Home » Republic Day : प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्याच हस्ते ध्वजवंदन का केले जाते?

Republic Day : प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्याच हस्ते ध्वजवंदन का केले जाते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Republic Day
Share

आज देशामध्ये प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आज आपण ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. देशासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी आपल्या भारत देशाचा झेंडा अभिमानाने फडकवला जातो. हा दिवस अभिमान आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. १९५० साली याच दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली आणि भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक बनला. राज्यघटनेद्वारे राष्ट्राने स्वतःचे शासन करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकले. (Republic Day)

आजच्या दिवशी दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते. त्यानंतर एक भव्य सोहळा संपन्न होतो. यामध्ये देशाची ताकद, भव्यता आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन संपूर्ण जगाला होते. १५ ऑगस्टच्या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करत देशाला संबोधित करतात. तर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनादिवशी देशाच्या राष्ट्रपतींना हा मान दिला जातो. असे का केले जाते? २६ जानेवारीला राष्ट्रपती का ध्वजवंदन करतात? मागे एक खास कारण आहे कोणते ते जाणून घेऊया. (Marathi News)

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. त्यावेळी देशाचे संविधान लागू केले गेले नव्हते. देशाचे प्रधानमंत्री सरकारचे प्रमुख असतात, यावेळी स्वतंत्र दिनाचा उत्सव साजरा करताना त्यांनीच झेंडा फडकवला. जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपती नाही तर, लॉर्ड माउंटबेटन गवर्नर जनरल होते. म्हणूनच त्यावेळचे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी झेंडा फडकवला. यानंतर १९५० मध्ये जेव्हा भारताचे संविधान लागू केले गेले. तेव्हा डॉ. राजेंद्र प्रसाद देशाचे पहिले राष्ट्रपती बनले. (Top Marathi News)

Republic Day

त्यांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तिरंगा फडकवला. राष्ट्रपती देशाचे संविधानिक प्रमुख असतात आणि ते देशाचे प्रथम नागरिक मानले जातात. प्रजासत्ताक दिन म्हणजे देशावर संविधान लागू झाल्याचा उत्सव आहे. म्हणूनच यादिवशी तिरंगा फडकवण्याचा मान देशाच्या राष्ट्रपतींना दिला जातो. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे संविधान लागू झाल्यानंतर १९५० पासून १९६२ पर्यंत राष्ट्रपती पदावर राहिले. ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचे नेते होते. तसेच ते भारताचे पहिले आणि एकमेव दोनदा निवडून आलेले राष्ट्रपती आहेत. सध्याच्या काळात या राष्ट्रपती पदाचा कारभार द्रौपदी मुर्मू संभाळत आहेत. या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. (Latest Marathi Headline)

राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत तसेच सशस्त्र दलांचेही प्रमुख आहेत. प्रजासत्ताक दिन ाचा थेट संबंध देशाच्या प्रजासत्ताक बनण्याशी असल्याने, या दिवसाचे मुख्य आयोजन राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली होते. राष्ट्रपती हे भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतीक आहेत. त्यामुळे २६ जानेवारी रोजी राष्ट्रपतींकडून ध्वजवंदन केले जाते. पंतप्रधान हे देशाचे कार्यकारी प्रमुख आणि ते सरकारचे नेतृत्व करतात. ते प्रजासत्ताक दिन समारंभाचा भाग असले तरी आणि परेडमध्ये उपस्थित असले तरी, प्रजासत्ताक दिनी सर्वाधिक महत्त्व राष्ट्रपतींना असते. कार्यक्रमाचे मुख्य आयोजन राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली होते. (Top Stories)

========

Republic Day : राष्ट्रध्वज फडकवण्याचे आहेत काही नियम आणि कायदे

Republic Day : प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?

========

यामागे एक परंपरा आणि घटनात्मक प्रोटोकॉल देखील आहे की प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात तिरंगा राष्ट्रपतींद्वारेच फडकवला जातो. स्वातंत्र्य दिन हा भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे, जेव्हा देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले होते. तर प्रजासत्ताक दिनी भारतात संविधान लागू झाले होते. जे प्रत्येक भारतीयाला स्वांतंत्र्य,न्याय, अधिकार देते. स्वातंत्र्य दिन हा लाल किल्ल्यावर साजरा केला जातो. तर प्रजासत्ताक दिन हा कर्तव्य पथ पूर्वीचे राज पथावर साजरा केला जातो. २६ जानेवारीला सैन्यदलांची परेड होतात. विविध राज्यांच्या चित्ररथांतून संस्कृती परंपरा दाखवण्यात येते. प्रमुख पाहुणे म्हणून इतर देशाच्या प्रमुखांना आमंत्रित केले जाते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.