Home » Indian Economy : जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था

Indian Economy : जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था

by Jyotsna Kulkarni
0 comment
Indian Economy
Share

आज भारत विकसित देशांच्या यादीत स्थान मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताची जगामध्ये टॉप देशांमध्ये गिनती केली जाते. भारताने प्रत्येक बाबतीत, प्रत्येक क्षेत्रात नवनवीन मुसंडी मारत आपला डंका संपूर्ण जगात वाजवला आहे. कायमच भारताने आपले वेगळेपण सिद्ध केले. अशातच भारताच्या नावलौकिकात अधिक भर पडणारी आणि संपूर्ण जगात अभिमान वाटावा अशी एक बातमी समोर आली आहे. भारताने मोठा इतिहास रचला आहे. अनेक संकटांशी दोन हात करत भारतीय अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून पुढे आली आहे. जपानला मागे टाकत भारताने हा भीम पराक्रम केला आहे.

जपानला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेने चार ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला असून, ही आपल्या देशासाठी एक ऐतिहासिक कामगिरी आहे. यामुळे जागतिक आर्थिक व्यासपीठावर भारताचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया वाढत आहे. जागतिक बाजारातही भारतीय रुपयाने चांगली कामगिरी केली आहे आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत त्याने ताकद दाखवली आहे. आज भारताची अर्थव्यवस्था ४,००० अब्ज डॉलर्सची आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चा हवाला देत सुब्रमण्यम म्हणाले की, आज भारताची अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी आहे. (Top Stories)

जाणकारांच्या मतानुसार २०२५ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत देशाचा जीडीपी विकास दर 6.8 टक्के असू शकतो. या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेत वेगाने वाढ झालीय. याचा अर्थ असा की या काळात देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढली आहे. या वाढीमागील कारण म्हणजे शेती, हॉटेल्स, वाहतूक आणि बांधकाम यांसारख्या क्षेत्रांची मजबूत कामगिरी आहे. (Marathi NEws)

Indian Economy

जागतिक अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी गवर्निंग काऊंसिलिगच्या दहाव्या बैठकीनंतर ही माहिती दिली. आता भारतापुढे फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी आहेत. येत्या अडीच-तीन वर्षात भारत तिसऱ्या स्थानी पोहोचेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या विक्रमामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्यासोबतच सामान्य माणसालाही याचे अनेक फायदे होणार आहे. (Latest Marathi NEws)

‘Make in India’ आणि यासारख्या इतर अनेक उपक्रमांमुळे उत्पादन क्षेत्र अधिकाधिक मजबूत होणे अपेक्षित आहे. यामुळे रोजगारांच्या संधी वाढून बेरोजगारीची समस्या कमी होईल. जर डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला तर त्याचा थेट परिणाम कच्चे तेल, इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या आयात केलेल्या वस्तूंच्या किमतींवर होतो. ही आयात स्वस्त होईल आणि महागाई नियंत्रित करता येईल. येणाऱ्या काळात सरकारी रुग्णालयांमधील सुविधा सरकारकडून आणखी सुधारल्या जातील. देशातील तांत्रिक क्षेत्रात रोजगार वाढल्याने सर्वसामान्यांना चांगले आणि स्वस्त तांत्रिक उत्पादने मिळू शकतील. तसेच आर्थिक वाढीमुळे कृषी क्षेत्रातील गुंतवणूकही वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या जीडीपी आणि गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षणात सुधारणा होतील. वाढती उत्पन्न आणि मध्यमवर्गाचा विस्तार यामुळे ग्राहकोपयोगी वस्तू आणि सेवांची मागणी वाढेल. (Marathi Top Headline)

Indian Economy

रुपया मजबूत होण्याची कारणे
> भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था बनल्यामुळे देखील रुपया अधिक मजबूत झाला आहे. भारताचा जीडीपी ४ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त झाल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये आपसूकच आत्मविश्वास वाढत आहे.

> रुपयाच्या वाढीमागे कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली घसरण हे देखील एक महत्त्वाचे कारण मानले जाते.

> आरबीआयने सरकारसाठी जाहीर केलेला लाभांश रुपयाच्या वाढीमधील एक मुख्य कारण मानले जात आहे.

> रुपया स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने परकीय चलन साठ्याचा प्रभावीपणे वापर केला आहे.

> भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याच्या बातम्यांमुळे आणि रुपया मजबूत झाल्यामुळे, भारतीय शेअर बाजारातही सकारात्मक कल दिसून येत आहे. (Social Update News)

=============

हे देखील वाचा : 8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत नवीन अपडेट

=============

१ डॉलरची किंमत किती आहे?
२६ मे २०२५ रोजी एका अमेरिकन डॉलरचे भारतीय रुपयांमध्ये मूल्य सुमारे ८५ रुपये होते. जे रुपयाची ताकद दर्शवते.

भारत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाल्याने जागतिक स्तरावर होणारे परिणाम :

> G20 आणि IMF सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचा प्रभाव वाढेल.

> जागतिक कंपन्या भारताकडे एक आकर्षक बाजारपेठ म्हणून पाहत असल्याने भारतातील थेट परकीय गुंतवणूक (FDI) आणखी वाढेल.

> या ऐतिहासिक कामगिरीमुळे, भारत जागतिक आर्थिक नेतृत्वाच्या अधिकच जवळ आला आहे. जर भारताने २०२८ पर्यंत जर्मनीला मागे टाकले तर त्याचे नेतृत्व अधिक मजबूत होईल.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.