Home » Temple : वर्षातून केवळ दिवाळीतच उघडले जाणारे रहस्यमयी मंदिर

Temple : वर्षातून केवळ दिवाळीतच उघडले जाणारे रहस्यमयी मंदिर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Temple
Share

दिवाळीचा सण अगदीच तोंडावर आला आहे. जिकडे तिकडे फक्त दिवाळीचीच चर्चा आणि तयारी चालू आहे. दिवाळी म्हणजे वर्षातला सर्वात मोठा सण. प्रकाशाचा सण अशी ओळख असलेल्या या दिवाळीची वर्षभर आपण सर्वच आतुरतेने वाट बघत असतो. असा हा दिवाळीचा सण आता अगदी जवळ आला आहे. या मोठ्या सणाच्या दिवशी अनेक जणं मंदिरात जाऊन देवाचा आशीर्वाद घेतात आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करतात. तसे तर भारतात मंदिरांची अजिबातच कमतरता नाही. प्रत्येक २० मीटर अंतरावर आपल्याला एखादे लहान मोठे मंदिर दृष्टीस पडतेच. (Temple)

भारतातील मंदिरं आणि त्यांचा जुना इतिहास हे काही नवीन नाही. भारतातील पुरातन मंदिरांना मोठा आणि जाज्वल्य इतिहास हे सर्वश्रुत आहे. खासकरून जर आपण दक्षिण भारतातील मंदिरं पाहिली तर आपल्या लक्षात येईल की ही मंदिरं नक्कीच देशातील इतर मंदिरांपेक्षा वेगळी आहेत. अगदी येथील मंदिरांच्या बांधकामापासून ते परंपरा आणि रीती भातींपर्यंत ही मंदिरं आपले वेगळेपण सिद्ध करतात. याच जुन्या मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे हसनंबा मंदिर. (Diwali 2025)

दिवाळी आणि मंदिरं हे समीकरण काही नवीन नाही. सणासुदीला मंदिरात जाऊन देवाचे आशीर्वाद घेण्याची पद्धत खूप जुनी आहे. फक्त सणासुदीलाच का…? रोज जमेल तसे लोकं मंदिरांमध्ये जाऊन देवाचे आशीर्वाद घेतात. मात्र भारतात हसनंबा मंदिर हे असे मंदिर आहे, जिथे तुम्ही रोज गेलात तरी तुम्हाला देवाचे दर्शन होणार नाही. यामागे एक खास कारण आहे. चला जाणून घेऊया. याच हसनंबा मंदिराबद्दल. (Marathi News)

आता सगळ्यांनाच दिवाळीचे वेध लागले आहे. सगळीकडे जोरदार दिवाळीची तयारी चालू आहे. याच दिवाळीच्या काळात हे हसनंबा मंदिर उघडले जाते. अर्थात हे मंदिर वर्षभर बंद असते आणि केवळ दिवाळीच्या दिवसात ते उघडे असते. दिवाळीच्या दिवसांमध्ये कर्नाटक राज्यातील बेंगळुरू पासून १८० किमी अंतरावर हसनंबा मंदिर आहे. जे देवीला समर्पित आहे. हे मंदिर फक्त दिवाळीमध्येच आठवडाभर उघडण्यात येते. या मंदिरात मंदिर बंद करताना ठेवलेली फुले देखील ताजी राहातात आणि इथे लावलेला दिवा देखील वर्षभर जळत असतो. यासोबतच या मंदिराबद्दल अनेक रहस्यमयी गूढ गोष्टी देखील आहे. (Todays Marathi Headline)

Temple

कर्नाटकातील जुन्या म्हैसूर हसन जिल्ह्यात असलेले हसनंबा मंदिर अतिशय रहस्यमय मानले जाते. हसनंबा मंदिर हे वर्षातून एका आठवड्यासाठी म्हणजेच सात दिवसांसाठी दिवाळीत उघडले जाते. या मंदिरात हसनंबा देवीची पूजा केली जाते. या मंदिराला भेट देण्याची एक विशिष्ट वेळ आहे. हे मंदिर सकाळी ७ ते १० आणि दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत सुरू असते. (Marathi Trending Headline)

हे मंदिर १२ व्या शतकात बांधण्यात आले असल्याचे इतिहासकार सांगतात. जवळपास ८२३ वर्ष जुने मंदिर म्हणून देखील याची ख्याती आहे. या मंदिरातील देवीच्या दर्शनासाठी दुरून भक्त दर्शनासाठी येतात. हे मंदिर वर्षातून एका आठवड्यासाठी उघडत असल्यामुळे या एका आठवड्यादरम्यान मंदिराला भेट देण्यासाठी भाविक गर्दी करतात. या दरम्यान हसनंबा देवीचे दर्शन घेता आले तर भाविक स्वत:ला भाग्यवान समजतात. (Top Marathi News)

तसेच हे एक चमत्कारिक मंदिर आहे असे सांगण्यात येते. भक्त इथे पत्र लिहून इच्छा मागतात आणि त्यांच्या इच्छा देवी पूर्ण करते. देशातील हे पहिले मंदिर आहे. जिथे भक्त देवी आईला पत्र लिहून आपली इच्छा व्यक्त करतात. दिवाळीच्या पर्वावर मोठ्या संख्येने भक्तगण इथे दर्शनासाठी पोहचतात. यामंदिरात देवीला फक्त तांदळाचा नैवेद्य दाखवण्यात येतो. (Latest Marathi Headline)

हे हसनंबा देवीचे मंदिर दिवाळीनंतर बंद करण्यापूर्वी या मंदिरात दिवे लावले जातात आणि ताजी फुले देवीला वाहिली जातात. असे म्हणतात की मंदिरात १ आठवडा पूजा असते आणि शेवटच्या दिवशी पूजा केल्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि पुन्हा पुढील वर्षी उघडले जातात. ज्या दिवशी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात त्याआधी इथे एक दिवा लावला जातो. जेव्हा पुढच्या वर्षी हे मंदिर उघडले जाते तेव्हा हा दिवस तसाच जळत असतो आणि वाहिलेली फुले देखील ताजी असल्याचे दिसून येते. शिवाय देवीला अर्पण केलेला प्रसाद देखील पुढील वर्षापर्यंत ताजा राहतो. (Top Trending News)

==============

हे देखील वाचा : Shiv Mandir : ‘या’ मंदिराच्या दगडांमधून येतो रहस्यमयी डमरूचा आवाज

Jageshwar Temple : जागेश्वर धाम मंदिराचे रहस्य आहे तरी काय ?

==============

पौराणिक आख्यायिका
या मंदिराची पौराणिक आख्यायिका आहे की, अंधकासुर या राक्षसाने ब्रह्मदेवाकडून अदृश्य होण्याचे वरदान मागितले होते. यानंतर त्याने पृथ्वीतलावावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भगवान शिवाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला. ज्या वेळी भगवान शिवाने अंधकासुराचा वध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या शरीरातून रक्ताच्या थेंबाने तो राक्षस पुन्हा जिवंत व्हायचा. शेवटी शिवाने आपल्या सामर्थ्याने योगेश्वरी देवीची निर्मिती करून राक्षसाचा संहार केला. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.