Home » जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं वर्चस्व

जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं वर्चस्व

by Team Gajawaja
0 comment
Indian Economy
Share

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला होता. या दौ-या दरम्यान भारताचे आंतराष्ट्रीय राजकारणात वाढलेले वर्चस्व सिद्ध झाले. पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यासाठी अमेरिकेचे व्हाईट हाऊस सज्ज होते. अमेरिकेतील अनेक मान्यवरांनी पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर संवाद साधत भारतात मोठी गुंतवणूक केली आहे. या दौ-यानंतर काही दिवसांनीच गोल्डमन सॅक्स या अमेरिकन गुंतवणूक कंपनीनं आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. गोल्डमन सॅक्स ही जगभरातील अव्वल दर्जाची गुंतवणूक कंपनी आहे. या कंपनीचा अहवाल हा आर्थिक जगतासाठी मोठा मार्गदर्शक असतो. या अहवालात गोल्डमन सॅक्सने भारताचा सुवर्ण काळ सुरु होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या अहवालानुसार पुढील काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था ही जगात सर्वोत्तम अर्थव्यवस्था असणार आहे. गोल्डमन सॅक्स या अहवालामुळे भारतात आर्थिक गुंतवणूक करु इच्छिणा-या कंपन्याही खुश झाल्या असून भविष्यात भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल अशी आशा तज्ञांनी व्यक्त केली आहे. (Indian Economy)  

गोल्डमन सॅक्स या गुंतवणूक कंपनीच्या अहवालानं भारताबाबत अनेक आशा निर्माण झाल्या आहेत. युरोप, अमेरिकेमध्येही या अहवालाचे परिणाम होणार आहेत. इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ अमेरिकाने आपल्या अहवालात 2075 पर्यंत भारत जगातील सर्वोत्तम अर्थव्यवस्था असेल हे स्पष्ट केले आहे. गोल्डमन सॅक्स ही अमेरिकन गुंतवणूक कंपनी असून या कंपनीच्या अहवालाकडे अनेक मोठ्या उद्योगसमुहांचे लक्ष असते.  याच कंपनीनं येणारं शतक हे भारताचं असल्याचं स्पष्ट केले आहे. सध्या भारत आर्थिक सत्तेमध्ये जगभरात पाचव्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान मोदी हे अमेरिकेच्या दौ-यावर असतांना त्यांनी याबाबत सांगितलेही होते. लवकरच भारत या स्थानावरुन दुस-या क्रमांकावर विराजमान होईल, असेही मोदी यांनी तेथील भारतीयांना मार्गदर्शन करतांना सांगितले होते. तसेच विधान गोल्डमन सॅक्सच्या अहवालात करण्यात आले आहे. (Indian Economy) 

गोल्डमन सॅक्सच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, 50 वर्षांनंतर म्हणजेच 2075 पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला असेल. येत्या काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था 52.2 ट्रिलियन डॉलर्स येवढी झालेली असेल. हा आकडा सध्याच्या जीडीपीपेक्षा 15 पट जास्त आहे. आपल्या केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनीही संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात भारताची अर्थव्यवस्था या वर्षी मार्चपर्यंत $3.5 ट्रिलियन होईल, असे म्हटले होते. आता गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार, भारताने हा आकडा पार केला आहे.(Indian Economy)

भारत सध्या जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे, ज्या देशानं आपल्या देशावर काही वर्ष राज्य केलं आणि भारताची सर्वाधिक लूट केली त्या इंग्लडलाही आपण अर्थव्यवस्थेत मागे टाकलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार, 2027 पर्यंत भारत, जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगात तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ पाहत आहे. 2027 पर्यंत, जपानची अर्थव्यवस्था $5.2 ट्रिलियन आणि जर्मनीची $4.9 ट्रिलियन असेल. तो पर्यंत भारतीय अर्थव्यव्यवस्थेनं 5.4 ट्रिलियन डॉलर पार केले असतील असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 2030 नंतर भारत अमेरिकेलाही मागे टाकून दुस-या स्थानावर आलेला असेल, हे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. (Indian Economy)  

=========

हे देखील वाचा : Success Story: रिक्षावालाचा मुलगा झाला IAS, गोविंद जायसवाल यांची Inspirational स्टोरी

=========

गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार, 2075 मध्ये, भारत 52.5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल, तर अमेरिका $ 51.5 ट्रिलियनसह तिसऱ्या स्थानावर असेल.  2050 नंतर जगावर आशिया खंडाचे वर्चस्व राहणार आहे. त्यातून चीन जागतिक अर्थव्यवस्था म्हणून पहिल्या क्रमांकावर असेल, चीनचा जीडीपी $57 ट्रिलियनपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. (Indian Economy)

गोल्डमन सॅक्सचा अहवाल आल्यावर भारतातील उद्योगसमुहामध्येही आनंदाचे वातावरण आहे. तसेच भारतात ज्या मोठ्या कंपन्या आर्थिक गुंतवणूक करु इच्छितात त्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. एकूण पुढचे शतक हे भारतीय अर्थव्यवस्थेचे असेल हे नक्की.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.