Home » Bhgwan Mahavir : भगवान महावीर जयंती

Bhgwan Mahavir : भगवान महावीर जयंती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Bhgwan Mahavir
Share

सर्वधर्म समभाव हीच भारताची जगामध्ये ओळख आहे. भारतामध्ये सर्व धर्माचे लोकं अगदी गुण्यागोविंदाने राहतात. हे काही वेगळे सांगायची गरज नाही. आपल्या देशात सर्वच धर्मातील लोकांचे सणवार अगदी आनंदाने साजरे केले जातात. लवकरच जैन धर्मियांचा अतिशय महत्वाचा आणि मोठा सण महावीर जयंती देखील साजरा होणार आहे. जाणून घेऊया याच सणाबद्दल अधिक माहिती.

जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर यांच्या जन्माच्या स्मरणार्थ जैन समुदाय महावीर जयंती साजरी करतो. महावीर जयंती ही चैत्र शुक्ल त्रयोदशीला साजरी केली जाते. भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे आणि अंतिम तीर्थंकर होते. महावीर जयंतीच्या दिवशी भगवान महावीरांच्या शिकवणीचे स्मरण केले जाते. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि भक्तीभावाने विविध धार्मिक विधी करतात. या वर्षी महावीर जयंती गुरुवारी १० एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी केली जाणार आहे.(Bhgwan Mahavir)

Bhgwan Mahavir

भगवान महावीरांनी कायमच त्यांच्या जीवनात अहिंसेला सर्वोच्च स्थान दिले आणि हेच त्यांच्या जीवनाचे मोठे तत्व होते. भगवान महावीर यांनी कायमच सर्वच प्राण्यांप्रती करुणा बाळगण्याचा संदेश दिला. महावीर जयंतीच्या दिवशी भगवान महावीरांनी दिलेल्या अहिंसेच्या महान संदेशाची आठवण काढली जाते. शिवाय हा दिवस सर्वच लोकांना प्राणीमात्रांप्रती दयाळूपणे वागण्याची प्रेरणा देते.(Marathi Latest News)

=========

हे देखील वाचा : Urmila Baa : आकर्षक हास्याने सगळ्यांसाठी प्रेरणा बनलेल्या उर्मिला बा यांचा प्रेरणादायी प्रवास

==========

भगवान महावीरांनी अहिंसा, सत्य, अहंकार, ब्रह्मचर्य आणि तपस्वी या पाच महाव्रतांचे पालन करून मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवला. हा दिवस आत्मसंवर्धन आणि आत्मविकासाची प्रेरणा देतो. भगवान महावीर यांनी कायम समाजसुधारक म्हणून विशेष कार्य देखील केले. त्यांनी जातिवाद, लिंगभेद, आदी अनेक सामाजिक वाईट गोष्टींविरुद्ध आवाज उठवत सर्वच लोकांना समान वागणूक देण्याचे, समान हक्क आणि समान संधी देण्याचे समर्थन केले. (Marathi Trending News)

भगवान महावीरांचा जन्म सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी वैशाली गणराज्यातील कुंडग्राम येथे अयोध्या इक्ष्वाकुवंशी क्षत्रिय कुटुंबात झाला. तरुणपणी भगवान महावीर यांचा विवाह यशोदा नावाच्या राजकन्येशी झाला होता आणि त्यांना प्रियदर्शन नावाची मुलगीही होती. ते २८ वर्षांचे असताना त्यांच्या पालकांचे निधन झाले. भगवान महावीर यांचा मोठा भाऊ नंदीवर्धन यांच्या सांगण्यावरून महावीर २ वर्षे घरात राहिले. मात्र अखेर वयाच्या ३० व्या वर्षी मार्गशीर्ष कृष्ण दशमीच्या दिवशी भगवान महावीर यांनी दीक्षा घेतली. (Marathi Top News)

Bhgwan Mahavir

=========

हे देखील वाचा : Breast cancer : जाणून घ्या ब्रेस्ट कॅन्सरची माहिती आणि लक्षणं

==========

या काळात महावीरांनी तपश्चर्या, संयम आणि समता साधली आणि पंचमहाव्रताचा धर्म पाळला. इतरांना दुःख देऊनच इंद्रियांचे सुख आणि इंद्रिय वासनांची प्राप्ती होऊ शकते हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे सर्वांशी प्रेमाने वागताना त्यांनी अवघ्या जगाला सत्य आणि अहिंसेचा धडा शिकवला. सर्व जगाला उपदेश केला. त्याग आणि संयम, प्रेम आणि करुणा, नम्रता आणि सदाचार हे त्यांच्या उपदेशांचे सार होते. १२ वर्षांच्या खडतर तपस्यानंतर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी समाविष्काराने ज्ञानाचा प्रसार केला. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांना पावापुरीतून मोक्ष मिळाला. या काळात महावीर स्वामींचे अनेक अनुयायी तयार झाले, ज्यात त्या काळातील प्रमुख राजे बिंबिसार , कुनिका आणि चेतक यांचा समावेश होता. (Top Stories)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.