कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखले जाते. या दिवशी देवदिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. असे म्हटले जाते की, यादिवशी भगवान शिव आणि विष्णूची भेट होते. याच भेटीला हरिहर भेट म्हटले जाते. या भेटीमुळे या दिवशी शंकराला तुळस आणि विष्णूला बेल वाहण्याची देखील प्रथा आहे. यंदा ही कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा ५ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. (Kartik Pournima)
हिंदू धर्मात या दिवसाला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. त्रिपुरारी पौर्णिमा तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा आणि आध्यात्मिक शुद्धतेचे प्रतीक मानले गेले आहे. भगवान शंकराने त्रिपुर राक्षसाचा अर्थात अज्ञान, अंध:कार आणि दुष्कृत्यांचा या दिवशी नाश केला. म्हणूनच हा दिवस मनुष्याला जीवनातील नकारात्मकता, संकटांवर मात करण्यासाठी आणि सुख-समृद्धी, ज्ञान-प्रकाश मिळवण्यासाठी प्रेरणा देतो. (Top Stories)
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी उत्कृष्ट पुण्यासाठी गंगा स्नान, शिव पूजा, दीपदान करणे याला मोठे महत्त्व आहे. सर्व घरे, देवळे दिव्यांनी उजळवली जातात व ‘देव दिवाळी’ म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. आज आपण या लेखातून कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदानाला महत्त्व का आहे याबद्दल माहिती जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दिवे लावले जातात. नदीच्या किनाऱ्यावर, मंदिरांमध्ये दिवे लावले जातात. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये दिवे सोडले जातात यालाच दीपदान असे म्हटले जाते. तुळशी विवाह हा देव उठणी एकादशीच्या दिवसापासून साजरा केला जातो. त्यानंतर तो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होतोत. याच दिवशी देव दिवाळी साजरी करण्यात येते. पौराणिक कथेनुसार भगवान शिवने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा उत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे. त्यामुळे दीपदानाचे महत्त्व अधिक आहे. (Top Marathi News)

जीवनात सुख, शांती आणि समृद्धीची कामना करण्यासाठी दिवे लावले जातात. दिवा हे ज्ञान आणि उज्ज्वल भविष्याचे प्रतीक देखील मानले जाते. कार्तिक महिन्यामध्ये दिवे लावण्याला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात दिवे दान करणे खूप शुभ मानले जाते. अशी मान्यता आहे की, कार्तिक महिन्यात दिव्यांचे दान केल्याने व्यक्ती जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो आणि पुढील जन्मात एका कुलीन कुटुंबात जन्म घेण्याचे आशीर्वाद मिळतात. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्याने सर्व यज्ञ, तीर्थयात्रा आणि दान यांचे फळ प्राप्त होते. (Latest Marathi Headline)
शिवाय धार्मिक मान्यतेनुसार, कार्तिक महिन्यात दिवे दान केल्याने विष्णू, लक्ष्मी आणि मोक्ष मिळतो. शिवाय, कार्तिक महिन्यात दिवे दान केल्याने शाश्वत पुण्य देखील मिळते. कार्तिक महिन्यात मंदिरांमध्ये दिवे दान केल्याने विष्णूची कृपा होते. नदीकाठच्या ठिकाणी दिवे दान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळतो. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावल्याने धन आणि समृद्धी येते आणि सर्व पापांचा नाश होतो. दीपदान हे अंधार असताना अर्थात सूर्योदयापूर्वी (ब्रह्म मुहूर्त) किंवा सूर्यास्तानंतर करावे. दीपदान घराच्या देव्हाऱ्याजवळ किंवा मंदिरात, पिंपळाचे झाड, तुळशीच्या रोपाजवळ, नदी किंवा तलावाच्या काठावर करावे. (Top Trending News)
=======
Dev Diwali : जाणून घ्या कार्तिक पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या देव दिवाळीची माहिती
Uttarakhand : येथे दिवाळी नंतर साजरी होते, बुधी दिवाळी !
=======
नदी, तलाव इतर ठिकाणी दीपदान केल्याने सर्व प्रकाराचे संकट नाहीसे होतात आणि अकाली मृत्यू टळते. यम, शनी, राहु आणि केतु यांच्या वाईट प्रभावाने जातक भयमुक्त राहतात. सर्व प्रकाराचे अडथळे, वाईट शक्ती, गृहकलह आणि संकटांपासून वाचण्यासाठी दीपदान केले जाते. तसेच सर्व प्रकारचे त्रास, वाद आणि संकटे टाळण्यासाठी दिवे दान करा. मोक्षप्राप्तीसाठी दिवे दान केले जातात. कोणत्याही प्रकारची पूजा किंवा शुभ कार्य यशस्वी होण्यासाठी दिवे दान करा. घरामध्ये संपत्ती आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी, याला दीपदान देखील म्हणतात. (Social News)
(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
