता.