Home » Jagganath Yatra : अनेक चमत्कारिक रहस्यांनी भरलेले आहे भगवान जग्गनाथांचे धाम

Jagganath Yatra : अनेक चमत्कारिक रहस्यांनी भरलेले आहे भगवान जग्गनाथांचे धाम

by Jyotsna Kulkarni
0 comment
Jagganath Yatra
Share

संपूर्ण पुरी शहर सध्या भक्तिमय झाले आहे. भगवान जग्गनाथांचा रथोत्सव मोठ्या जल्लोषात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे. १० दिवस चालणाऱ्या या रथयात्रेचे महत्व हिंदू धर्मात अफाट आहे. समुद्रकिनारी वसलेल्या पुरी शहरात जगन्नाथ रथयात्रेच भव्य उत्सव पाहायला मिळतो. तो डोळ्यांचे पारणे फेडणारा भक्तिरसामध्ये न्हाऊन काढणारा हा रथोत्सव प्रत्यक्ष पाहायला मिळण्यासारखे अहोभाग्य नाही. या रथयात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या काळात भाविकांना थेट मूर्तींपर्यंत पोहोचण्याची सुवर्णसंधी मिळते. (Jagganath Yatra)

हिंदू धर्मात रथयात्रेला विशेष महत्त्व आहे. ओडिशातील सिद्धधाम जगन्नाथ पुरी येथे २७ जून पासून हा रथोत्सव सुरु झाला आहे. या काळात भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढली जाते. ही रथयात्रा पुरीच्या जगन्नाथ मंदिरापासून सुरू होऊन गुंडीचा मंदिरात संपते. यादरम्यान भगवान जगन्नाथ, मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण देवी सुभद्रा हे तीन खास आणि भव्य रथांवर बसून नगरमध्ये भ्रमण करतात आणि भक्तांना दर्शन देतात अशी मान्यता आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या रथांची निर्मिती करून यात्रेची तयारी सुरू होते. (Today Marathi HEadline)

भारतातील चार पवित्र तीर्थांपैकी एक असलेल्या पुरीच्या ८०० वर्ष जुन्या मुख्य मंदिरात योगेश्वर श्री कृष्ण जगन्नाथाच्या रूपात विराजमान आहे. हे मंदिर हिंदू धर्मातील चार धामांपैकी एक धाम म्हणून देखील ओळखले जाते. या मंदिराची वैशिष्ट्ये, इतिहास, मान्यता जितक्या प्रसिद्ध आणि प्रचलित आहे, तितकेच या मंदिराशी संबंधित रहस्ये देखील कायम चर्चेत असतात. जग्गनाथ मंदिराची रहस्ये मोठमोठ्या वैज्ञानिकांना देखील सोडवता आलेली नाहीत. आज आपण या भगवन जगगनाथांच्या मंदिराची रहस्येच जाणून घेणार आहोत. (Marathi News)

Jagganath Yatra

जगन्नाथ धामची थक्क करणारी रहस्ये

​मंदिरावरील सुदर्शन चक्र
भगवान जगन्नाथ यांच्या या मंदिराची उंची २१४ फूट आहे. या मंदिरावर मोठे सुदर्शन चक्र लावलायचे आपल्याला दिसते. मुख्य म्हणजे पुरीमधील कोणत्याही ठिकाणाहून मंदिराच्या शिखरावरील असलेले सुदर्शन चक्र पाहिल्यास ते आपल्याला नेहमीच आपल्या समोरच असल्याचे भासते. या मंदिराच्या मुख्य घुमटाची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळेला अदृश्य असते. (Top Marathi Headline)

===========

हे ही वाचा : Jagannath Yatra: का जग्गनाथ मंदिरात अविवाहित जोडप्यांना प्रवेश मिळत नाही?

============

​मंदिरावरील ध्वज
जगन्नाथ मंदिरावरील लावलेला ध्वज हा देखील एक रहस्यच आहे. कारण हा ध्वज नेहमीच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो. सामान्य दिवसाच्या वेळी वारा समुद्रापासून जमिनीकडे वाहतो आणि संध्याकाळी जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहतो. मात्र, जगन्नाथ मंदिर परिसरातील स्थिती कायम उलट असते. एवढेच नाही, तर या मंदिरावरील ध्वज दररोज बदलला जातो. दररोज एक पुजारी ध्वज घेऊन वर जातो आणि घुमटावर असलेला ध्वज बदलतो. एका मान्यतेनुसार, एक दिवस जरी हा ध्वज बदलण्यात आला नाही किंवा या प्रथेमध्ये खंड पडला, तर हे मंदिर पुढील १८ वर्षांसाठी बंद होऊ शकते. (Latest Marathi News)

​रथाची भव्यता 
भगवान जगन्नाथाच्या रथांची भव्यता मोहून टाकणारी आहे. या सर्व रथांचे संपूर्ण बांधकाम लाकडी असते. या रथांचे बांधकाम करताना कोणत्याही प्रकारचा धातू वापरला जात नाही. या रथयात्रेत बलराम हे थोरले बंधू असल्यामुळे त्यांचा रथ सर्वांत पुढे असतो. याला तालध्वज, असे म्हटले जाते. मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो, याला दर्पदलन किंवा पद्मा रथ, असे म्हणतात. सर्वांत शेवटी भगवान श्रीकृष्णांचा रथ असतो, याला नंदी घोष किंवा गरुड ध्वज, असे म्हटले जाते. दोन्ही भावांची लाडकी बहीण सुभद्रा दोन भावांची संरक्षणात यात्रा करते, अशी मान्यता आहे. या रथांपैकी जगन्नाथाचा १६ चाके असलेला लाकडी रथ हा ४५ फूट उंच, ३५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. बलरामांचा रथ ४५ फूट उंच असतो. तर, सुभद्राच्या रथाची उंची ४३ फूट असते. (Top Marathi NEws)

​प्रसाद वाया जात नाही
जगन्नाथ मंदिरात वर्षभर अन्नछत्र सुरू असते. मात्र, येथे बनत असलेला प्रसाद कधीही वाया जात नाही. मुख्य म्हणजे या मंदिराच्या स्वयंपाकघरात प्रसाद शिजविण्यासाठी ७ भांडी एकमेकांवर ठेवली जातात. या प्रक्रियेमध्ये सर्वात वर असलेल्या अर्थात सातव्या भांड्यातील अन्न प्रथम शिजते आणि त्यानंतर खालच्या अशा एकामागील एक एक भांड्यातील अन्न शिजत जाते. या भल्यामोठ्या स्वयंपाकघरात भगवान जगन्नाथाला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्याला बनविणारे ५०० स्वयंपाकी आणि त्यांचे ३०० मदतनीस एकत्र काम करतात.

Jagganath Yatra

​देश-विदेशात जगन्नाथ रथयात्रा आयोजन
जगन्नाथाची मुख्य यात्रा पुरी येथे होत असली, तरी देशभरातील अनेक राज्यांमध्ये या यात्रेचे आयोजन केले जाते. भारतातच नाही, तर परदेशातही या यात्रेचे आयोजन केले जाते. भारतात गुजरात, आसाम, जम्मू, दिल्ली, आंध्र प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमधील काही शहरांत या यात्रेचे आयोजन केले जाते. तर परदेशात बांगलादेश, सॅन फ्रान्सिस्को, लंडन यांसह अनेक देशांमध्ये ही यात्रा काढली जाते.

​१४४ वर्षे मंदिर बंद
भारतावरील एका आक्रमणामुळे जगन्नाथ मंदिर सुमारे १४४ वर्षे बंद होते. दररोजचे पूजनही बंद होते. मात्र, आद्य शंकराचार्यांनी हे मंदिर खुले केले आणि या मंदिरात दररोज पूजाही सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत जगन्नाथ मंदिराची परंपरा कधीही खंडीत झालेली नाही.

​समुद्राच्या लाटांचा आवाज
या मंदिराच्या सिंहद्वारेतून पहिले पाऊल आत टाकताच क्षणी आपल्याला समुद्राच्या लाट्यांचा आवाज ऐकू येत नाही. मात्र, आपण मंदिराच्या बाहेर पाऊल टाकले की, लगेच समुद्राच्या लाटांचा स्पष्ट आवाज ऐकू येतो. संध्याकाळी स्पष्टपणे हा आवाज आपल्याला ऐकू येतो. या मंदिराचे अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरावरून एकही पक्षी किंवा विमान उडत नाही. जगन्नाथ मंदिर परिसरात असलेल्या एका विशेष चुंबकीय शक्तीमुळे असे घडत असल्याचे सांगण्यात येते. (Top Trending News)

भगवान जगन्नाथांच्या मूर्तींचे नवलेपन
भगवान जगन्नाथांच्या मूर्तींना दर १२ वर्षांनंतर नवलेपन केले जाते. प्राथमिक प्रक्रिया पार पडल्यानंतर देवळातील पुजारी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतात. कारण ही नवलेपनाची उत्तर प्रक्रिया कोणीही पाहू शकत नाही. जर चुकून एखाद्याने ती प्रक्रिया पाहिली, तर त्याचा मृत्यू होतो अशी मान्यता आहे. नवलेपनाची प्रक्रिया सुरू असते, तेव्हा देवाच्या हृदयाची धडधड ऐकू येते, असा अनुभव हे नवलेपण करणारे पुजारी सांगतात. जेव्हा इथे नवीन मूर्ती बसवल्या जातात. तेव्हा देवाच्या मूर्ती बदलताना शहराची वीज खंडित केली जाते. यासोबतच मंदिराबाहेर प्रचंड सुरक्षा दल तैनात करण्यात येते. त्या काळात मंदिरात फक्त पुजारीच प्रवेश करू शकततात. (Top Stories)

===========

हे ही वाचा : Jagannath Temple : हनुमान हे जगन्नाथ मंदिराचे रक्षक म्हणून ओळखले जातात.

Jagannath Temple : भगवान जगन्नाथाचा रथ या कबरीसमोर का थांबतो !

============

​२८४ वर्षांपूर्वी खंडीत झाली होती परंपरा
सन १७३३ ते १७३५ या दरम्यान एकदा जगन्नाथ यात्रेची परंपरा खंडीत झाली होती. तकी खान याने जगन्नाथ मंदिरावर हल्ला चढवला होता. या आक्रमाणापासून देवतांच्या मूर्ती बचाव करण्यासाठी त्या अन्यत्र नेण्यात आल्या. त्यामुळे त्या वर्षी जगन्नाथ यात्रा होऊ शकली नाही. १५६८ ते १७३५ या कालावधीत तब्बल ३२ वेळा मुघलांच्या आक्रमणांमुळे जगन्नाथ रथयात्रा झाली नाही. यानंतर मात्र, यात्रेच्या आयोजनात खंड पडला नाही. १८७६ मध्ये या भागात प्रचंड दुष्काळ पडला होता. त्या प्रतिकूल परिस्थितीतही यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. (Social Media Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.