मंडळी जगात कुठे ना कुठे काहीं ना काही सतत चालू असतंच, हा फक्त त्यातल्या काही गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो काहींचा नाही ! पण नुकतीच मराठी माणसाला challenge करणारी एक गोष्टी इटलीच्या मिलानमध्ये घडली ! ‘Prada Fashion Week’ आणि त्यामध्ये रॅम्पवर वापरलेली आलेली आपली महाराष्ट्रीयन कोल्हापुरी ! कोल्हापुरी चप्पल तशी फार आधीपासून अस्तित्वात आहेच. पण Prada या इंटरनॅशनल ब्रँडने ही चप्पल वापरल्यामुळे साऱ्या जगाचं लक्ष आपल्या महाराष्ट्राकडे वळलं. जगभरात याबद्दल चर्चा सुरू झाली. साधी १००० ते ५००० मध्ये मिळणारी ही आपली कोल्हापुरी चप्पल prada लेदर सँडल म्हणून १ लाख रुपयांना विकणारे ! दरम्यान अनेक फॅशन डिझायनर्सनी या पारंपरिक चपलेची “Sustainable & Timeless Fashion” म्हणून प्रशंसा केली. पण याच कोल्हापुरी चपलेचा नेमका इतिहास काय ? ही चप्पल सर्वात आधी कोणी बनवली ? या आणि अशा अनेक गोष्टी जाणून घेऊ. (Prada)
कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी माणसांचा रांगडेपणा, त्यांचा रुबाब आणि त्यांचा हाच रुबाब एका गोष्टीतून अगदी स्पष्ट जाणवतो ती म्हणजे कोल्हापुरी पायताण ! अर्थात इथे बनवण्यात येणारी खास चप्पल ‘कोल्हापुरी’ ! राजकीय नेत्यांपासून सिने कलाकारांपर्यंत या कोल्हापुरी पायतानाची भुरळ सगळ्यांनाच असते. आता आज ही चप्पल जगभरात गाजतेय पण हे यश कोणा एकाच नाही तर एका राजापासून संपूर्ण प्रजेपर्यंत प्रत्येकाचं हे यश आहे. कस बघूया …
तर या कोल्हापुरीच्या इतिहासात डोकावलं तर याची निर्मिती सगळ्यात आधी १२ व्या शतकात झाली. तेव्हा कर्नाटकच्या बिदर येथील राजा बिज्जल आणि त्यांचे पंतप्रधान बसवण्णा म्हणजेच बसवेश्वर यांनी सर्वप्रथम स्थानिक कॉर्डवेनर्सना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरी चप्पल उत्पादनास प्रोत्साहन दिल असं सांगण्यात येत. पुणेरी जोडा, जयपुरी चढाव याबरोबरच कोल्हापुरी चपलांची निर्मिती झाली. पुढे पुणेरी जोडा जवळजवळ नाहीसाच झाला तरी जयपुरी चढाव आणि कोल्हापुरी चप्पल मात्र आजही टिकून आहेत. (Prada)
दरम्यान कोल्हापुरी पहिल्यांदा १३ व्या शतकात घातली गेली होती. तेव्हा या चपलांच design जाड चामड्याच होत. ज्यात मजबूती आणि टिकाऊपणा होता. मात्र पुढे १९२० च्या दशकात कोल्हापुरातील कारागिरांनी या design मध्ये बदल करून ती अधिक आरामदायी आणि हलकी केली. आणि तेव्हाच हि कोल्हापुरी खऱ्या अर्थाने ब्रँड म्हणून उदयाला आली. नंतर कोल्हापुरी चप्पल उद्योगाला प्रोत्साहन दिल छत्रपती शाहू महाराजांनी आणि त्यांनीच याच उत्पादन वाढवल आणि या प्रदेशात २९ टॅनिंग सेंटर्सची स्थापना केली. (Top Stories)
महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, बागलकोट आणि विजापूर या आठ जिल्ह्यांमध्ये हि चप्पल प्रामुख्याने बनवली जाते. दरम्यान या या कोल्हापूरी चपलेचे अनेक प्रकार आहेत जसं की कापशी, पायतान, कचकडी, बक्कलनाली पुकरी ई. मोस्टली हि नावं त्यांच्या गावावरून देण्यात आली आहेत. पण ही चप्पल इतकी खास का आहे? तर या चप्पलांची खासियत म्हणजे शंभर टक्के नैसर्गिक चामड्यापासून हाताने बनवलेली असते, कोणत्याही मशीनचा यात वापर नाही, आणि टिकाऊपणा तर एवढा की वर्षानुवर्षं टिकते. ही कोल्हापुरी चप्पल बनवण्याची natural process प्राण्यांच्या कातडीवर प्रक्रिया करण्यापासून सुरू होते, ज्याला सुमारे ३ ते ४ महिने लागतात. या पद्धतीत कोणतही रसायन वापरल जात नाही, फक्त झाड, पान इत्यादींपासून टॅनिंग केल जात. त्यामुळे मऊ, टिकाऊ चामड मिळत. (Prada)
दरम्यान सपाट सोल, मजबूत बांधणी आणि पायाच्या बोटाच्या लूपसह खास डिझाइनसाठी ही चप्पल ओळखली जाते. आता ही एक चप्पल बनवायला साधारण ३/४ दिवस लागतात तर कधी कधी १० ते १२ दिवसही लागतात इतक्या मेहनतीचं आणि बारीक कलाकुसरीचा हे काम असत. आज जवळपास २५,००० पेक्षा जास्त कुटुंबं या व्यवसायावर अवलंबून आहेत. कोल्हापुरी चप्पल व्यवसायातून दरवर्षी सरासरी ४० कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल होते. आता बघायचं झालं तर Amazon, Myntra यासारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरही याची मागणी वाढली आहे. या साइट्सवर या पारंपरिक चप्पल ‘Luxury Boho Footwear’ म्हणून विकल्या जातात. (Top Stories)
=================
हे देखील वाचा : Kolhapuri Chappal: राज्या-महाराजांच्या पायाची शोभा वाढवणाऱ्या कोल्हापुरी चप्पलेचा जाज्वल्य इतिहास
=================
पण या कोल्हापूरीच्या आजवरच्या प्रवासात घडलेली महत्वाची घटना म्हणजे २०१८ साली ‘कोल्हापुरी चप्पल’ला मिळालेला GI Tag! यामुळेच हि कोल्हापुरी चप्पल खऱ्या अर्थाने जगभर पोहोचली. पण याच कोल्हापुरी चप्पलला त्यांच्याच देशात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय आणि इथल्या कारागीर लोकांना अशी भीती आहे की ही कला लवकरच नष्ट होईल. यामध्ये प्रामुख्याने कामगारांची कमतरता ही एक मोठी चिंता आहे. कारण सध्याची तरुण पिढी जास्त पैसे आणि स्टेबल जॉबच्या नादात हे काम करायला तयार होत नाही. शिवाय देशात स्वस्त आणि same गोष्टींचा ओघ वाढलेला असताना खऱ्या अस्सल कोल्हापुरीला लोक विचारेनाशी झालीयेत. मगाशी आपण बोललो ती नैसर्गिक प्रक्रिया पण याव्यतिरिक्त एक रासायनिक पद्धतसुद्धा आहे जी सोपी आणि फास्ट आहे. जी कमीत कमी दिवसात तयार होते पण त्यात गुणवत्ता कमी आहे आणि त्यामुळे पायाला खाज सुटणे आणि ऍलर्जीसारखे दुष्परिणाम होऊ शकतात. तुलना करायची झाली तर हॅन्डमेड चामड्याच्या चपलेपेक्षा ही चप्पल स्वस्त असते आणि इथेच लोक फसतात ! (Prada)
आता परत प्राडाकडे ज्यामुळे तिची आज जगभर ही ओळख होतेय. भारतीय डिझाईन्सना जगभरातून इतकं प्रेम मिळतंय हे पाहण खूप छान आहे, पण जेव्हा कुठलाही ब्रँड आपण introduce केलेली गोष्ट actual कुठून आली हे न सांगता त्यातून नफा मिळवतो तेव्हा ती समस्या बनते. आज ती १ lack ची चप्पल wear करणं लक्झरीअस वाटेलही कदाचित पण खरी लक्झरी तुम्ही काय घालता ते नाही तर ते कोणी बनवलय, ते कुठून आलय आणि ते का महत्त्वाच आहे हे जाणून घेण्यात आहे. कोल्हापुरी आपल्या महाराष्ट्राची किंबहुना आपल्या भारताची शान आहे. आज काही दिवसांपुरता तो ट्रेंड असेलही पण कोल्हापुरी ही आपल्या मातीचा सुगंध, आपल्या वारशाचा भाग, आपल्या कलेचा सन्मान आणि आपल्या कष्टकरी हातांची कमाल आहे. हे विसरून चालणार नाही इतकच !
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics