फक्त २ तास जरी पाऊस पडला तरी लोकांची हालत खराब होते… पण तुम्हाला म्हटलं २० लाख वर्ष पृथ्वीवर सतत पाऊस पडत होता. आकडा बिलकुल चुकलेला नाहीये… २ च्या पुढे सहा शून्य इतकी वर्ष पाऊस नुसता धो धो पडत होता. पण कधी, कुठे, कसं… सगळं जाणून घेऊ. (First Rain on Earth)
ओ तुमच्याइकडे पण लाईट गेलीये का ? इथपासून ते कोणालातरी फोन करून… ओ तुमच्याइथेही पाऊस पडतोय का ? असा हा प्रवास सगळ्यांनीच अनुभवला असेल. सध्या पावसाने ऐन मे महिन्यात थैमान घातलय. गर्मीच्या मोसमात पावसाने थंडीचा फिल दिला खरा, पण सगळीकडे पाणी साचवून सगळ ठप्प करण्यातही तो एक्स्पर्ट आहे. आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल की, जगात सगळ्यात जास्त पाऊस भारतातल्या मौसीनरामला पडतो. हे मेघालयमध्ये आहे. पण सध्या मुंबईतच मेघा लय पडायला लागले आहेत. बरं मुंबईचं जाऊ द्या विषय भरकटतोय… आपण होतो सलग २० लाख वर्ष पाऊस पडत होता, तर महत्त्वाचं म्हणजे हा पृथ्वीवरचा पहिला पाऊस होता. नंतर कुठे ऋतुचक्र बदलले. हिवाळा, उन्हाळा नी पावसाळा…पण पृथ्वीवर पडणाऱ्या या पहिल्या पावसाने इतकी वर्ष का घेतली ? तर हे समजून घ्यायला थोडं विज्ञानाच्या वर्गाला तुम्हाला बसायला लागेल.(Top Stories)
तर ४.५ अब्ज वर्षांपूर्वी आपली सूर्यमाला तयार झाली. पृथ्वीही आधी आगीचा गोळाच… पण हळू हळू थंड होत गेली. जमीन तयार झाली. आजपासून ३० कोटी वर्षांपूर्वी जेव्हा डायनोसॉर पण पृथ्वीवर नव्हते, तेव्हा पृथ्वी आजसारखी नव्हती.पाचव्या गिअरला ती फिरत होती. दिवस १० तासांचा… म्हणजे ५ तास रात्र आणि ५ तास उजेड… सुरुवातीला पृथ्वीवर पाणीच नव्हतं. म्हणजे ते होतं पण वायूरुपात होतं, लिक्विडमध्ये नाही. त्यावेळी पृथ्वीच्या भोवती हायड्रोजन सल्फाईड, मिथेन, कार्बन डायऑक्साइड असे वेगवेगळे वायू होते. पृथ्वीची स्पीड जशी फास्ट तशी ती थंड होत चालली होती. त्यामुळे जमिनीखाली असलेल्या वायूंचं म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिक्स होऊन पहिल्यांदा पाणी तयार झालं. ते बाहेर पडलं, वाहायला लागलं. पण गर्मी लय जाम… त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन झालं, वाफा बनू लागल्या. (First Rain on Earth)
ढग इतकं भरलं की पाऊस आता ढगफुटीसारखा कोसळतोय की काय, अशीच परिस्थिती होती. पण पावसाचा काहीतरी वेगळाच प्लान होता. तेव्हा पृथ्वीवर असा धो-धो पाऊस पडला की तो सलग २० वर्ष सॉरी सॉरी २० लाख वर्ष पडतच राहिला. म्हणजे विचार करा आपण त्या काळात असतो, तर आपल्या पिढ्यांसाठी फक्त पाऊस हा एकच ऋतू कायमचा झाला असता. याच पावसाच्या दरम्यान पाण्यात जीवसृष्टी तयार व्हायला सुरुवात झाली. खोलगट भाग महासागरांनी व्यापून टाकला. २० लाख वर्षांच्या बेदम पाऊस पडल्यानंतर पृथ्वी एकदम chill झाली. अखेर सूर्याची पहिली किरण पृथ्वीवर जमिनीवर पडली. आता पृथ्वी जिवंत झाली होती. पावसाने धुधू धुतल्यामुळेच कुठे ही जीवसृष्टी निर्माण झाली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.(Top Stories)
===============
हे देखील वाचा : Indore couple case : इंदौर कपल केसची A टु Z स्टोरी…
===============
आता तुम्हाला हा प्रश्न १०० % पडला असेल की, २० लाख वर्ष सतत पाऊस पडत होता हे माहिती कसं पडलं, तर १९७०-८० दरम्यान काही जिओलॉजिस्ट आणि सायंटीस्ट यांनी ऑस्ट्रेलियामधल्या २३ कोटी वर्ष जुन्या खडकांच्या थरांचा अभ्यास केला होता. त्यात त्यांना एका कार्बोनेट खडकाच्या आत तपकिरी सिलिसिक्लास्टिक टाईपच्या खडकाचा विचित्र थर दिसला. सहसा हे खडक ओलावा किंवा जास्त पाणी असलेल्या भागात दिसून येतात. यातून निष्कर्ष असा निघाला की, पृथ्वीवर बराच काळ दुष्काळसारखी परिस्थिती होती. आता पाणीच नव्हतं तर लॉजिकली दुष्काळ असणारच… पण असेच खडक किंवा खडकांचा थर बराच काळ पाऊस पडल्यानंतरच बनू शकतात आणि त्यानंतर हे सिद्ध झालं की, लाखो वर्ष पाऊस सतत पडत होता. (First Rain on Earth)
तसं थोडं किचकट वाटेल, पण भन्नाट गोष्ट आहे की, पाऊस हा सतत २० लाख वर्ष पडतच होता. सध्या थोडाफार पाऊस पडला तरी आपली तनतन होते, मग इतकी वर्ष माणूस तग धरून बसण तर शक्यच नाही.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics