Home » झांसी मधील ‘या’ मंदिरात दिवसा देवी तीन रुपात दर्शन देते, अल्हाने सुद्धा दिला होता आपल्या मुलाचा बळी

झांसी मधील ‘या’ मंदिरात दिवसा देवी तीन रुपात दर्शन देते, अल्हाने सुद्धा दिला होता आपल्या मुलाचा बळी

by Team Gajawaja
0 comment
Lahari Devi Mandir
Share

नवरात्रीच्या दिवसात झांसी मधील लहर माता मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या मंदिराबद्दल अशी मान्यता आहे की, येथे येणाऱ्या भाविकांच्या इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. हे मंदिर अत्यंत प्राचीन आहे आणि बुंदेलखंडचे वीर योद्धा आल्हा उदल यांच्या वीरतेची कथा आणि त्याग हा साक्षीदार आहे. या मंदिरात स्थापन करण्यात आलेली देवी दिवसा तीन वेळा आपले रुप बदलते. माता लहन देवी शक्ति पीठ मंदिराची स्थापना एक हजार वर्षापूर्वी महोबा बाले चंदेल योद्धा आला उदल यांनी केली होती. स्थापनेनंतर या मंदिराला मनिया देवीच्या नावाने ओळखले जात होते. (Lahari Devi Mandir)

पहुज नदीच्या जवळ मां मनियां देवीच्या मंदिराच्या नावाच्या नदीच्या प्रवाहामुळे तिला लहर की देवी असे नाव पडले. आता भाविक देवीला लहर की देवी अशा नावाने ओळखतात. इतिहासातीच्या पानांवर याबद्दल लिहिलेले पाहतो तेव्हा मंदिराचे पुजारी मोहन गिरी सांगतात की, महोबाचे योद्धा आल्हा यांच्या पत्नीचे अपहरण एक हजार वर्षांपूर्वी पथरीगढचे राजा ज्वाला सिंह यांनी केले होते.

Lahari Devi Mandir
Lahari Devi Mandir

आल्हा यांची पत्नी मछला रानीचे झाले होते अपहरण
राणीला सोडवण्यासाठी महोबाचे योद्धा आल्हा उदल हे आपल्या सैन्यासह पथरीगढसाठी निघाले. रस्त्यात आल्हा यांनी आपल्या सैन्यासह झांसी मधून निघालेली पहूज नदीच्या किनाऱ्यावर आराम केला. तेथेच मनिया देवीला बसवले. असे सांगितले जाते की, जेव्हा दुसऱ्या दिवशी आल्हा उदलने आपल्या सैन्यासह पथरीगढ जाण्यासाठी तयारी करत होते, तेव्हा मां मनिया देवीने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला होता.

हे देखील वाचा- उज्जैनच्या भुखी माता मंदिरात यादिवशी असते भाविकांची गर्दी 

मां मनिया देवी द्यावी लागणार होता पुत्राचा बळी
मां मनिया देवीला सोडून दोन्ही भावंड पथरीगढं पोहचले आणि पथरीगढंटचा राजा ज्वाला सिंग यांच्यामध्ये जोरदार युद्ध झाले. तेव्हा आल्हा उदल यांच्या सैन्याला राजा ज्वाला सिंह यांने दगड बनवले. युद्धादरम्यान आल्हाने पाहिले की, त्याचे सैनिक दगडाचे झाले होते. अशा स्थितीत राजा ज्वाला सिंह हैराण झाला. तेव्हा आल्हा उदलचे गुरु अमरा यांनी म्हटले की, जर तुला राजा ज्वाला सिंह याचा पराभव करायचा असेल तर मां मनिया देवीला आपल्या पुत्राचा बळी द्यावा लागेल. तेव्हाच तुझे सैन्य जीवंत होईल. जेव्हा आल्हाने होकार दिला तेव्हा गुरु अमराने त्याचे सैन्य जीवंत केले आणि राजा ज्वाला सिंहचा पराभव केला. (Lahari Devi Mandir)

युद्ध जिंकल्यानंतर आल्हाने झांसी येथे येऊन मां मनिया देवीला आपल्या पुत्राचा बळी दिला आणि बळीचा स्विकार करत देवीने त्याला पुन्हा जीवित केले. तेव्हा पासून आतापर्यंत मनिया देवी म्हणजेच लहर की देवी हिच्यासाठी भाविक दूरदूर वरुन येतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.