Jawaharlal Nehru : आधुनिक भारताचे शिल्पकार आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी आपल्या आयुष्यात एकूण नऊ वेळा तुरुंगवास पत्करला. त्यांनी ३२५९ दिवस, म्हणजेच नऊ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला. 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे जन्मलेल्या पंडित नेहरूंचे प्राथमिक शिक्षण खाजगी शिक्षकांकडून झाले. वयाच्या 15 व्या वर्षी ते इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी हॅरो येथे शिक्षण घेतले आणि पुढे केंब्रिज विद्यापीठातून नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली. 1912 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी थेट ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा उभारला, ज्यासाठी त्यांना वारंवार तुरुंगात जावे लागले.
स्वातंत्र्यचळवळीकडे ओढ
विद्यार्थीदशेतच नेहरू परकीय सत्तेखाली असलेल्या देशांच्या स्वातंत्र्य लढ्यांत रस घेऊ लागले होते. त्यांना आयर्लंडमधील ‘सिन फेन’ चळवळ खूप आवडत होती. भारतात परतल्यावर त्यांनी बंकीपूर परिषदेत प्रतिनिधी म्हणून भाग घेतला. 1919 मध्ये ते अलाहाबादच्या होमरूल लीगचे सचिव झाले आणि 1916 मध्ये महात्मा गांधींशी पहिली भेट झाली. 1920 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये झालेल्या किसान मार्चमध्ये भाग घेतला.
1921 मध्ये पहिल्यांदा तुरुंगवास
1921 साली पंडित नेहरूंना पहिल्यांदा तुरुंगात टाकण्यात आले. त्या वर्षी ब्रिटिशांनी काही राज्यांत काँग्रेस पक्षाला बेकायदेशीर ठरवले आणि त्यानुसार अनेक नेत्यांना अटक झाली. पुढील 24 वर्षांमध्ये नेहरूंना आणखी आठ वेळा अटक झाली. जून 1954 मध्ये त्यांच्या शेवटच्या तुरुंगवासाची समाप्ती झाली.(Marathi Latest News)
1930 – मीठ कायदा मोडल्याबद्दल अटक
1930 मध्ये पंडित नेहरूंनी मीठ कायदा मोडला, ज्यावरून ब्रिटिशांनी त्यांना अटक केली. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांची सुटका झाली. 1930-35 या काळात इतर चळवळींत सहभागी झाल्यामुळेही त्यांना अनेक वेळा तुरुंगात जावे लागले.

Jawaharlal Nehru
1930 – राजद्रोहाचा आरोप
ऑक्टोबर 1930 मध्ये सुटका झाल्यानंतर नेहरूंनी संयुक्त प्रांत काँग्रेस समितीच्या बैठकीत करमुक्त मोहिमेची घोषणा केली. त्यांनी एक रॅली काढली आणि पोलिसांनी त्यांच्यावर सार्वजनिक भाषण बंदी लावली. परंतु त्यांनी ती आदेश झुगारून अलाहाबादमधील शेतकरी मेळाव्यात भाषण दिले आणि त्यानंतर त्यांना कलम 124अ अंतर्गत देशद्रोहाचा आरोप ठेवून अटक करण्यात आली. त्यांनी न्यायालयात स्वतःचा बचाव न करता गुन्हा कबूल केला. 24 ऑक्टोबर 1930 रोजी त्यांना 2 वर्षांची शिक्षा झाली. मात्र 97 दिवसांनी त्यांची सुटका झाली.(Jawaharlal Nehru)
1934– पुन्हा देशद्रोहाचा आरोप
1934 मध्ये कोलकात्यात दिलेल्या तीन भाषणांवरून पंडित नेहरूंवर पुन्हा देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना 12 फेब्रुवारी 1934 रोजी अटक करण्यात आली. त्यांनी पुन्हा बचाव न करता गुन्हा मान्य केला आणि २ वर्षांची शिक्षा झाली. मात्र, त्यांच्या पत्नी कमला नेहरू यांच्या गंभीर आजारामुळे त्यांची 565 दिवसांनी सुटका झाली.
===============
हे ही वाचा :
Veer Savarkar Jayanti : बोस-सावरकरांची ती भेट आणि…
Dadasaheb Phalke : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके
===============
1940– वैयक्तिक सत्याग्रहासाठी अटक
पंडित नेहरूंनी दुसऱ्या महायुद्धात भारताला जबरदस्तीने ओढल्याबद्दल वैयक्तिक सत्याग्रह केला. त्यामुळे त्यांना 31 ऑक्टोबर 1940 रोजी अटक झाली. डिसेंबर 1941 मध्ये त्यांची सुटका झाली.(Marathi Latest News)
1942 – ‘भारत छोडो’ आंदोलन व शेवटचा तुरुंगवास
7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईत काँग्रेस समितीच्या बैठकीत भारत छोडो आंदोलनाची घोषणा झाली. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ ऑगस्ट रोजी नेहरूंना अटक करण्यात आली. त्यांना अहमदनगर किल्ल्यावर ठेवण्यात आले, जिथे त्यांनी सर्वाधिक काळ, सुमारे तीन वर्षे, तुरुंगात घालवली. जानेवारी 1945 मध्ये त्यांची शेवटची सुटका झाली. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जीवनात तुरुंगवास म्हणजे त्याग, संकल्प आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचे प्रतीक होते. त्यांच्या या योगदानाचे स्मरण करणे, म्हणजेच स्वातंत्र्यासाठी झगडलेल्या प्रत्येक थोर पुरुषाला आदरांजली अर्पण करणे होय.