Home » India : भारताने स्थगित केलेला सिंधू जल करार नक्की आहे तरी काय ?

India : भारताने स्थगित केलेला सिंधू जल करार नक्की आहे तरी काय ?

by Jyotsna Kulkarni
0 comment
India
Share

२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मोठा दहशतवादी हमला झाला. निर्दोष पर्यटकांवर आतंकवाद्यांनी गोळ्या डागल्या आणि त्यांना मारले. यात तब्बल २६ निर्दोष लोकांचा बळी गेला. या भ्याड दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची तीव्र लाट उसळली असून, सगळेच पाकिस्तानला जशाच तसे उत्तर देण्याची मागणी करत आहे. भारत सरकारने देखील या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर कठोर भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तानवर एक प्रकारचा कायदेशीर सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी पाच मोठे आणि अतिशय महत्वाचे निर्णय घेतले आहे. (India)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या (CCS) बैठकीत पाच प्रमुख निर्णय घेण्यात आले. पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद, अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद राहणार, सिंधू पाणी कराराला स्थगिती, भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद ठेवणार आणि पाकिस्तानी दूतावासातील आकार कमी करण्याचा आदेश देण्यात आला.

या पाच निर्णयांपैकी एक प्रमुख निर्णय म्हणजे सिंधू पाणी कराराला स्थगिती देणे. या करारामुळे पाकिस्तानवर मोठा परिणाम होणार आहे. आता हा सिंधू पाणी करार नेमका काय आहे, त्याचं महत्व काय आणि पाकिस्तानवर कसा परिणा होईल, ते जाणून घेऊया. (what is indus water treaty)

सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तानामधील एक मोठा ऐतिहासिक जल करार आहे. १९ सप्टेंबर १९६० साली भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी या करारावर स्वाक्षरी केली होती. भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष फील्ड मार्शल अयुब खान यांनी या करारावर सही केली होती. या करारामध्ये मध्यस्थी म्हणून जागतिक बँक होती. भारत आणि पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या सतलज, बियास, रावी, झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी दोन्ही देशांनी वाटून घेण्याच्या कराराला सिंधू पाणी करार म्हणतात. (Top Marathi News)

India

या करारानुसार, भारत हा पूर्वेकडील बियास, रावी आणि सतलज नद्यांचे पाणी वापरतो, तर पश्चिमेकडील चिनाब, सिंधू आणि झेलम नद्यांचे पाणी पाकिस्तानला दिले जाते.  भारताला बियार, रावी आणि सतलज या नद्यांचे पाणी वापरण्यास मिळते. भारत या सहा नद्यांच्या पाण्यापैकी फक्त २० टक्के पाणी वापरतो. तर पश्चिमेकडील चिनाब, सिंधू आणि झेलम नद्यांचे पाणी पाकिस्तानला दिले जाते. अर्थात पाकिस्तानला या नद्यांचे ८० टक्के पाणी वापरता येते. या नद्या पाकिस्तानमध्ये, विशेषतः पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये शेतीसाठी महत्त्वाच्या आहेत. (Marathi Trending News)

या करारादरम्यानच, दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्याची दरवर्षी बैठक देखील होते. पाकिस्तानची सुमारे ८० टक्के शेती सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळं हा करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानमध्ये पाण्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय पाकिस्तानमध्ये सिंधू नदीशी संबंधित अनेक जलविद्युत प्रकल्प देखील आहेत. अशा परिस्थितीत, पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांच्या उत्पादनावर परिणाम होईल आणि ऊर्जा संकट तीव्र होईल. (Marathi Top News)

=======

हे देखील वाचा : Sachin Tendulkar : भारतीय क्रिकेटमधले खणखणीत नाणे : सचिन तेंडुलकर

Waxing : फेशियल वॅक्स करताना कोणती काळजी घ्यावी

=======

लक्षवेधी गोष्ट म्हणजे १९६० अर्थात जेव्हा या करारावर सह्या झाल्या तेव्हापासून ते आत्तापर्यंत भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झाले, अनेक वेळा युद्धजन्य परिस्थिती देखील निर्माण झाली. मात्र भारताने कधीच या कराराचे उल्लंघन केलं नाही. कराराच्या वेळीच एक असा नियम करण्यात आला होता की, फक्त भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकत्रितपणे या करारामध्ये बदल करू शकतात. पण सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हा करार रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. आता पहलगाममधील या क्रूर हल्ल्यानंतर भारताने या कराराला स्थगिती दिली आहे. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.