सध्या संपूर्ण जगात कोल्हापुरी चप्पल कमालीची गाजत आहे. इटलीच्या प्रादा या ब्रँडने त्यांचे समर कलेक्शन लाँच केले. या दरम्यान झालेल्या रॅम्प वॉकमध्ये कोल्हापुरी चप्पल घातलेल्या मॉडेल्सने चांगलेच लाइमलाईट मिळवले. या मॉडेल्सने घातलेल्या कोल्हापुरी चप्पलला जगभरातून कमालीचे प्रेम मिळत आहे. मात्र असे असूनही प्रादा ब्रँड आणि कोल्हापुरी चप्पल यावरून एक मोठा वादंग निर्माण झाला आहे. झाले असे की, प्रादाने कोल्हापुरी स्टाईलने तयार करण्यात आलेल्या चप्पला त्यांच्या मॉडेल्सला घालायला लावल्या आणि कंपनीकडून याचे कोणतेच श्रेय कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्या कारागिरांना दिले नाही. यावरूनच एक अनोखा वाद रंगला आहे. कोल्हापूरच्या कारागिरांकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोशल मीडियावर याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. (Kolhapuri Chappal)
कोल्हापूरची चप्पल ही फक्त कोल्हापूरच नाही तर महाराष्ट्राची आणि पर्यायाने भारताची शान आहे. आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेली एक देणगी आहे. सुबक आकार,नक्षीकाम आणि त्यांचा टिकाऊपणा हीच या चपलांची वैशिष्ट्ये आहेत. कोल्हापुरी चप्पला म्हणजे भारतीय परंपरा आणि हस्तकलेचे उत्तम उदाहरण आहे, कोल्हापुरी चप्पल ही हाताने बनवलेली चामड्याची चप्पल आहे. या चप्पलेला २०१९ मध्ये भौगोलिक संकेत (Geographical Indication – GI) मानांकन मिळाले आहे, ज्यामुळे तिची विशिष्टता आणि प्रामाणिकता अधिकृतपणे मान्य झाली आहे. (Marathi NEws)
कोल्हापुरी चप्पलचे ऐतिहासिक महत्त्व
कोल्हापुरी चप्पल १२व्या शतकापासून अस्तित्वात आल्याचे सांगितले जाते. कोल्हापूरचे राजा बीज्जल आणि त्यांचे पंतप्रधान बसवन्ना यांनी स्थानिक चर्मकारांना प्रोत्साहन दिले आणि यामुळेच या चप्पलांची निर्मिती वाढली. आधी या चप्पलांना कापशी, पायटण, कचकडी, बक्कलनाळी अशी नावे होती. ही नाव ज्या गावात या चप्पल तयार व्हायच्या त्या गावांवरून पडली होती. कोल्हापूरचे शाहू महाराज आणि राजाराम महाराज दुसरे यांच्या काळात २९ चर्म संस्करण केंद्रे उघडली गेली. यामुळे या उद्योगाला अधिकाधिक चालना मिळाली. या चप्पलेचा इतिहास १३ व्या शतकापासूनचा इतिहास आहे. आधी ही चप्पल मराठा योद्धा घालायचे नंतर हळूहळू ही चप्पल गावातील लोकांनी देखील घालण्यास सुरुवात केली. (Todays Marathi NEws)
कोल्हापुरी चप्पल तयार कशी होते?
कोल्हापुरी चप्पल एका खास प्रकारच्या खऱ्या लेदरपासून बनवली जाते. हे लेदर अत्यंत टिकाऊ आणि आरामदायी असते. ही चप्पल बनवताना सर्वात आधी लेदरला पाण्यात आणि नैसर्गिक तेलात अनेक तास भिजवून मऊ केले जाते. नंतर त्यावर हाताने डिझाइन तयार केली जाते. पुढे तयार केलेल्या डिझाइनवर शिवणकाम केले जाते. त्यात कोणतेही कृत्रिम किंवा रासायनिक घटक वापरले जात नाहीत. जाणून घेऊया याच चप्पलेची खास वैशिष्ट्ये. (Latest Marathi News)
> कोल्हापुरी चप्पल पूर्णपणे हाताने बनवली जाते. यात खिळ्यांचा वापर केला जात नाही. यात वापरल्या जाणाऱ्या चामड्याचे तुकडे हाताने शिवले जातात.
> या चप्पलेला रंग देण्यासाठी कोणत्याही केमिकल रंगांचा वापर केला जात नाही. यासाठी वनस्पतींच्या रंगांचा वापर करून तयार केलेल्या चामड्यापासून ही चप्पल तयार केली जाते. यामुळे ही चप्पल पर्यावरणपूरक आणि टिकाऊ राहते.
> ही चप्पल ओपन-टो आणि टी-स्ट्रॅप शैलीत बनवली जाते, ज्यामुळे ती आरामदायी आणि हवेशीर राहते. शिवाय कोल्हापुरी चप्पलमध्ये वापरल्या जाणारी चामड्याच्या मजबूत सोलमुळे ही चप्पल अत्यंत टिकाऊ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकते.
> काळानुसार या कोल्हापुरी चप्पलेच्या डिझाइनमध्ये देखील बदल केले गेले. पारंपरिक चप्पलेसोबतच यात नक्षीकाम, ब्रेडिंग, पॉम-पॉम किंवा इतर सजावटीचे घटक, कढाई, किंवा PU मटेरियल आणि TPR सोल वापरून तयार केलेल्या चप्पला देखील सहज उपलब्ध होतात. या चप्पलांमध्ये आलेल्या नवनवीन डिझाइनमुळे या पारंपरिक कपड्यांसोबतच मॉडर्न कपड्यांसोबत देखील सहज घालता येतात. (Social NEws)
> कोल्हापुरी चप्पल ही हलकी आरामदायी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही चप्पल पायाला थंडावा देते, तर थंडीतही ही चप्पल कमालीची लाभदायक ठरते.
> कोल्हापुरी चप्पल पुरुष, महिला, आणि मुलांसाठी उपलब्ध आहे. ही चप्पल तपकिरी, काळा, लाल, पिवळा रांगांमध्ये आणि अनेक आकर्षक डिझाइन्समध्ये मिळते. या चप्पल ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स आणि स्थानिक बाजारांतून ११० ते २००० रुपयांपर्यंतच्या किमतीत मिळतात. (Top Stories)
=============
हे ही वाचा : Chanakya : चाणक्य नीतीनुसार ‘हे’ गुण असलेली स्त्री ठरते उत्तम जोडीदार
‘कॅम्लिन’ ब्रँड परदेशातील नव्हे चक्क भारतातील, वाचा Success Story
============
> कोल्हापुरी चप्पला या चामड्यापासून तयार केल्यामुळे, या चप्पलला बुरशी येण्याची शक्यता असते, खास करून पावसाळ्यात. यासाठी ती स्वच्छ ठेवण्यासाठी तेल किंवा मॉइश्चरायझर लावावे. पहिल्यांदा जेव्हा चप्पल वापरलं त्याआधी ही चप्पल तेलाने मऊ करून घ्यावी, जेणेकरून ती पायांना लागणार नाही.
> चामड्यापासून बनवलेल्या कोल्हापुरी चप्पला आपल्या शरिरातील उष्णता शोषून घेतात. अनेकदा काही आजारांमध्ये डॉक्टर कोल्हापुरी चप्पल घालण्याचा सल्ला देतात.
> कोल्हापुरी चप्पल परिधान केल्यानंतर आपले डोके देखील थंड राहते. तसेच डोळ्यांना त्याचा उत्तम फायदा होतो,असं देखील तज्ञ मंडळी सांगतात.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics