आपल्या हिंदू धर्मामध्ये महिला त्यांच्या सौभाग्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी नानाविध प्रकारचे व्रत करतात. प्रत्येक प्रांताप्रमाणे या व्रतामध्ये थोडे फार बदल असतात. असेच एक महत्वाचे व्रत म्हणजे हरितालिका व्रत. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाची प्रगती आणि समृद्धीसाठी हरितालिकेचे व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते. शिवाय हरितालिका व्रत हे कठीण व्रतांपैकी एक समजले जाते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला ‘हरतालिका’ व्रत केले जाते. विवाहित महिला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी हे व्रत करतात तर कुमारिका किंवा अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून यादिवशी उपवास करतात. हरतालिका व्रत गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी केली जाते. (Haritalika Vrat)
या दिवशी विवाहित महिला आपल्या सौभाग्यासाठी पाणी आणि अन्नाशिवाय उपवास करतात. अविवाहित मुलीही हे व्रत करतात. मान्यता आहे की, भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो. हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी हरतालिकेचे विवाहित महिलांसाठी विशेष महत्व आहे. हरतालिकेचे व्रत निर्जल ठेवले जाते. पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वती यांनी भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते. हरतालिका व्रत केल्याने महिलांना वैवाहिक सुख मिळते अशीही मान्यता आहे. हरितालिका व्रताची पूजा विधी- हरितालिका व्रतामध्ये गणेश, शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. (Bhadrapad)
यंदा हरितालिका व्रत हे २६ ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे. हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त २६ ऑगस्ट २०२५ ला ०५ वाजून ५६ मिनिटांपासून ०८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत आहे. हरतालिकेची तृतीयेची तिथी २५ ऑगस्ट २०२५ ला दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी सुरु होणार आहे. तर २६ ऑगस्टला दुपारी ०१ वाजून ५४ मिनिटांनी तृतीया संपेल. उदय तिथीनुसार हरितालिका व्रत हे २६ ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी भगवान शिवाने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले होते. त्यामुळे विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. हरितालिकेचं व्रत शंकर-पार्वतीला समर्पित आहे. (Marathi Top News)
हरितालिका पूजा साहित्य
हरितालिक आणि शिवलिंग, अत्तर, हळद-कुंकू , चंदनगंध , अष्टगंध , गुलाल , बुक्का , अक्षता , रांगोळी , उदबत्ती , कापूर , आगपेटी , सुटीनाणी ६ , तुपाच्या व तेलाच्या वाती , कापसाची वस्त्रे – १६ मण्यांचे १ व ५ मण्यांचे १ , वाटीभर तांदूळ, पंचामृत ( दूध , दही , तूप , मध , साखर ), गूळखोबरे , नैवेद्य , सुंठवडा ( डिंकवडा ), चौरंग / पाट, आसन, पाण्याचा कलश , शंख , घंटा , समई , निरांजन, कापूरारती , पळीपंचपात्र , ताम्हण, देव पुसण्याचे वस्त्र , हातपुसणे, तसराळे, काडवाती, फुले , दूर्वा, तुळस, विड्याची पाने १२ , सुपाऱ्या ६ , बदाम ५ , खारका ५ , नारळ २ , शहाळे, फळे ५ / केळी ५ , पेढे / खडीसाखर, जानवे, कापूर, उदबत्ती, पत्री या (बेल, आघाडा, मधुमालती, दूर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोतरा, जाई, मरवा, बकुळ, अशोक), हळदकुंकू , तांदूळ , वस्त्र , पानसुपारी , नाणे , नारळ , गजरा / वेणी , शिधा तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकण, आरसा इत्यादी (Trending Marathi Headline)
==============
हे देखील वाचा : Rishi Panchami 2025 : ऋषीपंचमी का साजरी करतात? जाणून घ्या तारखेसह महत्व
===============
हरतालिका पूजन विधी
या व्रतामध्ये गौरी शंकराची मातीची मूर्ती बनवली जाते. व्रताच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर उपवासाची प्रतिज्ञा घेण्यासाठी “उमामहेश्वरसायुज्य सिद्धये हरतालिका व्रतमहं करिश्ये” या मंत्राचा जप करा. घरातील पूजास्थळ स्वच्छ केल्यानंतर, चौकीवर लाल किंवा पिवळा कापड पसरवा. चौकीवर भगवान शिव, माता पार्वती आणि गणेशजींची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. महिलांनी १६ शृंगार करुन तयार व्हावे. यानंतर, धूप, दिवा, चंदन, अक्षत, फुले, फळे, सुपारीची पाने, सुपारी, कापूर, नारळ, बेलपत्र, शमीपत्र इत्यादी देवाला पूजेसाठी अर्पण करा. यानंतर, कलश स्थापित करा आणि त्यावर पाणी, आंब्याची पाने आणि नारळ ठेवा. शिव परिवाराला गंगाजलाने स्नान घाला. धूप, दिवा लावा आणि आरती करा. हरतालिका तृतीयाची कथा ऐका. रात्री भजन-कीर्तन करा आणि जागरण करा. दुसऱ्या दिवशी सकाळी, माता पार्वतीला कुंकु अर्पण करून उपवास सोडा. (Marathi News)
हरतालिकेचे महत्त्व
पतीप्रती आपली सद्भावना आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी तसेच इच्छित पती मिळावा यासाठी हरतालिकेचे व्रत करण्यात येते. इच्छित वर मिळावा म्हणून विवाह इच्छुक मुलीही हरतालिकेचे व्रत करतात. या व्रतात आठ प्रहर उपवास केल्यानंतर अन्नसेवन करण्यात येते. व्रतापासून मिळणार्या फळाचे वर्णन ‘अवैधव्यकारा स्त्रीणा पुत्र-पौत्र प्रर्वधिनी’ असे करण्यात आले आहे. अर्थात जीवनात सुख लाभण्यासाठी व्रताचे विधिपूर्वक पालन करण्यास सांगण्यात आले आहे. (Todays Marathi Headline)
भविष्योत्तर पुराणानुसार हरतालिका व्रताच्या दिवशी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेस ‘हस्तगौरी, ‘हरिकाली आणि ‘कोटेश्वरी’ व्रताचेही पालन करण्यात येते. यामध्ये पार्वतीचे गौरीच्या रूपात पूजन करण्यात येते. भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेच्या दिवशीच हस्तगौरी व्रताचे अनुष्ठान होते. महाभारत काळातही हे व्रत पाळण्यात येत असल्याचे संदर्भ आढतात. भगवान श्रीकृष्णाने राज्यप्राप्तीसाठी, धन-धान्याच्या समृद्धीसाठी कुंतीस या व्रताचे पालन करण्यास सांगितले होते. यामध्ये १३ वर्षांपर्यंत शिव-पार्वती व श्रीगणेशाचे ध्यान करण्यात येते. चौदाव्या वर्षी व्रताचे उद्यापन करण्यात येते. (Latest Marathi News)
हरितालिका उत्तर पूजा
हरितालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी उत्तरपुजेची सुरुवात करावी. आचमन करून पंचोपचाराने पुजा करावी. दहीभाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षता कराव्यात. यानंतर देवतांचे विसर्जन करावे. हरितालिकेचे पारणे उत्तरपुजेच्या दिवशी करतात.
हरितालिका कथा
एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसले होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, “महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ, असं एखादं व्रत असलं, तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा.” तेव्हा शंकर म्हणाले, “जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णु श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक. (Top Marathi Headline)
हे व्रत भाद्रप्रद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी ‘मी तुला प्राप्त व्हावे’ म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तूझ्या वडलांना फार दुःख आणि ‘अशी कन्या कोणास द्यावी?’ अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, “तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून इथं मी आलो आहे.” (Latest Marathi Headline)
हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडलांनी ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस, ‘महादेवावाचून मला दुसरा पती करणं नाही’ असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडलांनी मला विष्णूला देण्याचं कबुल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. (Top Trending Headline)
तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापिलीस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं, नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, “तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही,” नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. (Top Trending News)
दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला ‘हरितालिका व्रत’ असं म्हणतात. याचा विधी असा आहे. (Marathi Top News)
“ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साती जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं, तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं.” ही साठा उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी, देवाब्राह्मणाचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. (Top Stories)
==============
हे देखील वाचा : Ekadshi : भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी ‘अजा एकादशी’
Shravan : ‘या’ कारणामुळे उद्याचा चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार ठरणार खास
===============
हरितालिकेची आरती
जयदेवी हरितालिके ।। सखी पार्वती अंबिके ।। ज्ञानदीपकलिके ।। आरती ओवाळीतें ।।१०।। हरअर्धांगी तूं वससी ।। जासी यज्ञा माहेरासी ।। तेथे अपमान पावसी ।। यज्ञकुंडीं गुप्त होसी ।। जय० ।। रिघसी हिमाद्रीच्या पोटीं ।। कन्या होसी तूं गोमटी ।। उग्र तपश्चर्या मोठी ।। आचरसी उठाउठी ।। जय० ।। तप पंचाग्नी साधनें ।। धूम्रपानें अधोवदनें ।। केलीं बहु उपोषणें ।। शंभु भ्रतारा कारणें ।। जय० ।। लीला दाखवीसी दृष्टी ।। हे व्रत करिसी लोकांसाठी ।। पुन्हा बरिसी धूर्जटी ।। शिवरूप मग होसी।।जय०।। तुझें तप तुझे गुण ।। सर्व स्त्रियां आभूषण ।। पंचारती ओवाळीतें ।। सुखशान्ति देईं मातें ।। जय० ।। (Social News)
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics