उद्या सर्वत्र अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया असे म्हटले जाते. साडे तीन मुहूर्तापैकी एक पूर्ण आणि मोठा मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेला ओळखले जाते. अक्षय तृतीयेचे महत्व अनेक अर्थाने आणि प्रत्येक युगात या दिवसाला वेगवेगळे महत्व देण्यात आले आहे. अक्षय तृतीयेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे असे सांगितले जाते की, याच दिवशी मी महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती आणि श्री गणेशाने हे महाभारत लिहिले होते. त्याच निमित्ताने आज जाणून घेऊया महाभारतातील काही रहस्ये. (Mahabharat)
महर्षी वेद व्यास यांचा जन्म सुमारे ३००० वर्षांपूर्वी आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता. त्यांच्या जन्मापासूनच गुरुपौर्णिमाचा सण साजरा करण्याची परंपरा सुरु झाल्याची मान्यता आहे. महर्षी वेदव्यास भगवान विष्णूचे अंश म्हणून पृथ्वीवर आले असे म्हटले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव ऋषी पराशर आणि आईचे नाव सत्यवती होते. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. त्यांनी आपल्या आई-वडिलांकडे देवाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि जंगलात तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. (Mahabharat Facts)
महर्षि वेदव्यास यांनी आईकडे हट्ट धरुन त्यांनी तपश्चर्या करण्यासाठी वनात ते गेले. त्यांनी त्या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्यामुळे त्यांना संस्कृत भाषेत प्राविण्य प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी चार वेदांचा विस्तार केला. महर्षि वेदव्यास यांनी महाभारत, अठरा महापुराण आणि ब्रह्मास्त्र रचले, त्यांना असे वरदान मिळाले होते. त्यामुळे हिंदू धर्मात वेदव्यास यांना देव म्हणून पूजले जाते. आजही वेदांचे ज्ञान घेण्यापूर्वी महर्षी वेदव्यास यांचे नाव प्रथम घेतले जाते. हिंदू धर्मातील सात चिरंजीव व्यक्तींमध्ये देखील वेदव्यास यांचा समावेश होतो. (Marathi News)
==========
हे देखील वाचा : Akshay Tritiya : जाणून घ्या भारतातील विविध प्रांतातील अक्षय्य तृतीया सणाबद्दल
==========
> १८ दिवस चाललेले महाभारत युद्ध या क्रमांकाशी जोडलेले आहे. १८ हा महाभारत युद्धाचा सर्वात महत्वाचा क्रमांक आहे. महाभारत ग्रंथामध्ये एकूण १८ अध्याय आहेत. १८ दिवस भगवान श्रीकृष्णाने रणांगणात अर्जुनला १८ गीतांचं ज्ञान दिलं. ज्योतिषी आणि तज्ज्ञांच्या मते, कलियुगाच्या प्रारंभाच्या ६ महिने आधी मार्गशीर्ष शुक्ल १४ रोजी युद्ध सुरू झाले, जे अखंड १८ दिवस चालले. युद्धाच्या शेवटी फक्त १८ लोकं उरले. गीतेतही १८ अध्याय आहेत. कौरव आणि पांडवांचे एकूण सैन्य १८ अक्षोहिनी होते आणि या युद्धात फक्त १८ योद्धे जिवंत राहिले. या १८ आकड्यांमागील रहस्य आजपर्यंत कोणालाही समजू शकलेले नाही. (Marathi Top News)
> अर्जुन ज्या रथावर बसून महाभारत युद्ध लढत होता, त्या रथावर श्रीकृष्ण, हनुमानजी आणि शेषनागही होते. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून शेषनागाने अर्जुनाच्या रथाचे चाक धरले, जेणेकरून शक्तिशाली शस्त्रांमुळे रथाला हानी होऊ नये. ही सर्व व्यवस्था श्रीकृष्णाने अर्जुनासाठी केली होती. जेव्हा युद्ध संपले आणि पांडवांचा विजय झाला तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन तू आधी खाली ये.
भगवंताच्या आज्ञेचे पालन करून अर्जुन रथातून खाली उतरला. यानंतर श्रीकृष्णही रथातून खाली उतरले. शेषनागही रथ सोडून पाताळात गेला आणि हनुमानजीही अंतर्धान पावले. रथातून खाली उतरल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनला काही अंतरावर घेऊन गेले आणि अचानक अर्जुनाच्या रथातून ज्वाळा निघू लागल्या आणि रथ जळून खाक झाला. (Marathi Trending News)
> गुरू द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वथामा याला श्रीकृष्णाने अमरत्वाचा शाप दिला होता कारण त्याने युद्धात ब्रह्मास्त्र वापरले होते. अश्वत्थामाच्या या कृत्याने कृष्ण संतप्त झाला आणि त्याने अश्वत्थामाला शाप दिला की ‘तू इतक्या वधांचे पाप घेऊन तीन हजार वर्षे निर्जन ठिकाणी भटकत राहशील. तुमच्या शरीरातून नेहमी रक्ताचा दुर्गंध येत राहील. आजही अनेक ठिकाणी अश्वत्थामा दिसल्याची चर्चा आहे. मात्र यात किती तथ्य आहे हे माहित नाही. (Top Stories)
> मोहेंजोदारोच्या उत्खननात सापडलेल्या सांगाड्यामध्ये किरणोत्सर्गाचा प्रभाव आढळून आल्याचे समोर आले आहे. याला लोकांनी महाभारताशी जोडून पाहण्याचा देखील प्रयत्न केला आहे. महाभारत काळात अणुबॉम्ब होते असे सांगितले जाते. महाभारतात ब्रह्मास्त्राचे परिणाम सूप्तिक पर्वाच्या १३ ते १५ व्या अध्यायात सांगितले आहेत. हिंदू इतिहास तज्ज्ञांच्या मते, अश्वत्थामाने ३ नोव्हेंबर ५५६१ ईसापूर्व प्रसिद्ध केलेले ब्रह्मास्त्र हा अणुबॉम्ब होता.
> भीमाचा नातू बर्बारिक याने वचन दिले होते की तो महाभारताच्या युद्धात कमजोर बाजूने लढेल. बर्बारिकसाठी युद्ध जिंकून देण्यासाठी केवळ तीन बाण पुरेसे होते, ज्याच्या जोरावर तो कौरव आणि पांडवांच्या संपूर्ण सैन्याचा नाश करू शकला. हे जाणून भगवान श्रीकृष्णांनी ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि त्यांच्यासमोर जाऊन त्यांचे मस्तक दानात मागितले. मस्तक दान केल्यावर, बर्बारिकने कृष्णाला विनंती केली की त्याला शेवटपर्यंत महाभारताचे युद्ध पहायचे आहे, तेव्हा कृष्णाने त्याची विनंती मान्य केली. श्रीकृष्णाने त्याच्या मस्तकाला अमृताने स्नान घातले आणि महाभारताचे युद्ध त्याला पाहता यावे म्हणून सर्वोच्च स्थानावर ठेवले. (Social News)
> महाभारताच्या युद्धात केवळ भारतातील नव्हे तर अनेक परदेशी योद्धेही सहभागी झाले होते. याबद्दल अनेक मोठमोठ्या ग्रंथामध्ये उल्लेख आपल्याला सापडतो. यवन देशाच्या सैन्याने या युद्धात भाग घेतला, तर ग्रीक, रोमन, अमेरिका, मॅसेडोनियन इत्यादी योद्ध्यांचा देखील संदर्भ ग्रंथांमध्ये आहे. त्यामुळेच अनेक अभ्यासकांच्या मते महाभारत हे पहिले जगाचे ‘महायुद्ध’ होते.
========
हे देखील वाचा : Akshaya Trutiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी करतात?
=========
> महाभारत हा ग्रंथ आहे पण तो तीन टप्प्यांत लिहिला गेला आहे. पहिल्या टप्प्यात ८,८०० श्लोक, दुसऱ्या टप्प्यात २४,००० आणि तिसऱ्या टप्प्यात १,००,००० श्लोक लिहिले गेले. वेदव्यासाच्या महाभारताव्यतिरिक्त पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संस्कृत महाभारत हे सर्वात प्रामाणिक मानले जाते (Marathi Latest News)
> महाभारताच्या युद्धाबद्दल आधीच माहिती असलेला व्यक्ती म्हणजे श्रीकृष्ण. मात्र श्रीकृष्णासोबतच अजून एका व्यक्तीला भविष्यात होणाऱ्या या मोठ्या युद्धाबद्दल माहिती होती. कृष्णाशिवाय, महाभारत युद्धाचे रहस्य जाणणारी दुसरा व्यक्ती म्हणजे सहदेव. पाच पांडवांचा सर्वात धाकटा भाऊ म्हणजे सहदेव. सहदेवांबद्दल असे म्हटले जाते की त्यांच्याकडे भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान जाणून घेण्याची क्षमता होती. ही क्षमता त्यांना वडिलांकडून मिळाली.