Home » Sankranti : ‘या’ शापामुळे शनिदेव आपल्या पित्यापासून सूर्यदेवांपासून आहे लांब

Sankranti : ‘या’ शापामुळे शनिदेव आपल्या पित्यापासून सूर्यदेवांपासून आहे लांब

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sankranti
Share

उद्या सर्वत्र संक्रांतीचा सण साजरा होणार आहे. संक्रांतीचा सण हा एकमेकांमधील कटुता विसरून पुन्हा एकदा गोडीने सुरुवात करण्याचा सण मानला जातो. इंग्रजी नवीन वर्षातला संक्रांत हा पहिलाच सण असतो. यादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून याला मकर संक्रांती असे म्हटले जाते. यादिवशी महाराष्ट्रामध्ये तीळ आणि गुळापासून पदार्थ तयार केले जातात. या सणामागचे धार्मिक कारण म्हणजे, सूर्यदेव आणि शनिदेव हे पिता पुत्र आहेत. मात्र यांच्यात मतभेद होते. मकर संक्रांतीला सूर्यदेव शनिदेवाच्या राशीत प्रवेश करतात. (Sankranti)

मकर राशीचे गुरु शनिदेव आहेत. यादिवशी सूर्यदेव शनिदेव गुरु असलेल्या मकर राशीमध्ये प्रवेश करतात आणि त्या दिवशी ते आपल्या पुत्राला भेटतात. या भेटीमुळे त्यांच्यातील कटुता संपते आणि पुन्हा त्यांचे नवीन नाते सुरू होते असे मानले जाते. या सणाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, मकर संक्रांतीच्या दिवशी दक्षिणायनाची समाप्ती होते आणि उत्तरायणाची सुरुवात होते. उत्तरायणाला ‘देवतांचा दिवस’ मानले जाते. या काळात सूर्य उत्तरेकडे सरकतो, ज्यामुळे दिवस मोठे होतात आणि अंधार कमी होतो, जो ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. याच निमित्ताने आपण आज एक कथा जाणून घेऊया. (Marathi)

पौराणिक कथेनुसार, सूर्यदेव आणि शनिदेव पिता-पुत्र आहे. सूर्यदेव आणि शनिदेव पिता-पुत्र असले तरी सूर्यदेवाने शनिला पुत्र म्हणून स्वीकारले नाही. ऐवढेच नाही तर सूर्यदेवाने आपल्या पत्नीवर (छाया) राग व्यक्त करत मुलासह दूर जाण्याचा शाप दिला. यामुळेच शनी ग्रह हा सूर्यापासून सर्वात जास्त अंतरावर आहे, असे मानले जाते. शनिदेव आणि सूर्यदेव यांच्यातील काही घटना खूपच प्रचलित आहेत. असे म्हटले जाते की, रागाच्या भरात एकदा सूर्यदेवाने शनिदेवाचे घर जळाले होते. (Todays Marathi Headline)

Sankranti

सूर्यदेव आणि शनिदेवाशी संबंधित पौराणिक कथेनुसार, विश्वकर्माची मुलीगी संज्ञा हिच्याशी विवाह झाल्यानंतर सूर्यदेवाला संज्ञापासून यम नावाचा मुलगा आणि यमुना नावाची मुलगी झाली. सूर्यदेव अत्यंत तेजस्वी तर त्यांची पत्नी अतिशय कोमल होती. त्यामुळे सूर्यदेवाच्या तेज तिला असहाय्य होत होता. सूर्यदेवाच्या तेजापासून स्वतःचे रक्षण व्हावे म्हणून संज्ञाने स्वतःची सावली तयार केली आणि ती सूर्यदेवाच्या सेवेत सोडून ती स्वतः तिचे वडील विश्वकर्मा यांच्या घरी गेली. काही दिवस राहिल्यानंतर भगवान विश्वकर्मा यांनी आपल्या मुलीला पतीच्या घरी जाण्यास सांगितले, परंतु असह्य वेदना आठवून तिने तिचे रूप बदलले आणि हिमालयात तपश्चर्या करू लागली. (Top Marathi News)

संज्ञाने सूर्याकडे तिची सावली म्हणजेच छाया सोडली मात्र, सूर्यदेवाच्या ही बाब लक्षात आली नाही. ते सावलीला (छाया) संज्ञा मानत राहिले. आणि काही काळानंतर शनिदेवाचा जन्म झाला. दरम्यान, छाया शनिला स्नेह द्यायची तर यम आणि यमुना यांचा तिरस्कार करायची. ही बाब सूर्यदेवाच्या लक्षात आल्यावर ते संतापले आणि म्हणाले ‘क्वचिदापि कुमाता न भवति’ म्हणजे आई कधीच कुमाता असू शकत नाही. असे सांगून, सूर्यदेव शाप देणार इतक्यात छायाने सर्व सत्य सांगितले. यामुळे अधिक संतापलेल्या सूर्यदेवाने शनिला त्याच्यापासून दूर राहण्याचा शाप दिला. या शापानुसार, शनी हा सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह आहे. सूर्यापासून चंद्राचे अंतर लांब असून सूर्यदेवाने शनीला कधीच पुत्र म्हणून जवळ केले नाही. (Latest Marathi Headline)

तर अजून एका एका पौराणिक कथेनुसार, एकदा रागाच्या भरात सूर्यदेवाने शनिदेव आणि त्यांची आई छाया यांचे घर जाळले होते. शनिदेवाचा रंग काळा आहे. याच कारणामुळे सूर्यदेवाला ते आवडत नव्हते. सूर्यदेवाने शनिदेवाला त्यांची आई छायापासून वेगळे केले होते. यामुळे दु:खी झालेल्या छायाने सूर्यदेवाला कुष्ठरोग होण्याचा शाप दिला. त्यानुसार, सूर्यदेवाला कुष्ठरोग झाला. तेव्हा सूर्यदेवाचा दुसरा मुलगा यमराज याने आपल्या कठोर तपश्चर्येने आपले वडील सूर्यदेव यांना बरे केले होते. (Top Trending News)

=======

Sankranti : संक्रांत स्पेशल: तिळगुळाच्या पोळीची सोपी रेसिपी

Makar Sankranti : वर्षातला पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीची माहिती आणि महत्त्व

=======

कुष्ठरोगापासून मुक्ती मिळाल्यावर सूर्यदेव क्रोधित झाले आणि त्यांनी शनिदेव आणि छाया यांचे घर कुंभ जाळून टाकले. त्यामुळे छाया आणि शनिदेव खूप दुःखी झाले. दुसरीकडे यमराजांनी सूर्यदेवांना छाया आणि शनिदेवांशी असे वागू नका असा सल्ला दिला. सूर्यदेवाचा राग शांत झाल्यावर एके दिवशी ते मुलगा शनिदेव आणि पत्नी छाया यांच्या घरी गेले. सूर्यदेवाने पाहिले की शनिच्या घरात काहीच उरले नाही. सर्व काही जळून राख झाले. शनिदेवाच्या घरात फक्त काळे तीळ उरले होते. (Social News)

त्याच उरलेल्या काळ्या तिळनेच शनिदेवाने पिता सूर्यदेवाचे स्वागत केले. हे पाहून सूर्यदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी शनिदेवाला दुसरे घर मकर दिले. तसेच शनिदेवाने वरदान दिले की मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा ते मकर राशीत त्यांच्या घरी येतील तेव्हा त्यांचे घर धनधान्याने भरून जाईल. जो कोणी या दिवशी काळ्या तिळाने सूर्यदेवाची पूजा करतो त्याचे सर्व संकट दूर होतात, अशी मान्यता आहे. (Top Stories)

(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.