आषाढ महिना सुरु झाला की, भारतातील विविध ठिकाणी सणवारांची सुरुवात होते. एकीकडे पाऊसाचा जोर वाढू लागतो तर दुसरीकडे सणांची झळाळी येण्यास सुरुवात होते. आषाढ महिन्यात वेगवेगळे सण- उत्सव साजरे केले जातात. महाराष्ट्रात तर आषाढ म्हटले की, लगेच डोक्यात येते ती पंढरीची वारी आणि आषाढी एकादशी. संपूर्ण महाराष्ट्र्रतून नव्हे नव्हे भारतातून ठिकठिकाणाहून पंढरपूरला जाण्यासाठी पालखी निघते, आणि आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूरमध्ये पोहचते. (Jagannath Rathyatra)
आषाढ महिन्यातील अजून एक जगप्रसिद्ध सोहळा म्हणजे, ओडीशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ यांची मंदिरातून निघणारी भव्य शोभा रथयात्रा. सर्वच हिंदूंचे सर्वात मोठे तीर्थस्थळ असलेल्या आणि चारधामांमधील एक महत्वाचे धाम असलेल्या जग्गनाथ पुरीची यात्रा म्हणजे सर्वांचेच मोठे आकर्षण असते. दरवर्षी भाविक मोठ्या भक्तिभावाने या रथयात्रेच्या वाट बघत असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला जगन्नाथ रथयात्रा असते. यंदा २७ जून पासून या रथयात्रेला सुरुवात होणार आहे. जगन्नाथ रथयात्रा २७ जून २०२५ पासून सुरू होईल आणि ५ जुलैपर्यंत चालेल. नऊ दिवसांच्या या उत्सवात अनेक प्रमुख विधींचा समावेश आहे, ज्याची सुरुवात स्नान पौर्णिमेपासून होते आणि देवतांच्या मुख्य मंदिरात परत येण्याने समाप्त होते. (Marathi News)
यावर्षी या तिथीचा आरंभ २६ जून २०२५ ला दुपारी १:२४ मिनिटांनी सुरु होणार असून, ही तिथी २७ जून सकाळी ११:१९ वाजता संपणार आहे. या दिवशी, भगवान जगन्नाथ अर्थात श्री कृष्ण त्यांचे भाऊ बलभद्र अर्थात बलिराम आणि त्यांची बहीण सुभद्रा यांना आकर्षक सजावट केलेल्या तीन भव्य रथांवर बसवून, शहरातून भव्य मिरवणुक काढली जाते. या सोहळा अतिशय सुंदर आणि भव्य असतो. हा रथोत्सव पाहण्यासाठी केवळ देशातूनच नाही तर विदेशातून देखील लाखो भाविक पुरीमध्ये एकत्र येतात. असंख्य भाविक हा रथ खेचतात देखील. हा रथ खेळामुळे आपल्या पापांचा नाश होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते असे म्हटले जाते. (Marathi Top News)
जगन्नाथ रथयात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे या यात्रेतील रथ. प्रत्येक वर्षी नवीन रथ टायर केला जातो. हा रथ घडवण्याची सुरुवात रथयात्रेच्या काही महिने आधीपासून होते. या रथयात्रेची तयारीही अनेक महिने आधीपासून सुरू होते. या रथांपैकी जगन्नाथाचा १६ चाके असलेला लाकडी रथ हा ४५ फूट उंच, ३५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. तर त्यांचे बंधू असलेल्या बलरामांचा रथ ४५ फूट उंच असतो. तर, या दोघांची लाडकी बहीण असलेल्या सुभद्राच्या रथाची उंची ४३ फूट असते. (Todays Marathi Headline)
जगन्नाथ रथयात्रेत श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांचे रथ असतात. बलराम हे थोरले बंधू असल्यामुळे या रथयात्रेत त्यांचा रथ सर्वांत पुढे असतो. त्यांच्या रथाला तालध्वज असे म्हटले जाते. या राठयात्रेत मध्यभागी सुभद्रेचा दर्पदलन किंवा पद्मा नावाचा रथ असतो. तिसरा शेवटचा रथ भगवान श्रीकृष्णांचा रथ असतो. याला नंदी घोष किंवा गरुड ध्वज, असे म्हटले जाते. बलराम आणि सुभद्रा यांचा रथ लाल रंगाचा असतो, तर भगवान जगन्नाथांचा रथ पिवळ्या किंवा लाल रंगाने सजवला जातो. रथ सुशोभित करण्यात पारंपारिक पद्धतीचा वापर केला जातो. मुख्य म्हणजे प्रत्येक रथाची उंची, रंग आणि रथाचे लाकूड वेगळे ठेवले जाते. (Marathi Latest NEws)
दरवर्षी इथले पुजारी देवाला ‘ताप आल्याची’ घोषणा करतात. त्यानंतर मंदिर काही दिवस बंद ठेवण्यात येते. या काळात मंदिरात कोणत्याही प्रकारची पूजा होत नाही. रथयात्रेच्या आधी भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांना १०८ मंगल कलशांतल्या पाण्याने आंघोळ घातली जाते. या अभिषेकानंतर देवांना सजवले जाते. १०८ कलशांमधील पाण्याने स्नान झाल्यानंतर देवाला ‘ताप आलाय’ असे इथले पुजारी घोषित करतात आणि देवदर्शन बंद होते. (Top Stories )
जग्गनाथ पुरीच्या मंदिराच्या आवारात एक सोनविहीर आहे. देवी शीतला या विहिरीचे संरक्षण करते अशी मान्यता आहे. ही विहीर वर्षातून फक्त एकदाच अभिषेकाच्या दिवशी उघडली जाते. इतर दिवशी ती बंद असते. त्या दिवशी मंदिरातल्या मुळ मूर्ती गाभाऱ्यातून बाहेर काढल्या जातात आणि स्नानवेदी म्हणवल्या जाणाऱ्या जागी ठेवल्या जातात. मग १०८ कलशांनी देवांना स्नान घातले जाते. देवांच्या अभिषेकाच्या वेळी त्यांचे दागिने, सजावट, मखर सगळं काढून ठेवलेलं असतं. त्यांची आंघोळ झाली की त्यांना लोकरीच्या कपड्यांमध्ये गुंडाळलं जातं आणि गर्भगृहात आत ठेवले जाते. (Social News)
===============
हे देखील वाचा : Temple : जगाच्या अंताचे रहस्य असलेल्या ‘या’ मंदिरात दर्शन घेण्यासाठी जावे लागते ९० फूट खोल गुहेत
===============
या १५ दिवसांच्या काळाला अनासरा असेही म्हटले जाते. या काळात भक्तांच्या दर्शनासाठी मंदिराच्या बाहेरच्या भागात भगवान जगन्नाथाची जुनी चित्रं ठेवलेली जातात. दररोज पुरीमध्ये महाप्रसाद हा अतिशय सुग्रास आणि ५६ भोग असलेला असतो. मात्र या अनासराच्या काळात इथे आयुर्वेदिक औषधं, चाटणं नैवेद्य म्हणून अर्पण केली जातात. १५ दिवसांनी देवाला बरं वाटत असल्याची घोषणा होते आणि मंदिर खुले केले जाते. अभिषेकादरम्यान देवांच्या मूर्तींचा रंग जातो, त्यामुळे मूर्तींना नवा रंगही दिला जातो. त्यानंतर एका दिवसासाठी लोकांना देवदर्शन खुलं होतं, याला नारायण दर्शन असं म्हणतात आणि मग रथयात्रा सुरू होते. रथयात्रा सुरू होण्यापुर्वी रथासमोरचा रस्ता सोन्याच्या झाडूने झाडला जातो, मगच रथयात्रा सुरू होते. (Top Marathi Headline)