Home » पौर्णिमेला आपले मन विचलित होण्यामागे ‘हे’ आहे कारण

पौर्णिमेला आपले मन विचलित होण्यामागे ‘हे’ आहे कारण

by Team Gajawaja
0 comment
Full moon
Share

हिंदू पंचांगानुसार महिन्यातील ३० दिवस हे चंद्राच्या कलेवर आधारित १५-१५ दिवसांना दोन पक्षात विभागले गेले आहेत. म्हणजेच शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षाच्या अखेरच्या दिवसाला पौर्णिमा असे म्हटले जाते. तर कृष्ण पक्षाच्या अखेरच्या दिवसाला अमावस्या असे म्हटले जाते. हिंदू धर्मात पौर्णिमा म्हणजेच फुल मूनला फार महत्त्व दिले जाते. पौर्णिमेचा चंद्र हा पूर्ण गोलाकार दिसतो. खरंतर पौर्णिमेचा चंद्र धार्मिक आणि वैज्ञानिक रुपात महत्त्वपूर्ण मानला जातो. आपल्याला असे वाटते की, चंद्राचा आपल्या आयुष्यावर खास फरक पडत नाही. परंतु हे एक खगोलीय तथ्य आहे की, चंद्राचा पृथ्वीवरील बहुतांश महत्वपूर्ण गोष्टींवर अत्याधिक प्रभाव होतो. पौर्णिमेला चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या एका सरळ रेषेत असतो. याचा सुद्धा परिणाम व्यक्तीवर होतो. त्यामुळे जाणून घेऊयात फुल मून म्हणजेच पौर्णिमेला आपले मनं विचलित का असते त्याबद्दल अधिक. (Full Moon)

वैज्ञानिक कारण
पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा पृथ्वीच्या पाण्याशी थेट संबंध असतो. जेव्हा पौर्णिमा असते तेव्हा समुद्रात भरती येते. कारण चंद्र त्यावेळी पाण्याला आपल्याकडे खेचतो. तर मानवी शरिरात ८५ टक्के पाणी असते. अशातच पौर्णिमेच्या दिवशी व्यक्तीच्या मनावर प्रभाव पडतो आणि त्यामुळेच त्याचे मन विचलित झालेले असते.

मानवी शरिरात पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने पौर्णिमेला शरिरातील पाण्याचे गति आणि गुण बदलतात. जे मनाला प्रभावित करतात. त्याचसोबत वैज्ञानिक असे मानतात की, पौर्णिमेच्या दिवशी चंद्रावर अधिक प्रभाव होतो. त्यामुळे शरिरातील रक्तात न्यूरॉन सेल्स अॅक्टिव्ह होतात. न्यूरॉन सेल्स अॅक्टिव्ह झाल्यानंतर मनुष्याचे मन उत्तेजित आणि भावूक होते. याच कारणास्तव झोप ही कमी येते आणि मन बैचेन राहते.

त्याचसोबत पौर्णिमेला तुमची एनर्जी अधिक वाढली जाते. तुम्ही अधिक मोटिवेट होता. जसाजसा चंद्राचा आकार पौर्णिमेला वाढला जातो तेव्हा तुम्ही तुमच्यात काही बदल होत असल्याचे अनुभवता. अमावस्या आणि पौर्णिमेदरम्यान दोन आठवड्यांच्या काळादरम्यान तुम्ही तुमच्या एनर्जी पहा आणि काय बदल घडतायत हे सुद्धा नोटीस करा. (Full Moon)

हेही वाचा- पाण्यात होणार व्यक्तींचे अंत्यसंस्कार

धार्मिक कारण
पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व सुद्धा अधिक आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा-अर्चना केली जाते. असे म्हटले जाते की, हा दिवस विष्णुला प्रिय असतो. पौर्णिमेला केलेली धार्मिक आणि पुण्य कामांमुळे विष्णू प्रसन्न होत तुमच्या इच्छा पूर्ण करतात. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे खास महत्त्व आहे. या दिवशी दानाला फार महत्त्व आहे. भवगान विष्णूची पूजा करणारे भक्त सुद्धा या दिवशी गरिबांना दान करू शकतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.