हिंदू धर्मात मंत्रांचा जाप करणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. पौराणिक काळापासूनच मंत्रांचे उच्चारण करणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. मंत्रांचे उच्चारण केल्याने आजूबाजूचे वातावरण शुद्ध होते. मनावर नियंत्रण करुन शब्दांचे उच्चारण करणे सुद्धा मंत्राचा जाप होतो असे मानले जाते. मंत्र जापामुळे आपले मानसिक आरोग्य उत्तम राहते. जेव्हा आपण ॐ चे उच्चारण करतो तेव्हा आपल्या शरिरात एक कंपन तयार होतात. जे आपल्या मनाला सर्व विकारांपासून दूर करतात. (Hindu Belief)
कोणत्याही मंत्राचा उच्चार करण्यापूर्वी ॐ उच्चारला जातो. ॐ हा शब्द तीन अक्षरांनी तयार झालेला आहे. खरंतर तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, प्रत्येक मंत्रापूर्वी ॐ चा उच्चार का केला जात असेल? यामुळे काय लाभ होतो आणि नक्की काय कारण आहे हेच आपण जाणून घेऊयात.कोणत्याही मंत्र उच्चारणेपूर्वी ॐ चे उच्चारण करणे शुभ मानले जाते. यामुळे मन शुद्ध होते आणि त्याचसोबत मंत्रांच्या उच्चारणात गती सुद्धा येते. ऐवढेच नव्हे तर मंत्र सिद्ध सुद्धा होतात. मंत्रांची शक्ती आणि तीव्रता अधिक वाढली जाते. त्यामुळे नेहमीच मंत्रांचा जाप करण्यापूर्वी ॐ चे उच्चारण केले जाते.
असे म्हटले जाते की, ॐ सुरुवातीला उच्चारून मंत्राचा जाप केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. हा शब्द अत्यंत शक्तीशाली मानला जातो. याच कारणास्तव जर कधीही मंत्र पठणावेळी एखादी चूक झाली तरीही त्याचा दोष ॐ चे उच्चारण केल्याने लागत नाही.
खास गोष्ट अशी की, ॐ शब्दात वेदांचे सार दिले गेले आहे. ऐवढेच नव्हे तर यामध्ये तपस्या करणाऱ्यांसह योगींचे सुद्धा सार आहे. याच कारणास्तव जेव्हा एखादा व्यक्ती मंत्राचा जाप करतो तेव्हा त्याआधी ॐ लावतो. त्यामुळे त्याच्या सर्व समस्या दूर होऊ लागतात.
ॐ हा शब्द तीन अक्षरांनी तयार झालेला आहे. त्यामध्ये अ, उ आणि म हे तीन अक्षरं आहेत. यामधील प्रत्येक अक्षर हे संपूर्ण सृष्टीचे प्रतीक मानले गेले आहे. भगवत गीतेनुसार सुद्धा मंत्रापूर्वी ॐ चे उच्चारण करणे पुण्याचे काम मानले जाते. असे म्हटले जाते की, ओमच्या उच्चारणामुळे कोणत्याही व्यक्तीला अत्यंत पुण्य मिळते.(Hindu Belief)
हेही वाचा- मंडीच्या पंचवक्त्र मंदिरात केदारनाथासारखा ‘चमत्कार’
ॐ मंत्राचा जाप केल्याने होणारे फायदे
-ॐ शब्दाचे उच्चारण सकाळी लवकर उठून ध्यान मुद्रेत बसून १०८ वेळा केल्याने घरातील सर्व नकारात्मक उर्जा दूर होतो
-वास्तूदोष ही दूर होतो
-व्यक्तीची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढली जाते
-आपली फुफ्फुस मजबूत होतात आणि श्वसनासंबंधित समस्या ही दूर राहतात